﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
  <channel>
    <title>महा-राजकारण</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/Politics.htm</link>
    <description>Politicsagrowon.com © CopyRight Agrowon2011</description>
    <language>en-US</language>
    <pubDate>6/3/2011 2:38:34 PM</pubDate>
    <ttl>60</ttl>
    <image>
      <title>visit http://www.agrowon.com</title>
      <link>htttp://www.agrowon.com</link>
      <url>http://72.78.249.126/Agrowon/images/logo.gif</url>
      <width>253</width>
      <height>64</height>
    </image>
    <item>
    <title>राज्यातील १८ जिल्हा परिषदांत होणार महिला कारभारी</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110604/5454962189657190433.htm</link>
    <description>राज्यभरातील प्रतिनिधींकडून मुंबई : राज्यातील ३३ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (ता. २) मंत्रालयात काढण्यात आली. महिलांना ५० टक्‍के आरक्षण देण्याच्या कायद्यानुसार काढण्यात आलेल्या या सोडतीनुसार राज्यातील १८ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहेत. या अध्यक्षपदाची मुदत अडीच वर्षांची असेल. राज्यातील एकूण ३३ जिल्हा परिषदांपैकी चार अनुसूचित जाती, पाच अनुसूचित जमाती, नऊ इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी, तर १५ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे सर्वसामान्य प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत.  मंत्रालयात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासमोर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव सुधीर ठाकरे, उपसचिव मल्लिकार्जुन कलशेट्टी आणि विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.    नंदुरबारला गावितांचा मार्ग मोकळा  जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी कायम राहिले आहे. जिल्ह्यात ६७ टक्‍के लोकसंख्या आदिवासींची आहे, तसेच ५३ पैकी ३४ सदस्य अनुसूचित जमातीचे आहेत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sat,4 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>राज ठाकरे यांचे शिक्षण कमी - रामदास आठवले</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110603/5243956409420063559.htm</link>
    <description>&lt;img align="left" alt="राज ठाकरे यांचे शिक्षण कमी - रामदास आठवले" border="0" height="86" src="http://72.78.249.126/Agrowon/20110602/images/5151153224462026918/5067055304307100965_Thumb.jpg" style="z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;" width="130" /&gt;मुंबई (प्रतिनिधी) - राज ठाकरे यांचे शिक्षण कमी आहे, म्हणूनच ते काहीही बोलतात, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.   "मातोश्री'च्या शेजारी बंगला बांधून राहणारे रामदास आठवले आता शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करीत आहेत. राजकारणात स्वत:चे महत्त्व वाढवण्याची धडपड करणाऱ्या आठवलेंच्या बोलण्याला आपण फारसे महत्त्व देत नाही, असा टोला लगावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. १)श्री. आठवले यांच्या टीकेचा समाचार घेतला होता. "निळा रंग ही काय रामदास आठवले यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? त्यांनी निळा रंग वापरताना कोणाची परवानगी घेतली होती,' असा बोचरा सवालही राज ठाकरे यांनी केला होता.  दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला "मनसे'ने विरोध केल्यामुळे रामदास आठवले यांनी मं गळवारी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकूणच शिवशक्ती-भीमशक्ती एकीकरणाच्या प्रयोगाने राज्यातील राजकारण तापू लागल्याचे दिसत असल्याचे राजकीय जाणकारांचा होरा आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Fri,3 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>यापुढे राज्यात आसवनीला अनुदान नाही : मुख्यमंत्री</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110603/4886564024389207153.htm</link>
    <description>&lt;img align="left" alt="यापुढे राज्यात आसवनीला अनुदान नाही : मुख्यमंत्री" border="0" height="86" src="http://72.78.249.126/Agrowon/20110602/images/5367538637268048438/5607712802693009108_Thumb.jpg" style="z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;" width="130" /&gt;मुंबई (प्रतिनिधी) : यापुढे राज्यात कोणत्याही आसवनीला अनुदान मिळणार नाही  मात्र यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आसवनींचे परवाने मागे घेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. धान्यापासून दारू बनविण्यास समाजाच्या सर्व स्तरांतून होत असलेल्या विरोधाची दखल अखेर राज्य सरकारने घेतली. हे धोरण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता. १) पत्रकार परिषदेत दिली.  राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणात आमूलाग्र बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मं त्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, की या धोरणानुसार बेकायदा दारूचे संपूर्ण निर्मूलन करताना, वैध दारूवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ वर्षांखालील व्यक्‍तींना यापुढे मद्यसेवन करता येणार नाही. २१ वर्षांखालील युवकांना बिअर पिण्यासही बंदी घालण्यात आली आहे. गावातल्या २५ टक्‍के महिलांनी दारूबंदीची मागणी केल्यास मतदान घेण्यात येईल, असेही या धोरणात नमूद करण्यात आले आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Fri,3 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>सोलापूर जिल्ह्यात बाराशेहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांना अंतिम नोटिसा</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110603/4764092618290750176.htm</link>
    <description>सोलापूर (प्रतिनिधी) : स्वच्छतागृह नसल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील एक हजार २२२ ग्रा मपंचायत सदस्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांना अं तिम नोटिसा जारी केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी दिली, त्या मुळे येत्या आठ-दहा दिवसांत ग्रामपंचायतीच्या तेवढ्या जागा रिक्त होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  सोलापूर जिल्ह्यात निर्मलग्राम स्वच्छता अभियानातील काम खूपच रखडले आहे, त्यामुळे प्रशासनाने स्वतःपासून त्याची सुरवात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सरकारी कर्मचारी, अधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य व त्यांचे कर्मचारी यांना स्वच्छतागृह बांधणे सक्‍तीचे केले आहे. अनेक वेळा सूचना देऊनही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छतागृह अभियानात म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. स्वतःही ते बांधले नाही. त्यामुळे अखेर तपासणी करून जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने जिल्ह्यातील १२२२ ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी स्वच्छतागृहे नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या महिन्यात सादर केला होता.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Fri,3 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>यापुढे राज्यात आसवनीला अनुदान नाही - मुख्यमंत्री</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110603/5026905780880014720.htm</link>
    <description>मुंबई - यापुढे राज्यात कोणत्याही आसवनीला अनुदान मिळणार नाही  मात्र यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या आसवनींचे परवाने मागे घेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. धान्यापासून दारू बनविण्यास समाजाच्या सर्व स्तरांतून होत असलेल्या विरोधाची दखल अखेर राज्य सरकारने घेतली. हे धोरण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (ता. १) पत्रकार परिषदेत दिली.  राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणात आमूलाग्र बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, की या धोरणानुसार बेकायदा दारूचे संपूर्ण निर्मूलन करताना, वैध दारूवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ वर्षांखालील व्यक्‍तींना यापुढे मद्यसेवन करता येणार नाही. २१ वर्षांखालील युवकांना बिअर पिण्यासही बंदी घालण्यात आली आहे. गावातल्या २५ टक्‍के महिलांनी दारूबंदीची मागणी केल्यास मतदान घेण्यात येईल, असेही या धोरणात नमूद करण्यात आले आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Fri,3 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>आवाडे पिता-पुत्र राष्ट्रवादीच्या वाटेवर?</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110603/4949485414311826545.htm</link>
    <description>इचलकरंजी, जि. कोल्हापूर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आवाडे पिता-पुत्रांच्या प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. १० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या पक्षमेळाव्यात आवाडे यांचा प्रवेश निश्‍चित असल्याचे सांगितले जात आहे.   यासंदर्भात आवाडे पिता-पुत्रांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कोणतेही थेट विधान केले नाही आणि प्रवेशाचा इन्कारसुद्धा केला नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी गूढ निर्माण झाले आहे.  कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यां ना माजी आमदार पी. एन. पाटील गटाकडून जाणीवपूर्वक डावलले गेले. त्यावेळी आवाडे यांनी वेगळा विचार करण्याचा इरादा व्यक्त केला होता. मात्र, कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना सबुरीचे धोरण स्वीकारावे, जिल्हा कॉंग्रेसमध्ये बदल केला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. अद्याप जिल्हा नेतृत्वाच्या बदलाबाबत काहीही हालचाली घडलेल्या नाहीत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Fri,3 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>गृहमंत्र्यांनी केली सागरी टेहळणी</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110602/5171198871030869668.htm</link>
    <description>&lt;img align="left" alt="गृहमंत्र्यांनी केली सागरी टेहळणी" border="0" height="86" src="http://72.78.249.126/Agrowon/20110601/images/4702012757952178478/4940053155621904124_Thumb.jpg" style="z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;" width="130" /&gt;&amp;nbsp  मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याच्या सागरी सीमेवर तटरक्षक दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या सुरक्षा यंत्रणेची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पाहणी केली. तटरक्षक दलाच्या "समुद्रप्रहरी' या जहाजातून करण्यात आलेल्या या पाहणी दौऱ्यात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकर हेही सहभागी झाले होते. मुं बईच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत आक्रमक टीका करीत आर. आर. पाटील यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी या पाहणी दौऱ्यानंतर समाधान व्यक्‍त केले.   26/11 च्या हल्ल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने सुरक्षेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सागरी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. पोलिस, तटरक्षक दल, नौ दलाने सागरी गस्त वाढविली आहे. तटरक्षक दलाने गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. समुद्रकिनारपट्टी, संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजना, गस्ती नौका, आधुनिक रडार यंत्रणा, हेलिकॉप्टरद्वारे होणारी टेहळणी, यांची माहिती आर. आर. पाटील आणि विरोधी पक्षनेत्यांनी घेतली.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,2 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>"शिवशक्‍ती - भीमशक्ती'चा सांगलीत सोमवारी मेळावा</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110602/5604343124836019298.htm</link>
    <description>सांगली&amp;nbsp - "शिवशक्ती - भीमशक्ती'चा जिल्ह्यातील पहिला मेळावा सो मवारी (ता. 6) तरुण भारत क्रीडांगणावर दुपारी अडीच वाजता होणार आहे.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सं भाजी पवार, आमदार सुरेश खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातून 15 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.   ते म्हणाले, ""दोन्ही कॉंग्रेसच्या धरसोड प्रवृत्तींमुळेच मागासवर्गीयांचा विकास खुंटला आहे. आमची युती तत्त्वाला धरून आहे. ताकदीप्रमाणे सत्तेत स्थान देण्यास शिवसेना - भाजपने शब्द दिलेला आहे  तो ते खरा करून दाखवतील. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीय मतदारसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी निवडणूक लढवावी  अन्यत्र युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. मागील निवडणुकीत युती सत्तेत येण्यासाठी चार टक्के मते कमी पडली. आम्ही 17 टक्के आहोत. 12 टक्के लोक आठवले यांच्याबरोबर आहेत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,2 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>आदिवासींना स्वायत्त राज्य द्या</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110602/5103188123413613777.htm</link>
    <description>नंदुरबार (प्रतिनिधी) : केंद्रशासित प्रदेशात सवलतींचा वर्षाव करूनही शोषितांचा विकास झाला नाही, उलट तेथे भ्रष्टाचाराची दलदल वाढली. यामुळे नंदुरबारला केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे सवलतींची मागणी करणे, आहे ते मूलभूत प्रश्‍न न सोडविता इतरच मुद्‌द्‌यांकडे लक्ष वेधण्याचे प्रकार दिशाभूल म्हटली पाहिजे. खासदार माणिकराव गावित यांनी अशा काही मागण्या करून विकासविषयक तात्पुरत्या डागडुजीचे उपाय शोधू नये, खऱ्या विकासासाठी स्वायत्त आदिवासी राज्य देण्यात यावे, अशा रोखठोक सुरात सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया नोंदविली.   खासदार गावित यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी, औद्योगीकरणाला चालना मिळण्यासाठी केंद्रशासित प्रदेशाशी निगडित सवलतींची मागणी केली आहे. यात कॉंग्रेसचे नेते खासदार गावित यांच्या पाठीशी, तर "राष्ट्रवादी'ने विरोध दर्शविला आहे. यापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या, त्या अशा ः   चौकट मोडू नये  प्रतिभा शिंदे व झिलाबाई वसावे (लोकसंघर्ष मोर्चा) ः केंद्रशासित प्रदेशाशी निगडित आर्थिक सवलतींची मागणी खासदार गावित यांनी केली आहे.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,2 Jun 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>आंबेडकरी जनता आठवलेंबरोबर जाणार नाही - पटेल</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110601/5352853452298410971.htm</link>
    <description>शिर्डी - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी रामदास आठवले यांना मंत्रिपद आणि खासदारकी दिली. दुसऱ्या वेळी शिर्डीतून खासदारकीची उमेदवारी दिली. आज ते शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीबरोबर जात असले तरी वैचारिक भिन्नता असल्याने आंबेडकरी जनता त्यांच्या समवेत जाणार नाही, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रफ्फुल पटेल यांनी सोमवारी (ता. ३०मे) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  त्यांनी येथे येऊन सपत्नीक साईदर्शन घेतले. संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी नगराध्यक्षा अलकाताई शेजवळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदि उपस्थित होते.  श्री. पटेल म्हणाले, ""सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षांचे धोरण आहे. याउलट स्थिती भाजप-सेना युतीची आहे, त्यामुळे आठवले यांच्याबरोबर आंबेडकरी जनता जाणार नाही.''  अवजड उद्योग मंत्रालयाबाबत ते म्हणाले, "भेलमार्फत सौर पॅनेलची निर्मिती करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत आपण प्रयत्नशील आहोत.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,1 Jun 2011 6:0:0 +0550</pubDate>
  </item>
  </channel>
</rss>
