|
फुलोरा
आमचं गाव लहान आहे. निसर्गाची अनुकूलता आहे. गावाशेजारून नदी वाहते. धरणामुळे नदीला बारमहा पाणी असतं. गावची वस्ती पंधराशेपर्यंत आहे. गावात इनामदारांची जवळजवळ नऊशे एकर शेती होती. त्यांचा एकुलता एक मुलगा सैन्यात होता. तो चीन युद्धाच्यावेळी मारला गेला. तो अविवाहित होता. त्या वेळी इनामदारांचं वय चाळीसच्या आसपास असावं. त्यांनी आपल्याच भावकीत कोणाला तरी दत्तक घ्यावं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं. काहींनी मुलांसाठी दुसरा विवाह करावा, अशीही सूचना केली.
Saturday, May 25, 2013 AT 04:15 AM (IST)
मी लहान व्यवसायातून मोठा व्यवसाय बनवला. आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेतला. इतरांनी असं केलं नाही. व्यवसायात एक नीतिमत्ता पाळावी लागते. आपल्या ग्राहकाला कधीही फसवायचं नाही. चुकूनही काही घडलं तर लगेच चूक दुरुस्त करायची. ग्राहकाचा विश्वास संपादन केला पाहिजे. मला पहिल्यापासून हे जाणवत होतं, की आपला ग्राहक हेच आपलं खरं भांडवल आहे. दुसरी एक गोष्ट मी केली, ती म्हणजे बाजारपेठेत माझी पत निर्माण केली.
Friday, May 24, 2013 AT 05:00 AM (IST)
माझी साठी पलटली आहे. आरोग्य चांगले आहे. नवं काही करावं ही उमेद अजूनही जिवंत आहे. हेच माझ्या जिवंतपणाचं लक्षण आहे. काही माणसं शरीराने जिवंत असली तरी मनाने मेलेली असतात. सभोवतालच्या परिस्थितीविषयी सतत नाराजी व्यक्त करीत असतात. सगळे लोक भ्रष्ट आहेत, हे त्याचं ठाम मत असत. आपल्याला वगळून सगळेच वाईट आहेत. असा भास त्यांना होत असतो. अशी माणसं माझ्याही सभोवताली आहेत. त्यांचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. कारण एक मला ठाऊक होतं.
Wednesday, May 22, 2013 AT 03:45 AM (IST)
रात्रीची वेळ होती. गाढ झोप लागली होती. दिवसभर शेतात राबून शरीर थकतं. आता चाळिशी उलटून गेली आहे. कळू लागल्यापासून राबत आहे. त्याचं फळ मिळालं आहे. दीड एकर शेती वडिलोपार्जित होती. नऊ एकर शेती विकत घेतली आहे. मी जसं राबलो तसं माझ्या जोडीला माझी बैलजोडीबी राबली. आता माझ्याकडची तिसरी बैलजोडी आहे. आठ बैलांचा नांगर मी दोन बैलांनी नांगरत होतो, एवढी ताकद माझ्याकडील बैलजोडीकडे होती, आजही आहे. बैल थकले, की मी त्यांना जड काम लावत नाही. हलकी कामं लावतो.
Tuesday, May 21, 2013 AT 04:15 AM (IST)
दरवर्षी गावातील चांगले गुण मिळविणाऱ्या मुलांचा गुणगौरव समारंभ साजरा होतो. यासाठी कोणतेही मंडळ नाही. काही लोक पुढाकार घेतात. कार्यक्रम साजरा केला जातो. यामागे एकच हेतू होता. इतरांनी त्याच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. यामुळे गावात शैक्षणिक वातावरणही तयार झाले. अनेकांना यातून प्रोत्साहनही मिळाले. आपल्या यशात इतरांचा सहभाग असावा. असं कोणालाही वाटू शकतं. सालाबादप्रमाणे काही लोक एकत्र आले. त्यांना वेगळा विचार केला.
Monday, May 20, 2013 AT 04:15 AM (IST)
मला मूलबाळ नाही. भावाला तीन मुलं आहेत. मला चांगली नोकरी आहे. बायकोलाही चांगली नोकरी आहे. वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. माझी चार एकर शेती मी विकली आहे. मला ठाऊक होतं, नोकरीमुळे मी शेती कसू शकणार नाही. भावाला वाटत होतं, माझी शेती त्यालाच मिळावी. त्याचं वर्तन बरोबर नाही. त्याची मुलंही फारसं शिकलेली नाहीत. गुंडगिरीकडेच त्यांचा कल आहे. गावातील गरिबांना दमदाटी करतात. गरिबांची शेती कशी बळकावता येईल हेच त्यांचं वर्तन आहे. माझा स्वभाव वेगळा आहे.
Saturday, May 18, 2013 AT 04:00 AM (IST)
आम्ही दोघे भाऊ आहोत. अकरा एकर एका ठिकाणी शेती आहे. दोन विहिरी आहेत. वडिलांनी नदीवरून पाइपलाइनने पाणी शेतात आणलं आहे. सगळा ऊस असतो. एकरी शंभर टन ऊस काढणारे गावात तीन शेतकरी आहेत. त्यांची शेती आमच्या शेतीला लागूनच आहे. आमच्या शेतीचा कसही त्यांच्यासारखाच आहे. आम्ही दोघे भाऊ शेतात काम करतो. वडील मदत करतात. आमचा ऊस एकरी ऐंशी टनांपर्यंत निघतो. आता आमच्याइतका ऊस काढणारे गावात बरेच शेतकरी आहेत. अलीकडे गावात एक बैठक झाली.
Friday, May 17, 2013 AT 04:30 AM (IST)
मला एकच मुलगी आहे. मुलीच्या पसंतीनेच लग्न झालं. आमच्यापेक्षा मुलाची परिस्थिती कमी आहे. याहीपेक्षा आमच्या जातीतही वरचा- खालचा असा भेदाभेद आहे. परिस्थितीप्रमाणे कमीपणा वाटला तो म्हणजे, तो आमच्या जातीतील कमी प्रतीचा आहे. तीन भाऊ एकत्र राहतो. मुलगा फारच स्वाभिमानी आहे. तो आम्हाला बोलला, मुलीचा कोणताही वाटा मी घेऊ देणार नाही. आमची तीस एकर शेती आहे. माझ्या वाट्याला दहा एकर शेती येते. ती वारसा हक्काने मुलीला मिळणार आहे.
Thursday, May 16, 2013 AT 04:30 AM (IST)
दुपारची वेळ होती. विहिरीवर मोटर सुरू करून घराकडे निघालो होतो. माझी ही नेहमीची पद्धत आहे. साखळी पाट केले आहेत. दिवसभर उसात पाटाने पाणी जाते. उसात आत काही मी जात नाही, तरी साखळी पाटामुळे सगळ्या उसाला भरपूर पाणी मिळते. कधी कधी माझ्या रानातून पाणी बाहेर पडून गाडीवाटेतही जाते. गाडीवाटेत पाणी गेल्यामुळे वाटेतून जाण्यास अडचण तयार होते. ही गाडीवाट आमच्याच रानातून आम्ही काढून दिली आहे.
Wednesday, May 15, 2013 AT 04:15 AM (IST)
गावातील काही तरुणांनी ठरविले आहे एक मंडळ सुरू करायचे. गावात अनेक मंडळं आहेत. मंडळ स्थापन करणं ही काय नवलाईची गोष्ट नाही. काही उत्सव साजरे करण्यासाठी लोक एकत्र येऊन मंडळ स्थापन करतात. अशा मंडळाच्या पुढाऱ्यांना मानही मिळतो. याचे कारण काहीतरी सर्वांसाठी असे उपक्रम करतात. तसे कोणी करीत नाही. समाजाला याचीही गरज आहे. माणसं एकत्र आली, की त्यातून काही विधायक कामं होतात. त्यासाठी माणसं एकत्र येणं आवश्यकही आहे.
Tuesday, May 14, 2013 AT 04:00 AM (IST)
आई एकटी राहते. तशी थकलेली नाही. आमची गावात शेती नाही. वडील मोलमजुरी करायचे. त्यांनी आयुष्यभर सालगडी म्हणूनच काम केलं. मालकाने त्यांच्या मुलांबरोबर मलाही शिक्षण दिलं. त्या वेळी त्यांच्या घरात दोन मतं होती. एक मत असं होतं, या मुलाला शिक्षण दिलं तर तो पुढे सालगडी म्हणून काम करणार नाही. शिकून काही कामधंदा करेल असं काहींचं मत होतं. जो कारभारी होता त्याचं मत असं होतं, की मुलगा हुशार आहे. अशी माणसं मागं पडत नाहीत.
Monday, May 13, 2013 AT 04:15 AM (IST)
मला एकच मुलगा आहे. पदवीधर आहे. मला सरकारी नोकरी होती. मला बायकोकडून वीस एकर शेती मिळाली आहे. शेतावर आम्ही घर बांधले आहे. मला शेतीची आवड आहे. नोकरीतून जशी सवड मिळेल तसा मी शेतीसाठी वेळ देतो. माझा विचार होता, नोकरी सोडावी. तसा मी राजीनामाही दिला होता. त्या वेळी माझी बदली फारच दूर झाली होती. आता बदलीची नोकरी म्हटल्यावर बदली ही होणारच. माझी बदली नियमाप्रमाणे झाली होती. मनात विचार आला शेतीकडेच पूर्ण लक्ष देता येईल. मला तर ही संधीच वाटली.
Saturday, May 11, 2013 AT 03:45 AM (IST)
आम्ही चार भाऊ एकत्र आहोत. एकाच ठिकाणी बारा एकर बागायती शेती आहे. आठ एकर जिरायती आहे. विहिरीचं पाणी बारा एकरपुरतंच पुरतं. या बारा एकरांवर ऊस आहे. उरलेल्या शेतीत ज्वारी, बाजरी, भुईमूग घेतो. एकत्र कुटुंबात एकूण बत्तीसजण आहोत. आई आहे, वडील नाहीत. कुटुंबासाठी लागणारं धान्य, कडधान्यं आठ एकरांतून पुरेल इतकं पिकतं. कोणतंही धान्य विकत घ्यावं लागत नाही. उसामध्येही काही आंतरपिकं घेतो. शेतीखेरीज आम्हाला कोणतंही उत्पन्न नाही.
Friday, May 10, 2013 AT 04:15 AM (IST)
आमच्या भागात पाणीटंचाई आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होतो. काही गावांना तर पंधरवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. गावं हवालदिल झाली आहेत. काही लोक सरकारला दोष देत आहेत पण काही लोक स्वतःला दोष देत आहेत. स्वतःला दोष देणारे फारच थोडे आहेत. त्यांचं एवढंच मत आहे, गावाने जर ठरवलं तर आपल्यापुरतं पाणी आपण साठवू शकतो. काहीजण पूर्वीचं उदाहरण देतात. गावाला मध्यभागी मोठं तळं होतं. होतं म्हणायचं कारण, आता त्यात गाळ पडून पडून ते भरून गेलं आहे.
Thursday, May 09, 2013 AT 03:30 AM (IST)
मला एकच मुलगा आहे. पदवीधर आहे. नोकरी नाही. मला लहान नोकरी आहे. बायकोही काही लहान-मोठी कामं करते. मुलाला चांगली नोकरी मिळणं कठीण आहे. त्याचा प्रयत्न सुरू आहे. मीही त्याला नाराज करीत नाही. मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी करतो. त्याची धडपड सुरू आहे. एक मात्र खरं आहे, तो काही तरी केल्याखेरीज थांबणार नाही, मार्ग शोधतो आहे. त्याला मार्ग सापडेना. एक मी बघतो आहे, तो हरल्यासारखं वागत नाही. तो खचलेला नाही. मी काही तरी करूनच दाखवेन, अशी त्याची धडपड आहे.
Wednesday, May 08, 2013 AT 04:30 AM (IST)
गावातील मोठी शेती जिरायती आहे. केवळ तीन टक्केच बागायती शेती आहे. आमच्या भागात सिंचनवाढीला खारपाण पट्ट्यासारख्या मोठा भाग आहे. तशा मोठ्या नद्याही नाहीत. ज्या काही लहान-सहान नद्या आहेत, त्याही बारमहा वाहत नाहीत. अशा परिस्थितीतूनही आम्ही मार्ग काढला आहे. गावाला पिण्याच्या पाण्याकरिता असलेल्या नळ योजनेतूनही पंधरा दिवसांनी कसेतरी पाणी मिळायचे.
Tuesday, May 07, 2013 AT 04:30 AM (IST)
माझे वडील शिक्षक होते. मीही शिक्षक होतो. मुलगाही शिक्षक आहे. माझा नातू शिक्षक म्हणून नुकताच लागला आहे. माझे वडील आमच्या पंचक्रोशीत चौथीपर्यंत शिकलेले होते. त्यांनी प्रथमच "हॉलिटरी स्कूल' योजनेतून शाळा सुरू केली. मुले आपणच गोळा करायचे. देवळात किंवा सार्वजनिक ठिकाणी शाळा भरवायची. पंचक्रोशीतून त्यांना दहा मुलेही मिळविणे कठीण होते. जे सधन होते, तेही मुलांना शिकवत नसत. त्या काळी कुणब्यांनी कशाला शिकायचं! आपला कामधंदा वेगळा आहे.
Monday, May 06, 2013 AT 04:15 AM (IST)
दवंडी-2 पंचायतीत निवडून गेलो आहे. गावाला ग्रामपंचायत झाल्यापासून आमच्या घरातील पंच आहे. अलीकडेच आम्हाला प्रतिस्पर्धी आहेत. माझ्या आजोबांपर्यंत बिनविरोधच निवडून आले आहेत. माझे वडील पंचवीस वर्षे सरपंच होते. शेवटच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधी उमेदवार उभा राहिला. त्याला अनेकांनी सांगितलं कशाला उभा राहतोस, निवडून येणार तर नाहीस, पण अनामत रक्कमही जप्त होईल. तो एकच म्हणत होता, माझा घराणेशाहीला विरोध आहे. उमेदवाराला माझा विरोध नाही.
Saturday, May 04, 2013 AT 12:45 AM (IST)
विठो माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा।। निवृत्ती हा खांद्यावरी। सोपानाचा हात धरी।। पुढे चाले ज्ञानेश्वर। मागे मुक्ताई सुंदर।। गोराकुंभार मांडीवरी। चोखा जीवाबरोबरी।। बंका कडियेवरी। नामा करांगुळी धरी।। जनी म्हणे गोपाळा। करी भक्तांचा सोहळा।। संत जनाबाईंचा हा विठ्ठलपर अभंग सर्वतोमुखी आहे. लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या लेकरांचा मेळा अतिशय चित्रमय शैलीत जनाबाईने वर्णन केला आहे.
Saturday, May 04, 2013 AT 12:45 AM (IST)
- माणूस ठरवू शकेल वनस्पतीची लागवड पद्धती ः कलम, काड्या किंवा बियाणे - वनस्पतीच्या पुनरुत्पादन पद्धतीवर नियंत्रण मिळवणे होणार शक्य वनस्पतीमधील पुनरुत्पादनाच्या लैंगिक आणि अलैंगिक पद्धतींमागील मूलद्रव्यीय सीमारेषा ओळखण्यात आली असून, त्यासाठी कार्यरत जनुक ओळखण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील संशोधक जॉन बाऊमन आणि ..............
Friday, May 03, 2013 AT 12:30 AM (IST)
बायको आजारी आहे. कर्करोग झाला आहे. निदान झाले. ती आता फार दिवसाची सोबती नाही. मी घरजावई आहे. ती एकुलती आहे. मला अजून मूलबाळ नाही. मला दोन भाऊ आहेत. दोघांना वडिलांनी शेती वाटून दिली. मी घरजावई झालो. मला वडिलोपार्जित शेतीत वाटा दिला नाही. अठरा एकर बायकोची शेती आहे. एका ठिकाणी आहे. बागायती आहे. सासरे एक प्रगतिशील शेतकरी होते. त्यांची वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती होती. मेहनत करून त्यांनी एकूण अठरा एकर शेती केली.
Friday, May 03, 2013 AT 12:45 AM (IST)
आमच्या समाजाची गावात दहा-बारा घरं आहेत. पारंपरिक काम धंदा आता तसा चालत नाही. पण कसब असणारे कलाकार आमच्या समाजात आहेत. मोठे मोठे पुढारी, धनिक आमच्याकडून जोडे घेऊन जातात. पायातील जोडा पाहिल्यावर आमच्या परिसरातील कोणीही माणूस कुठून जोडा आणला हे बरोबर ओळखतो. काही घरं चामडी कमावणारे आहेत, काही घरं जोडे तयार करणारी आहेत. पन्नास-साठ वर्षांपूर्वी आमच्या लोकांची ख्याती चमडीची मोड तयार करण्यात होती.
Tuesday, April 30, 2013 AT 04:00 AM (IST)
डॉ. दिगंबर मोकाट, संजय भावे घर, बंगला, इमारत परिसर इ. ठिकाणी निरनिराळी झाडे लावून परिसर सुशोभित केला जातो. यासाठी बऱ्याचदा सौंदर्यदायक, अल्हादपूर्ण, सुंदर वनस्पतींची निवड केली जाते. घर परिसर सुशोभित करतेवेळी आपल्या परिसरात मिळणाऱ्या उपयुक्त, औषधी वनस्पतींची लागवड करून आपले व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करून घेता येईल.
Saturday, April 27, 2013 AT 04:00 AM (IST)
सातारा  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. 25) हिरवी मिरची, आले तेजीत होते. हिरव्या मिरचीची 25 क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस प्रति दहा किलोस 300 ते 320 रुपये दर होता. हिरव्या मिरचीस प्रति दहा किलो मागे 50 रुपयांची दरवाढ झाली होती. आल्याची 60 क्विंटल आवक झाली. आल्यास प्रति दहा किलोस 400 ते 650 रुपये दर होता. आल्यास प्रति दहा किलो मागे 30 रुपयांची दरवाढ झाली होती. बाजार समितीत फ्लॉवरची 49 क्विंटल आवक झाली.
Friday, April 26, 2013 AT 04:15 AM (IST)
मुलगी यंदा दहावीला आहे. हुशार आहे. चांगले गुण मिळवून पास होणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. मला तिला पुढे शिक्षण द्यायचं आहे. मला एकच मुलगी आहे. माझी ऐपत मुलीला शिक्षण देण्याची आहे. आमच्याकडे आता मुली पदवीपर्यंत सहज शिक्षण घेत आहेत. तीन मैलांवर कॉलेज निघालं आहे. कॉलेजला जाण्या-येण्यासाठी बरीच वाहनं आहेत. हे अंतर पायीही जाता येतं. पूर्वी नव्हे, तर काल- परवापर्यंत गावचे लोक बाजारासाठी पायीच जात असत.
Friday, April 26, 2013 AT 04:15 AM (IST)
मुलाने मला सांगितले आहे तुमचे दुकान मी चालविणार नाही. तुम्ही किती धंदा वाढवायचा हे आताच ठरवा. बाप साठी उलटून गेला आहे. चाळिशी उलटल्यावर तिसऱ्या बायकोपासून मुलगा झाला. तिन्ही बायकांनी मुलाला लाडात वाढविले आहे. विशी उलटून गेल्यावर मुलाने धंद्यात लक्ष घालावे अशी बापाची इच्छा होती गेली तीन पिढ्या दुकानदारी आहे. सगळ्या परिसरात दुकानाचा लौकिक आहे. खात्रीने माल मिळतो ही ख्याती आहे. गेल्या तीन पिढ्यांनी यात वाढ केली आहे. केवळ धंद्यात वाढ केली असे नाही.
Thursday, April 25, 2013 AT 04:15 AM (IST)
बायको सारखे माझ्या मागे लागली आहे. मुलगा शाळेत जातो आहे, चौथीला आहे, शाळा घराजवळच आहे. माझी सरकारी नोकरी आहे. बरेच दिवस मी बाहेर फिरतीवरच असतो. आजपर्यंत मुलामुळे तिचा वेळ जात होता. आता मुलगा सगळी स्वत:ची काम स्वत:च करतो, माझी त्याला सवय लागली आहे. मी माझी सगळी कामे स्वत:च करतो. माझी कपडे मीच धुलाई करतो, बुटांना पॉलिश मीच करतो, जेवल्यानंतर माझे ताट मीच धुतो, ताटात अन्न कधीच शिल्लक ठेवत नाही. माझं बघून मुलगाही असाच वागतो, त्याला आता कळू लागलं आहे.
Tuesday, April 23, 2013 AT 04:00 AM (IST)
गावातील काही ठराविक लोकांची बैठक बोलावली आहे. गावात अठरा पगड जाती- जमाती आहे. गाव तर पहिल्यापासून पुढारलेलं आहे. कोणतीही नवी गोष्ट पहिल्यांदा गावात सुरू झाली आहे. याचे कारण पूर्वीपासूनच गावातील पुढारी चांगले आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा पायंडा आहे. याचा अर्थ असा नाही गावात काही वाद होत नाहीत, भांडण- तंटा होत नाहीत असं नाही. इतर गावांसारखे याही गोष्टी गावात घडते. माणूस हा जेथून तेथून सारखाच आहे.
Monday, April 22, 2013 AT 03:45 AM (IST)
चार भाऊ वेगळे झाले. कधी तरी हे घडणारच होते. ते घडले, बहिणीचा वाटा बहिणीला दिला नाही. तिच्याकडून वाटा नको असं लिहून घेतलं होतं. तिलाही वाटलं आपलं तर सगळं चांगलं आहे. बापाने चांगलं स्थळ बघून लग्न लावून दिले. सासरही चांगलं आहे. त्यांचीही काही तक्रार नाही. वडील वारल्यानंतर हे वेगळे झाले. वडील होते तोवर वेगळं होणं शक्यच नव्हतं. त्यांनाही ठाऊक होते. आपली मुलं एकत्र राहणार नाहीत. एकत्र राहण्यासाठी काही गुण अंगी लागतात.
Saturday, April 20, 2013 AT 04:30 AM (IST)
मला एकच मुलगा आहे. हुशार आहे. मला सरकारी नोकरी आहे. नोकरी बदलीची आहे. दर तीन वर्षांनी बदली होते. गावी आठ एकर शेती आहे. बागायती आहे. वडील गावातील सेवा सोसायटीत नोकरी करतात. सोसयटीची त्यांनी प्रगती केली आहे. सोसायटी तशी स्वतंत्र्य पूर्वकालीन आहे. ज्या काळी सहकारी चळवळीचा इतका प्रसारही नव्हता. गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या गरजांवर आधारलेली सोसायटी सुरू केली. त्याचा गावच्या शेतकऱ्यांना बराच लाभ झाला.
Friday, April 19, 2013 AT 03:30 AM (IST)
आम्ही नवरा-बायको शिक्षक आहोत. आम्हाला तीन मुली आहेत. मी याच महिन्यात नोकरीतून निवृत्त होत आहे. बायकोची नोकरी अजून काही वर्षे आहे. आमची सगळी नोकरी आमच्या गावाबाहेरच झाली. गावात बदली करून घेणं कठीण नव्हतं. तशी मला गावकऱ्यांनी विचारणा केली होती. बायकोची तशीच इच्छा होती. आमची दोन भावांत तेरा एकर शेती आहे. भाऊ लहान आहे, तो गावाशेजारच्या साखर कारखान्याचा शेती अधिकारी आहे, माझ्याहून सहा वर्षांनी लहान आहे.
Thursday, April 18, 2013 AT 04:00 AM (IST)
|