|
ऍग्रो प्लॅनिंग
1) पुढील हंगामासाठी रोपवाटिका तयार करताना बियाण्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन रोपांची संख्या योग्य राहण्यास मदत होते. 2) कीडनियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 3) मशागतीय, यांत्रिक व जैविक पद्धतींचा योग्य वेळी वापर करून कमीत कमी खर्चात योग्य नियंत्रण मिळते. तसेच उत्पादनखर्चही कमी होतो.
Saturday, May 18, 2013 AT 05:30 AM (IST)
हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीत नत्राची वाढ होते. कडधान्ये वर्गीय पिकांची मुख्य पिकांच्या दोन ओळींत पेरणी करावी. यामुळे मुख्य पिकासाठी नत्राची उपलब्धता वाढते. आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकतो. फळबागांमध्ये आच्छादन आणि तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. डॉ. बी. ए. सोनुने, डॉ. व्ही. के.
Saturday, May 18, 2013 AT 04:30 AM (IST)
द्राक्ष बागेमध्ये सध्या विविध अवस्था असून नव्या बागेमध्ये कोवळ्या फुटीवर थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. थ्रिप्सचे नियंत्रण करण्यासाठी योग्य फवारणी घ्यावी. त्याचप्रमाणे जुन्या बागेमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कॅनॉपी मोकळी ठेवण्याकडे लक्ष द्यावे. डॉ. आर. जी. सोमकुंवर सध्या तापमानात वाढ होत असली तरी काही वेळा वातावरण ढगाळ राहत आहे.
Friday, May 17, 2013 AT 04:15 AM (IST)
वळवाच्या पावसाच्या पहिल्या सरी पडल्यानंतर धूळ वाफ भिजून शांत झाल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड करावी. लागवडीसाठी दर्जेदार बेण्याची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करावी. हळद लागवडीसाठी मजुरांची बचत करण्यासाठी यंत्राने लागवड करणे फायदेशीर ठरते. डॉ. जितेंद्र कदम, रघुनाथ वाघमोडे, प्रतापसिंह पाटील बेण्याचे प्रकार  - 1) जेठा गड्डा बेणे  - आकाराने मोठा, भवऱ्यासारखा दणकट कंदाच्या मध्यभागी असतो.
Friday, May 17, 2013 AT 04:00 AM (IST)
आपल्या देशात लागवडीखाली मोठ्या प्रमाणावर असलेली हळद ही कुरकुमा लोंगा या प्रकारात मोडते. हळद ज्या भागात पिकविली जाते किंवा विकली जाते, त्या भागाच्या नावावरून हळदीच्या जाती प्रचलित झालेल्या आहेत. राज्यातील हवामान आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करता सेलम हळदीची लागवड फायदेशीर ठरते. डॉ. जितेंद्र कदम, रघुनाथ वाघमोडे, प्रतापसिंह पाटील राज्यातील प्रमुख जाती  - 1) फुले स्वरूपा (डी.टी.एस. - 222)  - - ही जात मध्यम उंच वाढणारी आहे.
Thursday, May 16, 2013 AT 03:45 AM (IST)
डॉ. एस. डी. सावंत येत्या आठवड्यात सर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण कमी- जास्त प्रमाणात ढगाळ राहील. सांगली व सोलापूर भागामध्ये काही दिवस वातावरण संपूर्ण ढगाळ राहून सूर्यदर्शन होणार नाही. मागील काही दिवसांत कमी झालेले तापमान येत्या शुक्रवार व शनिवारी पुन्हा वाढेल. जवळपास सर्वच ठिकाणी कमाल तापमान पुन्हा 40 अंश सेल्सिअसच्या वर जाईल. सांगली भागामध्ये ते 42 अंश सेल्सिअस, तर सोलापूर भागामध्ये 44 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Thursday, May 16, 2013 AT 03:00 AM (IST)
द्राक्ष बागेमध्ये सद्यपरिस्थितीत काडीची वाढ, सबकेन तयार करणे, सूक्ष्म घडनिर्मिती तसेच काडीची पक्वता अशा विविध अवस्था दिसून येत आहेत. बहुतांश बागा सबकेन तयार करणे ते सूक्ष्म घडनिर्मितीच्या टप्प्यात असल्याचे दिसून येते. सूक्ष्म घडनिर्मितीसाठी आवश्यक घटकांची व संजीवकांविषयी माहिती घेऊ. डॉ. एस. डी. रामटेके मागील लेखात सूक्ष्म घडनिर्मितीसाठी पिचिंग व टॉपिंगचे महत्त्व याविषयी माहिती घेतली.
Wednesday, May 15, 2013 AT 04:00 AM (IST)
जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात सुधारणा करण्यासाठी रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांमधून पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारून जमिनीत हवा, पाणी खेळते राहते. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पीकवाढीसाठी जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते. डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. आर. एन.
Tuesday, May 14, 2013 AT 04:15 AM (IST)
वनस्पतीच्या श्वसनक्रिया, प्रकाशसंश्लेषण, प्रथिने तयार होण्यास आणि संप्रेरके तयार होण्यासाठी काही प्रथिनांमध्ये तांबे आवश्यक असते. या अन्नद्रव्याअभावी नत्र चयापचयात बिघाड झाल्यास प्रथिने निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. वनस्पतीच्या उतींना कणखरपणा येण्यासाठी तांबे महत्त्वाचे असते. डॉ. हरिहर कौसडीकर तांबे (कॉपर) हे पिकांना पोषणासाठी लागणाऱ्या सात सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.
Tuesday, May 14, 2013 AT 04:15 AM (IST)
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी आणि मशागत करताना केल्यास त्याचे फायदे दीर्घकाळ दिसून येतात. कमी पावसामध्येही जमिनी ओलावा टिकवून धरत असल्याने उत्पादनात वाढ होते. सुहास बा. जाधव, ए. व्ही. गुट्टे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 83 टक्के शेतीचे क्षेत्र हे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा कोरडवाहू शेतीतून शाश्वत स्वरूपाचे उत्पन्न मिळण्यास अडचणी येतात.
Monday, May 13, 2013 AT 04:00 AM (IST)
खरिपातील पीक लागवडीच्या नियोजनानुसार जमिनीची मशागत करावी. कठीण जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी तसेच जादाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मशागत करताना सबसॉयलरचा वापर करावा. पीक नियोजनानुसार बियाणे, खतांचे नियोजन करावे. 1) पिकाच्या गरजेनुसार जमिनीची मशागत करावी. उताराला आडवी मशागत करावी. पूर्वी कापूस, ऊस, तूर सारखी पिके घेतली असल्यास पिकांचे अवशेष गोळा करून रान स्वच्छ करावे. त्यामुळे पेरणी सुरळीत होते. बियाण्यांची उगवण चांगली होते.
Saturday, May 11, 2013 AT 07:29 PM (IST)
- भाजीपाल्यात मर रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोपांची लागवड करण्यापूर्वी शेतात ट्रायकोडर्मा बुरशी शेणखतात मिसळून द्यावी. - कीड-रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रथमतः प्रादुर्भावग्रस्त पान, फांदी, फळ कापून नष्ट करावे, नंतर योग्य फवारणी घ्यावी. - भाजीपाला व पिकात रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीनंतरच करावा.
Saturday, May 11, 2013 AT 04:15 AM (IST)
हरितगृहामध्ये काकडीची लागवड केल्यास चांगल्या दर्जाच्या काकडीचे उत्पादन घेता येते. हरितगृहातील लागवडीमुळे काकडीचा आकार आणि उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळते. काकडीच्या उत्पादन पद्धतीविषयी आजच्या लेखात पाहू. रवींद्र देशमुख लागवडीच्या पद्धती : हरितगृहातील काकडीच्या लागवडीसाठी गादी वाफे तयार करावेत. त्यापूर्वी मातीचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यानंतर पुढील आकाराचे वाफे तयार करावेत 1) पृष्ठभागाची रुंदी - 90 सें.मी. 2) चालण्याचा रस्ता - 50 सें.
Saturday, May 11, 2013 AT 03:45 AM (IST)
द्राक्ष बागेत सध्याच्या वातावरणाचा विचार करता सर्वत्र तापमान वाढत आहे. आर्द्रता बऱ्यापैकी कमी होत आहे. अशा वेळी जुन्या आणि नव्या द्राक्ष बागेत पाण्याची उपलब्धता असताना व कमतरता असल्यास करावयाच्या व्यवस्थापनाविषयी अधिक माहिती आजच्या लेखात पाहू. डॉ. आर. जी. सोमकुंवर 1) जुनी द्राक्ष बाग  - या बागेमध्ये सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आढळून येतील.
Friday, May 10, 2013 AT 04:30 AM (IST)
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीसाठी कोणती पद्धत वापरावी ते ठरवावे. पाटाने किंवा सोडपद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. ठिबक किंवा तुषार सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धतीने लागवड करावी. डॉ.
Thursday, May 09, 2013 AT 04:00 AM (IST)
तुरीच्या मॉन्सूनपूर्व लागवडीसाठी शेतामध्ये सुधारित पद्धतीने लागवड करावी किंवा रोपवाटिका तयार करून रोपांची योग्य वाढ होताच त्यांची पुनर्लागवड शेतात करावी. या पद्धतीमुळे तुरीच्या उत्पादनात चांगली वाढ होते. यंदाच्या वर्षी काही क्षेत्रावर या पद्धतीने लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी करावा. डॉ. के. बा. वंजारी राज्यातील इतर पिकांच्या तुलनेत तूर लागवड अवर्षणग्रस्त क्षेत्रावरदेखील केली जाते.
Wednesday, May 08, 2013 AT 04:15 AM (IST)
तुरीच्या मॉन्सूनपूर्व लागवडीसाठी शेतामध्ये सुधारित पद्धतीने लागवड करावी किंवा रोपवाटिका तयार करून रोपांची योग्य वाढ होताच त्यांची पुनर्लागवड शेतात करावी. या पद्धतीमुळे तुरीच्या उत्पादनात चांगली वाढ होते. यंदाच्या वर्षी काही क्षेत्रावर या पद्धतीने लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी करावा. डॉ. के. बा. वंजारी राज्यातील इतर पिकांच्या तुलनेत तूर लागवड अवर्षणग्रस्त क्षेत्रावरदेखील केली जाते.
Wednesday, May 08, 2013 AT 04:15 AM (IST)
सूक्ष्म घडनिर्मिती आणि त्याचबरोबर एकसारख्या जाडीच्या काड्या तयार करण्यासाठी वेलींची शाकीय वाढ रोखणे आवश्यक असते. ती रोखण्यासाठी पिंचिंग आणि टॉपिंगचे नियोजन करावे. याचबरोबरीने अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष द्यावे. डॉ. एस. डी. रामटेके सध्याच्या काळात द्राक्ष बागेतील फुटी जोमाने वाढताना दिसत आहेत. यामुळे काडीच्या जाडीवर व सूक्ष्म घडनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढ थांबवण्यासाठी पिंचिंग व टॉपिंगचे नियोजन करावे.
Wednesday, May 08, 2013 AT 03:45 AM (IST)
शेतकरी : बाळासाहेब माधवराव खपके पत्ता: मु. इसळक, पो. निंबळक, जि. नगर संपर्क  - 9689889302 सध्या पाण्याची स्थिती  माझी एकूण 15 एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकर चिकू, अडीच एकर डाळिंब, 30 गुंठे टरबूज, अर्धा एकर मका आहे. विहिरीचे पाणी डिसेंबरमध्ये संपले आहे. चार कूपनलिका आहेत. त्यापैकी एका कूपनलिकेचे पाणी विहिरीत टाकून साठवतो. एक दिवसा आड विहिरीतील पाणी उचलतो. दोन तास मोटर चालते.
Wednesday, May 08, 2013 AT 03:00 AM (IST)
येत्या काळात कोकम, जांभूळ, करवंद आणि फणस ही फळपिके काढणीस तयार होत आहेत. या फळांची योग्य वेळी, योग्य पद्धतीने काढणी केली तर दर्जेदार फळांचे चांगले उत्पादन मिळते. डॉ. पराग हळदणकर, योगेश परुळेकर कोकम, जांभूळ, करवंद आणि फणस ही पिके काढणीसाठी पावसाळ्याच्या तोंडावर तयार होतात. अयोग्य काढणी व काढणीपश्चात हाताळणीचा अभाव यामुळे 70 टक्के उत्पादन फुकट जाते.
Tuesday, May 07, 2013 AT 04:30 AM (IST)
आजच्या लेखामध्ये पिकांच्या एक टन उत्पादनासाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि त्यांच्या शोषणाविषयी अधिक माहिती घेऊ. डॉ. हरिहर कौसडीकर सर्वच पिकांना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण हे सर्वसाधारणपणे पिकांच्या गरजेनुसार मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये या प्रकारात करण्यात आले आहे.
Tuesday, May 07, 2013 AT 03:15 AM (IST)
कोकणपट्टीत नारळ व सुपारीच्या बागांमध्ये जायफळ, दालचिनी, काळीमिरी, लवंग लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सध्याच्या काळात ही पिके वाढीच्या आणि काढणीच्या अवस्थेमध्ये आहेत. या काळात मसाला पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबतची माहिती आजच्या लेखात घेत आहोत. डॉ. राजन खांडेकर, प्रा. विशाल सावंत, प्रा. संदीप गुरव जायफळ  - 1) नवीन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी. जायफळ कलमे, रोपे पाण्याचा ताण सहन करू शकत नाहीत.
Monday, May 06, 2013 AT 04:00 AM (IST)
व्यवस्थापन आंबा मोहोराचे दापोली, जि. रत्नागिरी ः हवामान बदलामुळे आंब्याला मोहोर आला तरी तो गळून पडण्याचे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही आंबा उत्पादन वाढेल याची खात्री बागायतदारांना देता येत नाही. या पार्श्वभूमीवर आंबा पिकात गोमूत्र फवारणी करून फळगळ थांबवण्याचे प्रयोग दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात घेण्यात आले आहेत.
Sunday, May 05, 2013 AT 12:00 AM (IST)
संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची गोष्ट आहे. संत्रा बागेच्या दक्षिण- पश्चिम बाजूला जैविक कुंपण करावे. संत्र्याच्या दोन झाडांतील अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. आतापासूनच लागवडीचे नियोजन केल्यास पावसाळ्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने संत्रा लागवड करणे सोपे जाईल. संत्रा लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाची गोष्ट आहे.
Sunday, May 05, 2013 AT 12:00 AM (IST)
डॉ. एस. व्ही. धुतराज प्रा. आर. व्ही. देशमुख उन्हाळ्यात केळी पिकाची खालीलप्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे. 1) पाणी व्यवस्थापन ः दुष्काळी क्षेत्रात, तसेच पाण्याची कमतरता असलेल्या भागात केळीला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. या पद्धतीत प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीच्या 25 ते 30 टक्के पाणी लागते. तसेच उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ मिळते. 2) आच्छादनाचा वापर ः पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी जमिनीवर दोन ओळींमध्ये आच्छादन पसरावे.
Saturday, May 04, 2013 AT 12:15 AM (IST)
- सध्याच्या उष्ण वातावरणामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येऊ शकतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी किडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच वेलीखालील माती खुरपून घ्यावी. नर फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यू ल्युअर सापळे एकरी पाच या प्रमाणात वापरावेत. - हरितगृहामध्ये घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकामध्ये मुख्यत्वे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीमुळे अन्य विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो.
Saturday, May 04, 2013 AT 12:15 AM (IST)
फळबाग व्यवस्थापन ः 1) सध्याच्या काळात फळबागांची स्वच्छ राखावी. 2) बहर संपलेल्या बागातील मोकळ्या जमिनीची मशागत करावी. 3) आळे दुरुस्ती करावी. शिफारशीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. 4) आळ्यात सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक फिल्मचे आच्छादन करावे. 5) जुनी, किडकी, रोगग्रस्त फळे, फांद्या गोळा करून जाळावेत. 6) अनावश्यक फांद्यांची छाटणी करून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. 7) झाडाचा जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंतचा बुंधा बोर्डो पेस्टने रंगवावा.
Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)
आंबा काढणी भाग- 2 पाण्यावर तरंगणारे आंबे कोवळे असल्याने पिकल्यानंतर स्वाद चांगला नसतो, तसेच मिठाच्या पाण्यात बुडालेल्या आंब्यांत साका येण्याची शक्यता असल्याने दोन्हीही प्रकारचे आंबे विक्रीसाठी वापरू नयेत. बाजारात फळे पाठविण्यापूर्वी आंब्यांची काटेकोरपणे प्रतवारी करणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रथम "डागी' (विविध प्रकारचे डाग असलेली फळे) आणि "बिनडागी' अशी आंब्यांची प्रतवारी करावी. निर्यातीसाठी "बिनडागी' आंबे असणे आवश्यक आहे.
Friday, May 03, 2013 AT 01:00 AM (IST)
गेल्या आठवड्याचा आढावा घेतल्यास द्राक्ष बागेतील तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येते. अशा या वाढीच्या तापमानामध्ये आर्द्रता कमी होऊन वारे वाहत आहे. या आठवड्यात द्राक्ष बागेतील कामाच्या परिस्थितीचा विचार केल्यास नवीन द्राक्ष बागेत या आठवड्यात कोणते व्यवस्थापन करावे, याबाबतची माहिती आजच्या लेखात घेत आहोत. 1) नवीन बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ओलांडे तयार होत आहेत. बागेत ओलांडा तयार करतेवेळी "स्टॉप अँड गो' पद्धतीने चालल्यास त्याचा फायदा होतो.
Friday, May 03, 2013 AT 12:45 AM (IST)
आंबा फळांची गुणवत्ता टिकविण्यासाठी काढणीपूर्व तसेच काढणीपश्चात व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. आंबा फळांच्या योग्य वेळी काढणीवरच त्यांची प्रत आणि विक्रीची किंमत अवलंबून असते. डॉ. के. एच. पुजारी, डॉ. पी. पी. रेळेकर राज्याचा विचार केला असता कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत असतो, तर उर्वरित राज्यात आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मेमध्ये सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो.
Wednesday, May 01, 2013 AT 04:00 AM (IST)
काही बागांमध्ये सीसीसी (क्लोरमेक्वाट क्लोराईड) यंदाच्या वर्षी वापरले गेले नाही, तरीसुद्धा त्याचे अवशेष 0.05 पेक्षा जास्त आढळून आले. यावरून असे दिसते, की जर आपल्याला द्राक्षांची निर्यात सुरूच ठेवायची असल्यास "सीसीसी'चा वापर बंद करावा लागेल. म्हणजेच "सीसीसी'च्या वापराशिवाय वेलींची वाढ कशी नियंत्रित ठेवता येईल, याचा विचार करणे फार गरजेचे आहे. डॉ. एस. डी. रामटेके, शरद भागवत द्राक्ष छाटणीनंतर बराच कालावधी झाला आहे.
Wednesday, May 01, 2013 AT 03:45 AM (IST)
|