अकोला (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 21) तूर, हरभऱ्याची आवक वाढली. बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली असून, मंगळवारी 4253 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला 3100 ते 3275 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. बाजार समितीत हरभऱ्यापाठोपाठ तुरीची 1903 क्विंटल आवक झाली. तुरीला 3150 ते 3400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ज्वारीला 980 ते 1075 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गव्हाची 69 क्विंटल आवक झाली.
पुणे - हवामानातील तापमानवाढीचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होण्यास सुरवात होत आहे. याचा परिणाम म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घटत असून बाजारातील आवकदेखील घटत आहे. उन्हाळ्यामुळे फळांच्या आवकेबरोबरच मागणीदेखील वाढत आहे. बाजारात द्राक्ष, संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबुजाची आवक वाढत आहे. बाजार समितीत मंगळवारी (ता. 21) भाजीपाल्याच्या सुमारे 70 ते 80 गाड्या आवक झाली.
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ज्वारी, गव्हाचे दर स्थिर होते. कांद्याच्या दरात किंचित चढ-उतार वगळता दर काहीसे वधारले. गतसप्ताहात ज्वारीची 200 क्विंटल आणि गव्हाची 100 क्विंटल आवक झाली. माळशिरस, माढा, बार्शी, मोहोळ आदी स्थानिक भागासह नजीकच्या उस्मानाबाद, लातूर भागातूनही त्याची चांगली आवक होती. ज्वारीला 2500 ते 3200 रुपये, गव्हाला 1100 ते 1800 रुपये प्रति क्विंटल असा दर होता.
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात हिरवी (ओली) व ढोबळी मिरचीचे दर तेजीत होते. या दोन्ही भाज्यांना 120 ते 300 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. ओला वाटाणा (मटार)च्या आवकेत सातत्य होते. वाटाण्यास 120 ते 300 रुपये प्रति दहा किलो इतका दर मिळाला. या सप्ताहात वाटाण्याची दररोज दोनशे ते तीनशे पोती इतकी आवक होती. दररोज पंधरा हजार गूळ रव्यांची आवक झाली. वांगी व टोमॅटोची या सप्ताहात चांगली आवक राहिली.
नाशिक : थंडीनंतर नाशिक भागात तापमान वाढत असताना गत सप्ताहात द्राक्षांच्या शिवारसौद्यात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली तसेच देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकमधील द्राक्षांची आवक वाढली असून, तुलनेने मागणी स्थिर आहे. उत्तर भारत व बिहार या बाजारपेठेत जाणाऱ्या गाड्यांमध्ये चार ते पाच गाड्यांनी वाढ झाली. या बाजारपेठांमध्ये गत सप्ताहात सरासरी आठ टन वजनाच्या सरासरी 120 ते 130 गाड्या पाठविण्यात आल्या.
येवला, जि. नाशिक ः येथील मुख्य बाजार आवार, तसेच आंदरसूल व पाटोदा उपबाजार आवारांवर गत सप्ताहात लाल रांगड्या कांद्याची आवक वाढली. कांद्याचे दर स्थिर होते. कांद्याची एकूण 1,17,297 क्विंटल आवक झाली. कांद्याला 200 ते 351 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर होते. आंदरसूल उपबाजार आवारावर कांद्याची 66,187 क्विंटल आवक झाली. कांद्याला 200 ते 359 रुपये प्रति क्विंटल असा दर होता. पाटोदा उपबाजार आवारावर कांद्याची 6815 क्विंटल आवक झाली.
पुणे (प्रतिनिधी) ः या सप्ताहात गुलटेकडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली होती तसेच आज (सोमवारी) साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीसाठी गेल्या चार - पाच दिवसांपासून नगर, औरंगाबाद येथून आवक झालेल्या कवठ आणि करमाळा, कराड आणि कर्नाटकातून आवक झालेल्या रताळ्यांना मोठी मागणी होती. बाजार समितीमध्ये सरासरी 180 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली.
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. 18) काकडीला तेजीचे दर मिळाले. काकडीची एकूण 19 क्विंटल आवक झाली. काकडीला 2000 ते 4000 रुपये, तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गत महिन्यात थंडीचे प्रमाण वाढलेले असतानाही काकडीची मागणी वाढलेली होती. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून नाशिक भागात तापमानात वाढ होत असताना काकडीच्या मागणीत अधिकच वाढ झाली आहे.
सोलापूर (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात शुक्रवारी (ता. 17) गवार, भेंडी, घेवड्याला चांगली मागणी राहिली, त्यांचे दरही तेजीत होते. पालेभाज्यांत कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर तेजीत होते. गेल्या काही दिवसांपासून फळभाज्यांना उठाव मिळतो आहे. त्यातही गवार, भेंडी, घेवड्यालाही चांगला उठाव मिळाला. त्यांची प्रत्येकी एकेक गाडी आवक झाली. ही सर्व आवक माढा, मोहोळ, पंढरपूर, बार्शी या स्थानिक भागातून झाली.
अकोला (प्रतिनिधी) ः येथील बाजार समितीत रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक होण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता. 17) बाजार समितीत 5270 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला 3100 ते 3400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  येथील बाजारात प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन, तर रब्बीत हरभरा, गव्हाची आवक होते. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर आता बाजारात हरभऱ्याची वाढती आवक होत आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील गुरुवारी (ता. 16) झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे बहुतांश बाजार समित्यांना सुट्ट्या होत्या. याचा परिणाम शुक्रवारी (ता. 17) येथील बाजार समितीतील आवकेवर झाला. येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या सुमारे 150 ते 160 गाड्या आवक झाली. सरासरीपेक्षा सुमारे 50 गाड्यांची आवक जास्त झाली होती मात्र बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर होते.  सोमवारी (ता.
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील गुरुवारी (ता. 16) झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे बहुतांश बाजार समित्यांना सुट्ट्या होत्या. याचा परिणाम शुक्रवारी (ता. 17) येथील बाजार समितीतील आवकेवर झाला. येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या सुमारे 150 ते 160 गाड्या आवक झाली. सरासरीपेक्षा सुमारे 50 गाड्यांची आवक जास्त झाली होती मात्र बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर होते.  सोमवारी (ता.
मुंबई (प्रतिनिधी) ः येथील वाशी मार्केटमध्ये मंगळवारी (ता. 14) कांद्याची 9200, तर बटाट्याची 11280 क्विंटल बटाट्याची आवक झाली. बटाट्याला 500 ते 750 रुपये तर सरासरी 600 रुपये क्विंटल असा दर होता. कांद्याला 420 ते 600 रुपये तर सरासरी 500 रुपये क्विंटल असा दर मिळाला. लसणाची 480 क्विंटल आवक झाली. लसणाला 1000 ते 4500 रुपये, तर सरासरी 2500 रुपये क्विंटल असा दर होता.
जळगाव (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.15) गुळाची सर्वाधिक आवक झाली. तब्बल 574 रवे आवक झालेल्या गुळाला 2100 ते 2425 रुपये क्विंटल असा दर मिळाला. भुसार मालाची आवकही गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगली झाली. त्यामुळे बाजार समितीतील उलाढालही जोरात झाली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रब्बी पिकांच्या काढणीसह उन्हाळी पिकांच्या लागवडीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात बाजार समितीत आवकही तशी कमीच झाली होती.
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीपासून नाशिक भागातील शिवारसौदे वाढले आहेत. या परिस्थितीत गत सप्ताहातही द्राक्षांची आवक वाढतीच राहिली. देशांतर्गत बाजारात उत्तर भारत, बिहारला, तसेच बांगलादेशला जाणाऱ्या गाड्यांमध्ये किमान 20 गाड्यांची वाढ झाली आहे. गतसप्ताहात द्राक्षांना देशांतर्गत बाजारपेठेत 2000 ते 6000 रुपये, तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
येवला, जि. नाशिक ः येथील मुख्य मार्केटयार्ड तसेच आंदरसूल उपबाजार आवारावर लाल रांगडा कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कांद्याचे दर स्थिर होते. कांद्याची एकूण 1,17,549 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याचा दर 200 ते 371 रुपये प्रति क्विंटल असा होता. येथील आंदरसूल उपबाजार आवारावर 37,088 क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याला 200 ते 355 रुपये प्रति क्विंटल असा दर होता.
सोलापूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत गतसप्ताहात हिरवी मिरची, वांग्याला चांगली मागणी राहिली परंतु निवडणुकांमुळे हार-फुलांना सातत्याने मागणी असल्याने फुलांना चांगला उठाव आणि दरही मिळाला, त्यामुळे फुलबाजार चांगलाच वधारला. गतसप्ताहात समितीच्या आवारात हिरव्या मिरचीची 200 क्विंटल, वांग्याची 100 क्विंटल आणि टोमॅटोची 500 क्विंटल आवक झाली.
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 15 दिवस अगोदर आंबा बाजारात आला आहे. या आंब्यांच्या पेटीस 3000 ते 5000 रुपये इतका दर होता. कोल्हापुरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड, मालवण या कोकण भागातून आंब्याची आवक होते. यंदाही कोकणातूनच आंब्याच्या आवकेस सुरवात झाली आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात गेल्या चार - पाच दिवसांपासून पडलेल्या थंडीचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला. यामुळे गुलटेकडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली होती. यामुळे सर्वच भाजीपाल्यांच्या दरांमध्ये सुमारे 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे निमित्ताने फुलबाजार गुलाबाच्या आवकेने बहरला होता. गुलाबाला मागणी असल्याने दरही तेजीत होते.
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजार समितीच्या शनिवारी (ता. 11) कांद्याला चांगली मागणी राहिली. शिवाय भावातही किंचित सुधारणा झाली. भुसार बाजारात ज्वारी, गव्हाचे भाव स्थिर होते. पालेभाज्यांच्या दरात तेजी आहे. त्यात विशेषतः कोथिंबीर, मेथी, शेपूला सर्वाधिक मागणी राहिली. गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होते आहे. परंतु मागणी चांगली असल्याने दरात तेजी राहिली. कांद्याची 100 गाड्या आवक झाली.
नाशिक - येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. 10) भेंडीची 13 क्विंटल आवक झाली. भेंडीची आवक कमी झालेली असताना स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी राहिल्याने भेंडीच्या दरातील तेजी कायम असल्याचे चित्र आहे. या वेळी भेंडीला 2075 ते 3525 रुपये, तर सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. येथील बाजार समितीत भेंडी, आले, काकडी, लसूण या शेतीमालाची आवक घटली असून, त्यांना स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी होत आहे.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 8) ओला वाटाणा (मटार), टोमॅटोची सर्वाधिक आवक झाली. ओला वाटाण्याची 1000 पोती, तर टोमॅटोची 1300 कॅरेटची आवक होती. वाटाण्यास 100 ते 300 रुपये, तर टोमॅटोला 30 ते 115 रुपये प्रति दहा किलो इतका दर मिळाला. येथील बाजार समितीत हिरवी (ओली) मिरची, ढोबळी मिरची, भेंडी आदी भाजीपाल्यांचे दर तेजीत राहिले. या भाज्यांचा दर 200 ते 300 रुपये प्रति दहा किलो इतका होता.
मुंबई (प्रतिनिधी) ः येथील वाशी मार्केटमध्ये मंगळवारी (ता. 7 ) कांद्याची 5600 क्विंटल, तर बटाट्याची 6320 क्विंटल आवक झाली. कांद्याला 350 ते 600 रुपये, तर सरासरी 500 रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याला 500 ते 800 रुपये, तर सरासरी 700 रुपये क्विंटल असा दर होता. लसणाची 520 क्विंटल आवक झाली. लसणाला 1500 ते 4000 रुपये, तर सरासरी 3000 रुपये क्विंटल असा दर होता.
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. 7) भेंडीची अवघी 16 क्विंटल आवक झाली. भेंडीच्या आवकेत घट व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढलेली मागणी हीच स्थिती या वेळी कायम राहिली. भेंडीला 2215 ते 3335 रुपये, तर सरासरी 2700 रुपये क्विंटल असा दर मिळाला. दरम्यान घेवडा, काकडी, वांग्याला स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी राहिली. नाशिक भागात थंडीत घट होऊन तापमानात वाढ झाली आहे.
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. 7) भेंडीची अवघी 16 क्विंटल आवक झाली. भेंडीच्या आवकेत घट व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढलेली मागणी हीच स्थिती या वेळी कायम राहिली. भेंडीला 2215 ते 3335 रुपये, तर सरासरी 2700 रुपये क्विंटल असा दर मिळाला. दरम्यान घेवडा, काकडी, वांग्याला स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी राहिली. नाशिक भागात थंडीत घट होऊन तापमानात वाढ झाली आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यासह परराज्यांतून विविध फळांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने गुलटेकडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा फळबाजार विविध फळांनी बहरला होता. तसेच भाजीपाला विभागात सरासरी आवक होती. मात्र टोमॅटो, काकडी, मटार यांची आवक तुलनेने मंदावल्याने त्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. फळांच्या आवकेमध्ये पपई, कलिंगड, स्ट्रॉबेरी, द्राक्ष यांची आवक जास्त होती.
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. 3) काकडीची 70 क्विंटल आवक झाली. काकडीला स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली. या वेळी काकडीच्या प्रति 20 किलो क्रेटला किमान 350, कमाल 575 व सरासरी 400 रुपये दर निघाले. क्विंटलच्या परिमाणात हेच दर किमान 1750, कमाल 2875 व सरासरी 2500 रुपये असे निघाले. या वेळी भेंडी, वांगी, कारली या शेतीमालाला विशेष मागणी वाढली आहे.
सोलापूर (प्रतिनिधी) ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात गुरुवारी (ता. 2) कांद्याला चांगली मागणी राहिली. त्याच्या भावातही तेजी होती. गवार, भेंडी, घेवड्यालाही चांगला उठाव होता. समितीच्या आवारात कांद्याची आवक जिल्ह्यासह नगर, पुणे, बीड, सातारा, उस्मानाबाद, लातूर भागांतून झाली. गेल्या आठवड्यापासून स्थानिक भागातील आवक कमी आहे. त्या तुलनेत बाहेरील आवकच जास्त आहे.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 1) दोडक्यास दहा किलोस 300 ते 350 रुपये इतका भाव मिळाला. गवार, कारली, भेंडी, वरणा आदी भाज्यांची तेजी बुधवारीही कायम होती. ओल्या वाटाण्याची राजस्थानातून सातत्याने आवक होत आहे. भाव दहा किलोस 100 ते 200 रुपये इतके स्थिर आहेत. वाटाणा वगळता कारली, भेंडी, वरण्याची आवक कमी आहे, यामुळे भाव सातत्याने तेजीत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
अकोला (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्यासोबतच नव्या तुरीची आवक वाढली आहे. बुधवारी (ता.1) 2544 क्विंटल तुरीची आवक झाली. नाफेडकडून खरेदीचे सूतोवाच करण्यात आल्याने तुरीची दरात काहीअंशी तेजी अनुभवता आली होती, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. हंगामातील नव्या तुरीची आवक होण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार बुधवारी 2544 क्विंटल आवक झालेल्या तुरीची कमीत कमी 2900, तर जास्तीत जास्त 3400 रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला.
मुंबई - सोमवारी (ता. 30) वाशी मार्केटमध्ये 8500 क्विंटल कांद्याची, तर 12 हजार क्विंटल बटाट्याची आवक झाली. कांद्याचे प्रति क्विंटल 500 रुपये, तर बटाट्याचे सरासरी दर 650 रुपये होते. बाजारात लसणाची 880 क्विंटल आवक झाली होती. लसणाचे भाव क्विंटलमागे जास्तीत जास्त चार हजारपर्यंत पोचले होते. वाढत्या थंडीमुळे शेतीमालाच्या आवक - जावकेवर प्रतिकूल परिणाम झाल्याने काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे दर स्थिरावले आहेत.