﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
  <channel>
    <title>ऍग्रो विसावा</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/agrovisawa.htm</link>
    <description>agrovisawaagrowon.com © CopyRight Agrowon2011</description>
    <language>en-US</language>
    <pubDate>5/14/2011 2:37:12 PM</pubDate>
    <ttl>60</ttl>
    <image>
      <title>visit http://www.agrowon.com</title>
      <link>htttp://www.agrowon.com</link>
      <url>http://72.78.249.126/Agrowon/images/logo.gif</url>
      <width>253</width>
      <height>64</height>
    </image>
    <item>
    <title>बाई मी पतंग उडवीत होते...</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110515/4900743944722321559.htm</link>
    <description>चित्रपटसृष्टीत 1970च्या दशकात तमाशापटांचं पीकच आलं होतं. त्यापैकी काही मोजकेच तमाशापट लक्षात राहिले. "लाखात अशी देखणी' हा त्यापैकी एक तमाशापट. कमलाकर तोरणे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, जयश्री गडकर, सूर्यकांत, गणपत पाटील... अशी दिग्गज नावं या चित्रपटाशी जोडली गेली होती. नाट्यपूर्ण कथानक, गदिमा आणि सुधीर फडके यांचे गीत-संगीतामधील कौशल्य आणि सर्वच नामवंतांच्या अभिनयातील कामगिरीमुळे हा चित्रपट लक्षवर्धक ठरला. बाजीराव जगदाळे (राजशेखर) हा ढालगावच्या एका सोसायटीचा चेअरमन. चारित्र्यहीन असलेल्या बाजीरावनं गावातील सर्वांशी वैर पत्करलेलं असतं. या गावातील एक सज्जन व्यक्तिमत्त्व म्हणजे गुणा गोविंदा हा शाहीर. आपल्या लेखणीतून उतरलेल्या लावण्या तो विठाबाई ढालगावकरीण (लीला गांधी) हिला देत असतो. खालच्या जातीतला म्हणून त्याची अवहेलना झालेली असते. गौतम हा गोविंदाचा मुलगा. गावातील आबासाहेबांना गोविंदा मानत असतो. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं कळल्यामुळे गौतम त्यांना पाहायला जातो. या वेळी आबासाहेबांची मुलगी पारू (पद्मा चव्हाण) गौतमचा अवमान करते.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,15 May 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>अष्टविनायका तुझा महिमा कसा...</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110508/4687692078758027880.htm</link>
    <description>शिणुमाला गंध मातीचा   श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्तिक, नास्तिक... हे विषय नेहमीच आपल्या समोर येत असतात. त्याच विषयांना केंद्रस्थानी ठेवून एक चांगला मनोरंजक चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी "अष्टविनायक'द्वारे सादर केला होता. उत्कृष्ट संगीत, कलावंतांचे छान अभिनय आणि दिग्दर्शकाच्या नेटक्‍या कामगिरीमुळे हा चित्रपट १९८०च्या दशकात खूप गाजला होता.  नानासाहेब इनामदार (चंद्रकांत) हे गजानन पेपर मिलचे मालक. बाळ (सचिन पिळगावकर) हा त्यांचा मुलगा विदेशात शिकत असतो. त्याच्या आईचा लहानपणीच मृत्यू झाल्यानं नानासाहेबांनी दुसरं लग्न केलेलं असतं. बाळ त्यांना मॉं (पद्मा चव्हाण) म्हणत असतो. नानासाहेबांचे विश्‍वासू सहकारी असतात ते साठे गुरुजी (शरद तळवलकर). सदानंद हा या साठे गुरुजींचा मुलगा. विदेशातील शिक्षण पूर्ण करून एके दिवशी बाळ आपल्या घरी परततो. शिक्षणामधील विशेष प्रावीण्याबद्दल त्याला "गोल्ड मेडल' मिळालेलं असतं. बाळ हे "मेडल' भिंतीवरील आपल्या आईच्या तसबिरीला घालतो. दुसऱ्याच दिवशी तो पेपर मिलमध्ये पाय ठेवतो आणि नानासाहेब ही मिल चालविण्याचे सर्व हक्क त्याला देतात.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,8 May 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>देश हा देव असे माझा...</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110501/5605491417947812519.htm</link>
    <description>१९७०च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टीत काही उत्कृष्ट ऐतिहासिकपट बनले. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर तर चित्रपट बनलेच. त्याखेरीज शिवकाळही आपल्याकडील दिग्दर्शकांनी रुपेरी पडद्यावर खूप चांगल्या पद्धतीनं आणला. शिवकाळातील काही सुवर्णपानं म्हणजे संताजी आणि धनाजी. मुघलांच्या फौजेला या दोन शूरवीरांनी अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांची शौर्यगाथा "धन्य ते संताजी धनाजी' या चित्रपटात पाहायला मिळते.  चित्रपटाची सुरवात होते ती संभाजीराजांच्या अटकेपासून.  ...संकटे पुन्हा परते आली कुण्या पाप्याची दृष्ट लागली फंदफितुरीला ऊत आला वीर संभाजी कैद झाला...  या पंक्तीमधून त्या काळातील घडामोडींचं दर्शन घडतं. औरंगजेबाकडून संभाजीराजांचे हाल हाल केले जातात. त्यातच त्यांचा मृत्यू होतो. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची राजधानी हस्तगत करण्यासाठी औरंगजेब इतिकदखानाला मोहिमेवर पाठवतो. "सॉंप का बच्चा और गनीम का बच्चा दोनो धोकादायक होते है,' अशा शब्दांमध्ये औरंगजेबाचे कान भरले जातात. इकडे औरंगजेबाच्या चढाईमुळे राजाराम महाराज गांगरून जातात, तेव्हा येसूबाई आलेल्या परिस्थितीचं महत्त्व ओळखतात.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,1 May 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>गुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटाटा उत्पादन</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110421/5084748496711145892.htm</link>
    <description>&lt;img align="left" alt="गुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटाटा उत्पादन" border="0" height="86" src="http://72.78.249.126/Agrowon/20110420/images/5038025521235431416/5622779218476107716_Thumb.jpg" style="z-index: 100;left: 0px; position: absolute; top: 0px;padding-right:10px;" width="130" /&gt;बटाटा उत्पादनासाठी गुजरातमध्ये पालमपूर व बनारसकंठा जिल्हे सर्वोत्तम समजले जातात. इथल्या मातीत बटाट्यातील साखरेची पातळी, शुष्क घटकांचे प्रमाण सर्वोत्तम पातळीत राखले जाते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. याच बनारसकंठा जिल्ह्यातील उच्चशिक्षित शेतकरी पोलिस अधिकारी पार्थीभाई जेठाभाई चौधरी यांनी बटाट्याचे आठ एकर क्षेत्रात एकरी सुमारे 35 टन एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कदाचित हा जागतिक विक्रम असण्याची शक्‍यता आहे. सुपीक मातीला सुधारित तंत्रज्ञान, उच्च उत्पादनक्षम वाण, यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन व काटेकोर शेतीची जोड देत त्यांनी हे यश संपादित केले आहे.    संतोष डुकरे     पार्थीभाई चौधरी यांची शेती पालमपूरपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर धांतीवाडा कृषी विद्यापीठ रस्त्यावर डांगीया गावात आहे. एप्रिल 2010 मध्ये त्यांनी बटाट्याचे विक्रमी उत्पादन मिळविले. एकरी 25 टन उत्पादन मिळण्याचा त्यांना विश्‍वास होता. त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले. फेब्रुवारी 2010 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन, विद्यापीठ व तज्ज्ञांच्या समितीच्या उपस्थितीत पीक काढणी करण्याचे निश्‍चित केले. या समितीमध्ये जिल्हाधिकारी श्री.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Thu,21 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>वळणवाटातल्या गाडीतले हिरवे छंद...</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110417/5121904227789681806.htm</link>
    <description>- मंदार जोशी समाजातल्या विसंगतींवर चित्रपट माध्यमातून भाष्य करण्यात डॉ. जब्बार पटेल यांचा हातखंडा आहे. जातीपातीच्या राजकारणात आपला समाज वर्षानुवर्षं भरडला गेलाय. "मुक्ता' चित्रपटामध्ये डॉ. पटेलांनी याच समस्येला वाचा फोडली आहे. बंदिस्त पटकथा, उत्कृष्ट संवाद आणि सर्व कलावंतांच्या सहज अभिनयामुळे हा चित्रपट सामाजिक चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी आहे.  आबासाहेब कणसे-पाटील (डॉ. श्रीराम लागू) हे गावातलं मोठं प्रस्थ. एकनाथ (विक्रम गोखले) आणि पृथ्वीराज ही त्यांची मुलं. घराण्यातल्या राजकारणाला कंटाळून एकनाथ अमेरिकेला जाऊन तिकडंच "सेटल' झालेला असतो  तर पृथ्वीराज घराण्याचा राजकारणाचा वारसा सांभाळीत असतो. तो एका जिल्ह्याचा पालकमंत्री असतो. एकनाथची मुलगी मुक्तानं (सोनाली कुलकर्णी) अमेरिकेत पदवी घेतलेली असते. समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ती भारतात परतते. मुक्ता आणि तिचे आई-वडील गावी जात असताना चित्रपटामधील पहिलं गाणं पाहायला मिळतं.   ...त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे...  मुक्ताचे घरी जंगी स्वागत होते. भोजनाच्या कार्यक्रमानंतर कवितावाचनही होतं. एकनाथ हे उत्तम कवी असतात.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,17 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>औरंगाबादेत धान्य महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110413/5117158333814430958.htm</link>
    <description>औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्य कृषी विभाग आणि "सकाळ' माध्यम समूहातर्फे आयोजित धान्य महोत्सवात दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.11) व काल (मंगळवारी) महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धान्याची विक्री झाली.  तीनदिवसीय धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी तीन हजार क्विंटल धान्याची विक्री झाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील मध्यस्त बाजूला सारून शतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या हेतूने हा धान्य महोत्सव सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला. गहू, ज्वारी, बाजरी, चणा, तूर, मूग डाळी सर्व मिळून एक हजार 339 क्विंटल धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले होते.  सोमवारी 3 हजार 53 क्विंटल धान्याची विक्री झाली. 56 क्विंटल भाजीपाला, टरबूज, खरबूज, चिकू, अं जीर, पेरू, मोसंबी ही 15 क्विंटल फळे महोत्सवात शेतकऱ्यांनी आणली होती. मोहरीलाही मोठी मागणी असून, दोन दिवसांत 17 क्विंटल मोहरी विक्री झाली. दुपारच्या वेळी अनेक स्टॉल्ससमोर ठेवलेल्या धान्याच्या पोत्यांची तडाख्याने विक्री झाली. सायंकाळनंतरही मोठ्या प्रमाणात धान्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,13 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>वीज, पेट्रोल, डिझेल, गॅसला "बायोगॅस' हा सक्षम पर्याय</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110413/5194805836536659963.htm</link>
    <description>शैलेंद्र चव्हाण     औरंगाबाद : ऊर्जा म्हटले, की सहसा फक्‍त पारंपरिक स्वरूपात उपलब्ध होणारी वीजच डोळ्यांसमोर येते. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात विजेची गरजही वाढणार आहे, त्यासाठी पारंपरिक वापरात असलेली नैसर्गिक साधनसामग्री अपुरी पडेल. तेव्हा विजेसह पेट्रोल-डिझेल आणि गॅसला "बायोगॅस' (जै वऊर्जा) सक्षम पर्याय ठरू शकेल, असा विश्‍वास पुणे येथील शाश्‍वत ऊर्जा प्रा. लिमिटेडचे संचालक दीपक कान्हेरे यांनी सोमवारी (ता.11) येथे व्यक्‍त केला.  सरपंच महापरिषदेत "शाश्‍वत ऊर्जेसाठी जैवऊर्जेचा वापर' या विषयावर बोलताना श्री. म्हणाले, ""भारतातील ग्रामीण भागात 1970 ते 80 दशकात गोबरगॅसचा म्हणजेच बायोगॅसचा वापर सर्वाधिक झाला. एकट्या महाराष्ट्रात 23 लाख 50 हजार गोबरगॅस झाले. अर्थात, त्या काळी असलेली शेणाची उपलब्धता, शासनाकडून मिळणारे अनुदान यासाठी कारणीभूत ठरले  परंतु त्यानंतर विविध कारणांमुळे ते बंद पडले. आजमितीस अवघे 4.5 टक्के गोबरगॅस सुस्थितीत असल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. 1980च्या दशकानंतर शेणखताचा वापर वाढल्याने त्याची उपलब्धताही कमी झाली.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,13 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>सरपंचांनो, सक्षम व्हा!</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110413/4644355647278561499.htm</link>
    <description>औरंगाबाद&amp;nbsp - ""सरपंच सक्षम झाल्याशिवाय ग्रामसभा सक्षम होऊन सर्वांत खालच्या स्तराचा विकास होऊ शकत नाही. विकासकामांसाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा परिषदेमार्फत कोट्यवधी रुपये गावांना मिळत आहेत, मात्र सरपंच सक्षम नसल्यामुळे विकास होत नाही. सरपंचांनी ग्रामपंचायत व गावांचा अभ्यास करून ग्रामविकासासाठी सक्षम व्हावे,'' असे आवाहन आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.  "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित "ऍग्रोवन-महिको सरपंच महापरिषदे'चा समारोप श्री. पवार यांच्या प्रकट मुलाखतीने झाला, या वेळी ते बोलत होते. "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक श्रीमंत माने यांनी ही मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी आपल्या हिवरेबाजार गावची यशोगाथा उलगडून दाखवत सरपंचांना मार्गदर्शन केले. श्री. पवार म्हणाले, ""सरपंचांनी आपल्या गावात शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, पर्यावरण विकास व सामाजिक सुव्यवस्था राखणे सर्वांत महत्त्वाचे आहे, त्यासाठी नियोजनबद्ध काम करणे आवश्‍यक आहे. बहुतेक सरपंचांना ग्रामपंचायतीची व गावाची पुरेशी माहिती नसते. यामुळे योग्य काम होत नाही. यासाठी गावाचा पुढील 50 वर्षांचा विकास आराखडा तयार करावा.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Wed,13 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>हा सागरी किनारा... ओला सुगंध वारा...</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110410/4912114849133273336.htm</link>
    <description>सामाजिक चित्रपटांच्या हाताळणीत दिग्दर्शक राजदत्त यांचा हातखंडा  परंतु कौटुंबिक आणि मनोरंजक चित्रपटांमध्येही त्यांची मातब्बरी होती. ती दिसून येते, "मुंबईचा फौजदार' या चित्रपटात. नामांकित कलावंत, चांगला दिग्दर्शक, उत्कृष्ट संगीत आणि उच्च निर्मितीमूल्यांच्या जोरावर मराठी सिनेमा किती चांगला बनू शकतो, याचं उदाहरण म्हणून या चित्रपटाचं नाव घेता येईल.    शकू (रंजना) ही गावच्या पाटलांची एकुलती एक मुलगी. त्या काळात मुंबई पोलिसांचा विशेष दबदबा होता, त्यामुळे आपली मुलगी मुंबईच्या एखाद्या डॅशिंग फौजदारालाच द्यावी, असा ते निश्‍चय करतात, त्यासाठी ते मुलीच्या मामाला मुंबईत विवाहेच्छुक मुलांचे फोटो आणण्यासाठी पाठवतात. त्यानुसार हे मामा काही जणांचे फोटो आणतात  परंतु शकू प्रत्येक फोटोत काही ना काही तरी त्रुटी काढते. इकडे कथानकाचा नायक जयसिंगराव मोहिते (रवींद्र महाजनी) हा आपल्या मित्राकडे जेवायला गेलेला असतो, तिथे त्याची भेट माधुरी यादवशी (प्रिया तेंडुलकर) होते. ती एका मासिकाची सहसंपादिका असते.&amp;nbsp      जयसिंगरावांनी नुकताच एका चोरीचा तपास लावलेला असतो, त्याबद्दल तिला जयसिंगरावांची मुलाखत घ्यायची असते.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,10 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
    <item>
    <title>ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे...</title>
    <link>http://72.78.249.126/Agrowon/20110403/4796436561710747204.htm</link>
    <description>रॉबिनहूड हा प्रकार हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही चांगलाच रुजला होता. 1980च्या दशकात याच पद्धतीच्या कथानकावर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. "ज्योतिबाचा नवस' हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांच्या "पद्मजा' कादंबरीवर आधारला होता. चित्रपटाची सुरवात होते ती पोलिस ठाण्यातील दृश्‍यापासून. ओसवाल नावाचा एक शेटजी साळवी (प्रा. मधुकर तोरडमल) या फौजदाराकडे जातो. सर्जा (सूर्यकांत) नावाच्या दरोडेखोरानं आपल्या पेढीवर दरोडा टाकल्याची तो तक्रार नोंदवतो. त्यानुसार साळवी त्याच्या मागावर जातात, परंतु पोलिसांना तुरी देऊन पळून जाण्यात सर्जा यशस्वी होतो. याचवेळी बाळासाहेब (राजशेखर) या आणखी एका सावकाराला सर्जाचं धमकीचं पत्र येतं. हे पत्र घेऊन बाळासाहेब फौजदार साळवींची भेट घेतात. याच सुमारास ज्योतिबाची यात्रा भरणार असते.  &amp;nbsp  ज्योतिबाभक्त असलेला सर्जा या यात्रेत येणार असल्याचं सांगून बाळासाहेब त्यांना पोलिसांची फिल्डिंग लावण्यास सांगतो. त्यानुसार साळवीदेखील सर्जाला पकडण्यासाठी सगळी जय्यत तयारी करतात. ज्योतिबाच्या यात्रेमध्ये साळवीसाहेबांची पत्नी आणि मुलगी पद्मजा (पद्मा चव्हाण) सहभागी होतात.</description>
    <author>---</author>
    <pubDate>Sun,3 Apr 2011 5:30:0 +0550</pubDate>
  </item>
  </channel>
</rss>