|
प्रादेशिक
सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ सर्व प्रकल्पांची शेतकरी गटांमार्फत होणार अंमलबजावणी पुणे - अन्नसुरक्षा अभियानांतर्गत राज्यात कडधान्य अभियान राबविण्यासाठी यंदा 114 कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत खरिपात तूर, मूग व उडीद तर रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या उत्पादकतावाढीसाठी शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
Thursday, June 20, 2013 AT 05:30 AM (IST)
एक लाख हेक्टरला मिळणार लाभ 42,300 हेक्टरवर प्रात्यक्षिके 71 हजार हेक्टरला अनुदानावर निविष्ठा पुणे  - राज्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी भात उत्पादकता असलेल्या नाशिक, पुणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत यंदा "राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना' अंतर्गत भात उत्पादकतावाढ अभियान राबविण्यात येणार आहे.
Wednesday, June 19, 2013 AT 05:30 AM (IST)
जुलै- ऑगस्टमध्ये अंमलबजावणी शेतकरी गट, ग्रामपंचायतींच्या सहभागातून होणार उद्दिष्ट साध्य पुणे  - राज्यातील सुमारे पाच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र व्यापणाऱ्या आणि पीक उत्पादनघटीस कारणीभूत ठरणाऱ्या गाजर गवताच्या निर्मूलनासाठी येत्या जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यभर व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट, शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींच्या सहभागातून गाजर गवताचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे.
Tuesday, June 18, 2013 AT 05:30 AM (IST)
सातारा  - जिल्ह्यातील 251 गावे आणि 928 वाड्यांतील चार लाख 69 हजार 545 लोकसंख्येला 321 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस सुरू झाल्याने टॅंकरच्या संख्येत घट होऊ लागली असून पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर तालुक्यांत टॅंकर बंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली आहे. जिल्ह्यात माण तालुक्यात 132 टॅंकरने 90 गावे व 491 वाड्यावस्त्यांतील एक लाख 50 हजार 937 लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Tuesday, June 18, 2013 AT 05:15 AM (IST)
कृषिमंत्री शरद पवार : यशस्विनी अभियानाच्या "निर्धार' कार्यशाळेचा समारोप नाशिक (प्रतिनिधी) : पारंपरिक भ्रामक कल्पना सोडून देत व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञानाची कास धरा आणि आत्मविश्वासाने जगा, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महिलांना दिला. येथील सपकाळ नॉलेज हबमध्ये शुक्रवारी (ता. 14) झालेल्या यशस्विनी अभियानाच्या "निर्धार' कार्यशाळेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी श्री.
Sunday, June 16, 2013 AT 12:15 AM (IST)
राज्यात सहा हजार एकरवर होणार सघन कापूस उत्पादन प्रात्यक्षिके पुणे (प्रतिनिधी) ः कापूस तंत्रज्ञान अभियानांतर्गत राज्यातील कापूस उत्पादक 19 जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादकतावाढ, सघन कापूस लागवड व एकात्मिक कीड नियंत्रणाला चालना देण्यासाठी चालू खरिपात 24 हजार हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक कापूस विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी 43 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
सातारा (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात सुरू असलेल्या 130 चारा छावण्यांमध्ये एक लाख एक हजार 884 जनावरे आहेत. यात सर्वाधिक माण तालुक्यातील 65 छावण्यांमध्ये जवळपास 54 हजार 377 जनावरे असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
सातारा  - जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया केल्याने खतांची बचत होते, तसेच पीक उत्पादनात चांगली वाढ होते, त्यामुळे बीजप्रक्रिया आवश्यक असल्याची माहिती कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी दिली. कृषी विभागामार्फत उत्पादनवाढीसाठी शंभर टक्के बीजप्रक्रिया या मोहिमेचा प्रारंभ अतित (जि. सातारा) येथील शेतकरी दादासाहेब जाधव, विजय जाधव यांच्या शेतात झाला, या वेळी बीजप्रक्रियचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
Friday, June 14, 2013 AT 05:30 AM (IST)
30 ते 60 हजार रुपये संरक्षण सहभागाची अंतिम मुदत 20 जून पुणे  - मृग बहराचे उत्पादन घेण्यात येणाऱ्या संत्रा, मोसंबी, पेरू व चिकू पिकासाठी पुढील चार महिने हवामानाधारित पथदर्शक फळपीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, तापमान व सापेक्ष आर्द्रता यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना हेक्टरी 30 ते 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
Friday, June 14, 2013 AT 05:00 AM (IST)
44 हजार हेक्टरवर उत्पादकतावाढ प्रकल्प 27 कोटी 30 लाख रुपयांची तरतूद पुणे  - राज्यात तेलबियांची उत्पादकता कमी असलेल्या 19 जिल्ह्यांमध्ये खरिपात सोयाबीन, भुईमूग व करडई पिकांसाठी गळित धान्य उत्पादन कार्यक्रम राबविण्यास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सुमारे 44 हजार हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी 27 कोटी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशी होणार अंमलबजावणी...
Thursday, June 13, 2013 AT 05:45 AM (IST)
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग  - जिल्ह्यात बुधवारी (ता. 12) पावसाने विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर वाढला होता. मंगळवारी (ता. 11) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. दोन दिवसांत किरकोळ नुकसान झाले. आतापर्यंत पावसामुळे खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे मिळून सुमारे दहा लाखांपर्यंत नुकसान झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता.
Thursday, June 13, 2013 AT 05:30 AM (IST)
उत्पादकांना एक ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत अंमलबजावणी पुणे  - खरीप पिकांच्या दर्जेदार बियाणे उत्पादनासाठी कृषी विभागामार्फत यंदाच्या खरिपात बीजोत्पादन अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध योजनांमधून बीजोत्पादनासाठी एक ते तीन हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. असे मिळणार अनुदान...
Wednesday, June 12, 2013 AT 05:30 AM (IST)
कुलगुरू डॉ. मोरे : हवामान विभागानुसार कृषी आराखडा कोल्हापूर  - कृषी हवामान विभागानुसार जिल्ह्याचा कृषी विकास आराखडा तयार होणार आहे. शासकीय कृषी धोरण ठरविताना शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी येथे सांगितले. कृषी महाविद्यालयातर्फे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी व प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत डॉ. मोरे बोलत होते. डॉ.
Wednesday, June 12, 2013 AT 05:30 AM (IST)
राधाकृष्ण विखे पाटील  - इतर राज्यांत द्राक्ष विक्री केंद्रे उघडण्याचा प्रयत्न नाशिक  - दरवर्षी शिवारसौद्यात द्राक्ष उत्पादकांचे पैसे घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यासंदर्भात येत्या हंगामापासून कडक पावले उचलण्यात येणार आहेत. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
Wednesday, June 12, 2013 AT 04:30 AM (IST)
इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक जोर, तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)  - ठाणे  - कल्याण 259, अंबरनाथ 223.5, मोखाडा 213, ठाणे 219, भिवंडी 210, डहाणू 195.6, उल्हासनगर 186, वसई 164, वाडा 132, शहापूर 132, पालघर 137.6, जव्हार 78, मुरबाड 55, विक्रमगड 78.2 पुणे  - राज्यात बुधवार (ता.
Tuesday, June 11, 2013 AT 05:15 AM (IST)
दुष्काळाच्या वेदनांना मागे सारून पेरण्यांना आला वेग औरंगाबाद - मराठवाड्यात औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत रविवारी (ता. 9) पावसाने जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 60 मिलिमीटर, तर जालन्यात 56 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने दुष्काळाच्या वेदनांना मागे सारून शेतकरी खरीप पेरण्यांचे नियोजन करू लागला आहे.
Tuesday, June 11, 2013 AT 05:15 AM (IST)
सातारा  - सातारा जिल्ह्यात रविवारी (ता. 9) सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. 10) सकाळी साडेआठपर्यंत पश्चिम भागात चांगला पाऊस झाला होता. महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, जिल्ह्यात सरासरी 13.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, जावळी, सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांत पावसाचा जोर कायम आहे. दिवसभर पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येत होत्या.
Tuesday, June 11, 2013 AT 04:45 AM (IST)
रत्नागिरी  - मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर शनिवार (ता. 8)पासून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या मोसमी पावसाची संततधार सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. एक जूनपासून जिल्ह्यात झालेल्या सरासरी पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चौपट वाढ नोंदविली आहे. गेल्या वर्षी 10 जूनपर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये सरासरी 83.5 मि.मी. पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी एक जूनपासून 351.3 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Tuesday, June 11, 2013 AT 04:45 AM (IST)
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग  - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे जिल्हाभर खरिपाच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. रात्रभराच्या संततधारेनंतर सकाळीही पावसाने झोड उठविली. जिल्ह्यात सुमारे 75 हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. यासाठीच्या रोपवाटिका बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. लागवड करायच्या ठिकाणीही नांगरणी सुरू आहे.
Tuesday, June 11, 2013 AT 04:30 AM (IST)
  कृषी विभागाच्या नमुना तपासणीत स्पष्ट सर्व विक्रेत्यांची होणार तपासणी कऱ्हाड, जि. सातारा  - सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात बियाणे, खते, कीटकनाशके यांची नमुना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 29 लाखांचे 55 मेट्रिक टन बियाणे अप्रमाणित आढळले, तर सुमारे नऊ लाख 79 हजारांच्या 25.16 मेट्रिक टन खताला विक्रीबंद आदेश देण्यात आले.
Monday, June 10, 2013 AT 05:15 AM (IST)
केंद्र शासनाची मंजुरी जिल्हानिहाय, पीकनिहाय लक्ष्यांकानुसार अंमलबजावणीचे नियोजन पुणे  - भरडधान्यातील उत्पादकता वाढावी म्हणून केंद्र शासनाने 2011-12 मध्ये सुरू केलेली "भरडधान्य विकास योजना' 2013-14 मध्येही चालू ठेवण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्हानिहाय, पीकनिहाय दिलेल्या लक्ष्यांकानुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले असून, यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Monday, June 10, 2013 AT 05:15 AM (IST)
गडचिरोलीत खरिपाची लगबग सुरू गडचिरोली : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वरुणराजाचे अल्पप्रमाणात का होईना आगमन झाल्याने बळिराजा खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झालेला दिसत आहे. गडचिरोली, अहेरी, आरमोरी, भामरागड, चार्मोशी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मूलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यांत पाऊस झाला आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने उपस्थिती दर्शविली. बऱ्याच भागांत रिमझिम पाऊस कोसळला.
Sunday, June 09, 2013 AT 12:00 AM (IST)
दुष्काळी भागासह मराठवाड्यात समाधानकारक पाऊस राज्याच्या विविध भागांत गुरुवारी (ता. 6) जोरदार पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने दुष्काळी भाग, तसेच मराठवाड्यात समाधानकारक हजेरी लावली. या पावसाने नगर जिल्ह्यात तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. साताऱ्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यात सुमारे अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काही ठिकाणी खरीपपूर्व मशागतींना वेग येणार आहे.
Saturday, June 08, 2013 AT 05:00 AM (IST)
मर रोग प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या गावांत मोठ्या प्रमाणात होणार अंमलबजावणी पुणे  - येत्या खरीप व रब्बी हंगामात (2013-14) जास्तीत जास्त क्षेत्रावर बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. त्यासाठी राज्यात "बीजप्रक्रिया मोहीम' हा कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, बीजप्रक्रिया मोहीम विनाअनुदान तत्त्वावर राबविली जाणार आहे.
Saturday, June 08, 2013 AT 04:30 AM (IST)
कृषी आयुक्तालयाचे आवाहन सोयाबीनच्या क्षेत्र यंदाही वाढण्याचा अंदाज पुणे  - शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले गेल्या दोन वर्षांत उत्पादित सोयाबीन यंदा पेरणीसाठी उपयुक्त आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन घेण्यासाठी घरचे सोयाबीन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा नवीन बियाण्याचा अट्टहास न धरता घरचेच चांगल्या गुणवत्तेचे बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. राज्यात सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 22.
Friday, June 07, 2013 AT 05:00 AM (IST)
जायकवाडीसह आठ मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा औरंगाबाद - मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघु, गोदावरी व मांजरा नदीवरील बंधारे या सर्व प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीसह आठ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाऊस वेळेवर न झाल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Thursday, June 06, 2013 AT 05:00 AM (IST)
खासगी कंपन्यांचा सहभाग 13 जिल्ह्यांत 30 हजार हेक्टरवर पेरणी करणार नगर  - मका उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग व वेगवेगळ्या तीन खासगी कंपनीच्या सहभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये "मूल्य साखळी विकास प्रकल्प' राबविण्यात येणार आहे. सुमारे तीस हजार हेक्टरवर दीडशे प्रकल्पांतून मक्याची पेरणी केली जाणार आहे.
Thursday, June 06, 2013 AT 04:45 AM (IST)
औरंगाबादसह बीड, नांदेड, लातूर- उस्मानाबादला हजेरी वीज पडून चार ठार औरंगाबाद : मराठवाड्याला सोमवारी (ता. 3) वादळी पावसाने झोडपले. औरंगाबाद, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबादेत पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन वेगवेगळ्या घटनांत वीज पडून चार जण ठार झाले. पाचोडला छत कोसळून तिघे आणि वीज पडून दोघे जखमी झाले. या पावसाने काही भागांत मशागतीला वेग आला आहे. औरंगाबाद शहरातही पावसाने मंगळवारी रात्री हजेरी लावली. पाचोड (ता.
Wednesday, June 05, 2013 AT 05:15 AM (IST)
पुणे  - कृषी विभागाने खरिपात प्रभावी गुणवत्ता नियंत्रणासाठी अप्रमाणित नमुने व गैरप्रकारांचा पूर्व इतिहास विचारात घेऊन खत व कीटकनाशक कंपन्यांचे अ, ब, क, ड या चार गटांत वर्गीकरण करून क व ड गटातील 156 कंपन्यांच्या उत्पादनांची काटेकोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील चार महिने गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचा 85 टक्के जोर या कंपन्यांवरच असणार आहे.
Wednesday, June 05, 2013 AT 04:45 AM (IST)
  कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे शिक्षण, संशोधन व विस्ताराचे कार्य राज्याचे कृषी व पणन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर असल्याचे प्रतिपादन, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी एका पत्रकान्वये केले आहे. "ऍग्रोवन'च्या 1 जूनच्या अंकातील "रिक्त जागांमुळे "ऍग्रेस्को'त शिफारशींचा दुष्काळ' या बातमीतील डॉ. मोरे यांची ही प्रतिक्रिया होती.
Wednesday, June 05, 2013 AT 03:45 AM (IST)
मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. नदीकाठची गाळाची जमीन असल्यास अधिक चांगले. लागवडीपूर्वी एक खोल नांगरट करून दोन- तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, त्यामध्ये प्रति हेक्टरी 20 ते 25 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. हिरवळीचे खत दिल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळण्याची गरज नसते. 1) जून ते जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड करावी. पेरणी टोकण पद्धतीने करावी.
Tuesday, June 04, 2013 AT 04:45 AM (IST)
|