दवंडी शंकर सकाळी आला. खरंतर तो सकाळी कधी येत नाही. सकाळ झाली की तो शेतातच दिसणार! शेतात काम असो अगर नसो, तो सकाळी उठून शेतातच जातो. तो नेहमी सांगतो. शेतात गेल्यावर शेत काम सांगत. शंकर आल्यावर नारायणने विचारले- "सकाळी सकाळी येणं झालं?' शंकर आणि नारायणची दोस्ती आहे. ते नेहमी एकमेकांच्या सल्ल्यानेच काम करतात. दोघेही मेहनती आहेत. एका जातीचे नाहीत तरी एकमेकांचे घरगुती कार्यक्रम दोघांशिवाय कधी झाले नाहीत.
निवडणुकीत मतदानच करायचं नाही, असा विचार गावातील काहींचा सुरू आहे. याचं कारण आहे, गावातील काहींचं म्हणणं असं आहे, की आपण जरी मतदान केलं नाही, तरी निवडणूक ही होणारच आहे. गाव आणि महामार्ग यांना जोडणारा कच्चा रस्ता आहे. तो रस्ता पक्का करून देतो, असं आश्वासन पूर्वी निवडून आलेल्या उमेदवारांनी दिलं होतं. ते आता निवडणूक लढविणार नाहीत. त्यांच्या पक्षाने त्यांना उभंच केलं नाही. दुसरा उमेदवार उभा आहे. तो तरुण आहे.
आजपर्यंत गरीब मुलांना गावाने मदत केली आहे. गावाने एक कायमस्वरूपी फंड गोळा केला आहे. शिक्षणासाठी पैसा कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. पूर्वी मदत केली जात होती, ती लगेच बदलली गेली. जे पैसे दिले जातील, त्याची व्याजासह परतफेड करावी लागते. आपल्या गरजेला पैसे मिळाले. पुढे ज्यांना गरज आहे, त्यांनाही मदत मिळाली पाहिजे. बॅंका ज्यांची पत आहे त्यांनाच कर्ज देतात, कारण कर्ज फेडण्याची त्यांची पत असली पाहिजे पण गरीब मुलांना पत असत नाही.
बारा एकर शेती आहे. एका ठिकाणी आहे. सगळी शेती पाण्याखाली आहे. काळीभोर शेती आहे. दोन विहिरी आहेत. वडिलांना काळजी पडली आहे. आपल्यानंतर ही शेती कोण कसणार? पाच मुलं आहेत. सगळी मुलं शिकून शहरात नोकरी करतात. मुलांना चांगली नोकरी आहे. सगळ्यात मोठा मुलगा पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे. वडिलांना वाटलं होतं. तो निवृत्त झाल्यावर शेतावर येऊन राहील. त्याने आताच सांगून टाकलं आहे.
नोकरी होती. पगार चांगला होता. वाढत जाणारा होता. तरी त्याला वाटायचं, आपण काही उद्योग - व्यवसाय करावा. नोकरी चाकोरीतील आहे. नोकरीत पगार नियमित मिळतो. कामही ठराविक आहे. तशी काही तसदी नाही. पाच वर्षे अशीच गेली. विचार करण्यात गेली. बायकोला वाटायचं, नोकरी सोडू नये. तिला नोकरी करणारा नवरा हा सुरक्षित वाटतो. तिला वाटतं, उद्योग - व्यवसायात माणूस गढून जातो. त्याला रात्रंदिवस धंद्याची चिंता असते. यात धोकाही असतो. काही लोक धंद्यात बुडले आहेत.
अलीकडे एक विचार सुरू झाला आहे. ज्या प्रमाणे शहरातील वृद्धांसाठी वृद्धाश्रम असतात. तसेच वृद्धाश्रम गावात सुरू करायचे. अलीकडे वयही वाढत आहे. वृद्धाची संख्याही वाढत आहे. दोन प्रकारचे वृद्ध गावात आहे. काहींना काही आधार आहे. काहींची अवस्था वाईट आहे. जे मजुरी करीत होते. भूमिहीन होते. त्यांची मुले कर्तबगार निघाली नाहीत, असेही आहेत. काही शेतमजूर होते, पण त्यांची मुले शिकून नोकरी-धंद्यात जम बसवून आहे. ही संख्या मोठी आहे.
सरपंचांनी पंचायती बैठक बोलावली होती. ही काही नियमित बैठक नव्हती. तातडीची बैठक होती. सरपंचांना सुगावा लागला होता. गावातील एका प्रतिष्ठित घराण्यातील मुलगी गावातील एका मागासलेल्या वर्गातील मुलाशी लग्न करणार आहे. दोघेही शहरात शिक्षणासाठी असतात. मुलाची आई गावात असते. मोलमजुरी करते. मुलगा हुशार आहे. शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेला आहे. त्याला भविष्यकाळही उज्ज्वल आहे. त्यामुळे मुलीने स्वतःच त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा भाऊ वेगळे राहतात. वडिलांनीच खातेफोड केली आहे. एकूण तीस एकर शेती आहे. एका ठिकाणी आहे. दोन विहिरी आहेत. विहिरींना भरपूर पाणी आहे. मोठ्या भावाला एकच मुलगी आहे. तिचे लग्न होऊनही बारा वर्षे झाली. लेक वारसाप्रमाणे तिला शेती मिळू शकते. तीच वारस आहे. बाकीच्या पाच भावांना मुलगे आहेत. मुलगी कोणालाही नाही. सगळी मुले पदवीधर आहेत. चौघे सरकारी नोकरीत आहेत. चार भाऊ एकत्र व्यवसाय चालवतात. त्यातील एक इंजिनिअर आहे. त्याने सात वर्षे कंपनीत नोकरी केली.
केले नाही मनी तया घडे त्याग । उबग उद्वेग नाही चित्ती ।। देवचि हा जाणे अंतरीच्या भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ।।धृ।। त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी । अवघी ते परी विटंबना ।। तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हा ।। एका बाजूला धर्माच्या नावाखाली राजरोसपणे विषयोपगभोग घेणाऱ्या तंत्रमार्गातील साधकांचा सुळसुळाट झालेला असताना, दुसऱ्या बाजूला काही वैराग्यमार्गाचा पुरस्कार करीत सर्व विषयांचा त्याग करू पाहणारे काही लोकही अस ...
घरात शिकलेली नवी सून आली आहे. घरात अजूनही आजीचा शब्दच मानला जातो. आजीच अजून सगळे निर्णय घेते. तिने आता सत्तरी गाठली आहे. तरी कोणीच म्हणणार नाही ती सत्तरीत आहे. चाळिशीला लाजवेल अशी तिची काम करण्याची पद्धत आहे. तिला सात मुले आहेत. सगळ्या मुलांची लग्ने झाली आहेत. नातवांचीही लग्ने झाली आहेत. लहान मुलाच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. तोही पदवीधर आहे. आजीने आपल्या माहेरच्या मुलीशी त्याचे लग्न ठरवले.
रानातून आला. दुपारची वेळ होती. उसाला पाणी पाजण्यासाठी गेला होता. आठवड्यातून दोन वेळा वीज येते. विहिरीवर दोन एकर ऊस लावला आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे, पण वेळेला वीज नसते. काय करावे हे कळेना. विहिरीत पाणी आहे, ऊस मात्र वाळतो आहे. यंदा रोपाने उसाची लागण केली आहे. गावात अजून कोणी रोपाने उसाची लावण केली नव्हती. सखारामची तशी चारच एकर शेती आहे. चुलत भावाची सहा एकर, त्याला लागून शेती आहे. चुलत भाऊ नोकरीला आहे. सरकारी नोकरी आहे. बदलीची नोकरी आहे.
दवंडी बापाला वाटत आहे, मुलाला निवडणुकीला उभं करावं. आपली परंपरा मुलानं चालवावी. मुलाला राजकारणाची आवड नाही. मुलगा एकमार्गी आहे. त्याला वाटते राजकारणात अनेकदा आपल्या इच्छेविरुद्ध काम करावे लागते. अनेक तडजोडी कराव्या लागतात. आपण आज जे बोललो, ते उद्या आपण बोललोच नाही, असं सांगावं लागतं. अलीकडे सगळं टेप केलं जातं, तरी मला असं म्हणायचं नाही. असं सांगावं लागतं. वेळ मारून न्यावी लागते. यातून कोणीच चुकत नाही.
गावातील एका मुलाला सरकारी नोकरी मिळाली. नोकरी कारकुनाची आहे. मुलगा गरीब कुटुंबातला आहे. मागासलेल्या जातीमधील आहे. मागासलेल्या जातीतील आहे, यामुळे निवड झालेली नाही. खुल्या गटातून निवडला गेला आहे. तसा फार हुशार नाही. मेहनती आहे. मेहनतीचे हे फळ आहे. त्याचे अनेकांना कौतुक वाटत आहे. याचे कारण अलीकडे सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे. कारकुनाच्या जागा तर कमी कमी होत आहेत. एके दिवशी कुठल्याच कार्यालयात कारकून दिसणार नाही. हे तर आता सगळ्यांनाच कळले आहे.
नवरा जाऊन एक वर्ष झालं. त्याचा शोध सगळीकडे घेतला. त्याचा पत्ता काही अजून लागलेला नाही. जाताना सांगून गेला होता. बरोबर कोणीच नव्हतं, पण जाताना बोलला होता. मी येणार नाही, माझी वाट बघू नका. हे काही तो पहिल्यांदा बोललेला नाही, असं तो वारंवार बोलत होता. रोजचं मढं त्याला कोण रडं, तसं तो जरी तसं बोलला तरी त्याचे बोलणे गंभीरपणे बायको घेत नव्हती. लहान वयापासून त्याचा अध्यात्माकडे ओढा होता. आपण संसार करावा, असं त्याला वाटलंच नाही.
गावात एक सार्वजनिक तळे आहे. तळे फारच जुने असावे, कारण जुन्या वळणाचे सभोवताली बांधकाम आहे. अलीकडे त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तळ्यात गाळ साचून आता तळेही पूर्णपणे बुजले आहे. एवढेच नव्हे तर या जागेवर तळे होते असे जर सांगितले तर लगेच कळणार नाही. याचे कारण तळ्याच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तळ्यावर बेकायदेशीर बांधकामेही झाली आहेत. तळ्याचे सगळे अवशेष आता जमिनीखाली गेलेले आहेत. तळ्यावर आता वस्ती वसली आहे.
मुलगा शिकला आहे. नोकरीच्या शोधात आहे. नोकरी काही मिळेना. अनेक नोकऱ्या आहेत. नोकरांची गरज आहे, तरी याला नोकरी मिळेना. पदवीधर आहे. याला कारकुनाची नोकरी हवी आहे. सगळीकडे भरती सुरू आहे. एका कारकुनाची जागा असते, हजारो अर्ज येतात. आता तंत्रज्ञान बदललं आहे. नवं तंत्रज्ञान आलं आहे. कारकुनांची गरज कमी झाली आहे. पूर्वी पोरं शिकत असत, कारकून बनत असत. सगळं शिक्षण कारकून तयार करण्यासाठी दिलं जात होतं. कारकुनांची मोठ्या प्रमाणात तेव्हा गरज होती.
एकुलता एक मुलगा आहे. चारचौघांसारखा आहे. जशी अनेक मुलं पदवीधर होतात, तसा हाही पदवीधर झाला आहे. घर सुखवस्तू आहे. वडिलोपार्जित मिळकत आहे. गेल्या दोन पिढ्यांत त्यात भर पडली नाही, तरी आहे ती मिळकत टिकवून ठेवली आहे. अनेकांनी वडिलोपार्जित मिळकत घालविली आहे. तसं तरी निदान यांनी केलेलं नाही. वडिलोपार्जित शेतीमधील सोळा एकर शेती आता वाट्याला आली आहे. पाच भावांत वाटणी होऊन सोळा एकरचा एक ठिकाणचा मळा वाट्याला आला आहे. दोन विहिरी आहेत. विहिरींना भरपूर पाणी आहे.
नव्हे शब्द एकदेशी । सांडी गवशी कोणाला ।। झाली माझी वैखरी । विश्वभरी व्यापक ।। धृ ।। मोकलिले जावे बाणे । भाता जेणे वाईले ।। आता येथे कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ।। कीर्तनाच्या माध्यमातून जगाला उपदेश करणे हे तुकोबांनी आपले जीवितकार्य किंबहुना जीवनव्रत मानले होते. कीर्तनातून ते ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, कबीर अशा आपल्या पूर्वसुरी संतांच्या वचनांचा उपयोग करीत असत पण त्याचबरोबर ते आपण स्वतः रचलेल्या अभंगांचाही आधार घेत.
काका पंचायत समितीचा सभापती आहे. मठातील महंताचा आशीर्वाद आहे. मठामध्येच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. घरची गरिबी असल्याने पुढचे शिक्षण झाले नाही. पण धडपड्या स्वभाव होता. प्रतिस्पर्ध्यावर सरळ चाल करून जात असे. धाडसी होता. मजुरी करून कष्टाने वर आला. शेतीवाडीही कमवली. यासाठी वीस वर्षे गेली. सगळं काही कष्टाने मिळालं आहे. धडाडी आहे. अंगी नेतृत्वाचे गुण आहेत. हे गुण उपजतच आहेत. गावातील मोठ्या बागायतदाराविरुद्ध पंचायतीची प्रथम निवडणूक लढविणे.
गावात एक विधवा आहे. तिचा नवरा पोलिस होता. चकमकीत मारला गेला, असं खात्याने सांगितलं. जरी मारला गेला, तरी त्याचं प्रेत काही खात्यालाही मिळालं नाही. काय घडलं याविषयी निश्चित माहिती काही मिळाली नाही. मारला गेला की त्याचं अपहरण केलं, याविषयी चौकशी सुरू होती. त्या चौकशीचं काय झालं याविषयी माहिती मिळाली नाही. एका सामान्य शिपायाची तशी कोण दखल घेणार! पण सरकारला असं करून चालत नाही. तो देशाची सेवा करताना हे घडलं आहे.
गावात सरकारी शाळा आहे. सगळीच मुलं शाळेत जात नाही. जी मुलं शाळेत जात नाहीत, अशी मुलं गरिबाघरची आहेत. याशिवाय काही जमाती काही काळासाठी गावात येतात. ते फिरस्ते आहेत. त्यांची मुलेही शाळेत जात नाहीत. सगळ्या मुलांना शाळेत घालण्यासाठी शाळेचे शिक्षक झटत आहेत. त्यांना गावातील लोकांचेही सहकार्य पाहिजे. पण गावचे जेवढ्या प्रमाणात सहकार्य हवे, तेवढे मिळत नाही. शाळेच्या सुधारणेसाठी कमिटी आहे. कमिटीची बैठक कागदोपत्री होते.
ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे अभिलेखातील सामान्यांचे हक्क व कर्तव्ये प्रस्थापित हक्क नोंदवही ही गाव पातळीवर तलाठ्याने ठेवायची असते. यात शेतकरी / बिगर शेतकरी यांच्या खासगी हक्कांची सर्वसमावेशक नोंद दैनंदिन स्वरूपात ठेवायची असते. हक्कामध्ये कोणत्याही प्रकारचे झालेले बदल हे त्या त्या वेळीच नोंदवायचे असतात.
मंदिरात बैठक झाली. बैठकीला मोजकेच लोक होते. बोलवताना ठराविकच बोलवले होते. गाव बागायती आहे. उसाचे पीक चांगले येते. आता अलीकडे द्राक्षांकडेही शेतकरी वळले आहेत. माळावर फळझाडेही लावली आहेत. एकाने फुलशेती केली आहे. जो तो कशात प्रगती होईल याचा विचार करून पावलं टाकतो आहे. याला एक कारण आहे, निसर्गाचा वरदहस्त आहे. गावाशेजारून बारमाही वाहणारी नदी आहे. वरती धरण झालं आहे. धरणामुळे आमच्या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बारमाही भरपूर पाणीपुरवठा होत आहे.
घरात लग्नाची दोन मुलं आहेत. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगा लहान आहे. मुलगी मोठी आहे. अलीकडेच मुलांची आई वारली आहे. अशी एक प्रथा आहे, घरातील वडीलमाणूस वारल्यानंतर त्या वर्षीच लग्न करावं, नाही तर तीन वर्षे लग्न करता येत नाही. आता ही जुनी प्रथा सगळेच काही पाळत नाहीत. त्याचा पगडा जरी असला, तरी लोक आपली खरी सोय काय, हे बघू लागले आहेत. ही तर एक चांगली बाजू आहे. अनेकदा सामान्य माणसावर नेहमीच आरोप केला जातो, सर्वसामान्यांवर अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे.
गावात एक दक्षता समिती आहे. या समितीत गावातील सगळ्या जाती-जमातीतील लोक आहेत. गावात अठरा पगड जाती-जमातींचे लोक आहेत. काही जाती-जमातीचे एकच घर आहे. मोठ्या जातीही आहेत. मोठ्या जातीमधील लोक एकाचे नेतृत्व कधीच स्वीकारत नाहीत. त्यांच्यात गट असतात. त्यांच्यात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात. अलीकडे समिती सर्वसमावेशक करण्यासाठी सगळ्याचा विचार करावा लागतो. एवढं जरी केलं तरी काहींचा विरोध राहतो. काही तर एकामेकांचं तोंडही बघत नाहीत.
अलीकडे गावात एक सभा झाली. सभा निवडणुकीची होती. फार लोक जमले नाहीत. प्रचाराला जोर चढला आहे. ज्याची सभा होती तो अपक्ष होता. सभेला लोक जमले नाहीत, तो नाराज झाला नाही. सभा भरवणं एक तंत्र आहे, एक शास्त्र आहे. उमेदवार अपक्ष आहे. नवखा आहे. राजकारणातले खाचखळगे ठाऊक नाहीत. पदवीधर आहे. समाजकार्य या विषयातील पदवी मिळविली आहे. राज्यशास्त्र विषयात विद्यापीठात सर्वप्रथम आला आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास चांगला आहे.
शहाणपणे वेद मुका । गोपिका त्या ताकटी ।। कैसे येथे कैसे तेथे । शहाणे ते जाणती ।।धृ।। यज्ञ मुखे खोड्या काढी । कोण गोडी बोरांची ।। तुका म्हणे भावाविण । अवघा शीण केला तो ।। तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्वांत जाणता म्हणून नावाजला गेलेला वेद एका बाजूला आणि अशिक्षित, अडाणी असंस्कारित गवळणी दुसऱ्या बाजूला असा विरोध लक्षात घेऊन विचार केला तर असे दिसून येते, की देवाच्या दरबारात वेदांपेक्षा गोपिकांनाच अधिक महत्त्व आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. सगळीकडेच निवडणुका अटीतटीच्या आहेत. आता कोणालाही असे छातीवर हात ठेवून सांगता येईल, मी नक्की निवडून येईन, मतदारासाठी भरपूर कार्य करणाऱ्यांनाही आता तशी खात्री नाही. यात काही नवल नाही, आता केवळ जातीच्या मतावर निवडून येऊ याचीही खात्री राहिली नाही. भले भले ही मैदानात उतरताना धास्तावले आहेत. काहींना वाटत होते. मत पैसे देऊन विकत घेता येतात. आता तर परिस्थिती अशी तयार झाली आहे. पैसे घेतील पण मत देतीलच असे नाही.
जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. सगळीकडेच निवडणुका अटीतटीच्या आहेत. आता कोणालाही असे छातीवर हात ठेवून सांगता येईल, मी नक्की निवडून येईन, मतदारासाठी भरपूर कार्य करणाऱ्यांनाही आता तशी खात्री नाही. यात काही नवल नाही, आता केवळ जातीच्या मतावर निवडून येऊ याचीही खात्री राहिली नाही. भले भले ही मैदानात उतरताना धास्तावले आहेत. काहींना वाटत होते. मत पैसे देऊन विकत घेता येतात. आता तर परिस्थिती अशी तयार झाली आहे. पैसे घेतील पण मत देतीलच असे नाही.
सध्या वापरात असलेल्या इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणातील कर्बवायूच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जैवइंधनाचा पर्याय शोधला जात आहे. त्याच मालिकेतील शैवाल तेलाचाही समावेश आहे. मात्र या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सल्फरयुक्त उत्प्रेरकामुळे अनेक अडचणी उद्भवतात. या अडचणी कमी करण्यासाठी आदर्श मानता येईल असा निकेल आधारित उत्प्रेरक विकसित करण्यात जर्मनीतील म्युनचेन तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक जोहान्स ए.
एकाचिये घाट्या टोके। एक फिके उपचार।। ऐसी सवे गोवळिया। भाव तया पढियंता।।धृ।। एकाचे ते उच्छिष्ट खाय। एका जाय ठकवूनि।। तुका म्हणे बहु सोपे। बहु रूपे अनंत।। एकच देव वेगवेगळ्या साधकांबरोबर, भक्तांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने कसा आणि का वागतो या आश्चर्याचे तुकोबा प्रस्तुत अभंगामधून स्पष्टीकरण करतात. वस्तुतः देवाला सर्व भक्त सारखेच, पण तरीही त्याने "मे यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्' असा इशारा गीतेच्या माध्यमातून देऊन ठेवला आहे.