|
राजकीय
सर्वपक्षीय आमदारांची औरंगाबाद येथे बैठक औरंगाबाद - मराठवाड्यातील प्रश्न विधिमंडळात मांडून ते योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी आमदारांची समन्वय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पुढाकारातून मराठवाड्यातील प्रश्नांवर येथे रविवारी (ता. 16) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
Tuesday, June 18, 2013 AT 06:00 AM (IST)
नवी दिल्ली - केंद्रीय वाहतूक, महामार्ग आणि रेल्वेमंत्री सी. पी. जोशी आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्री अजय माकन यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी (ता. 16) स्वीकारला आहे. यामुळे आज (सोमवार) केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. श्री. जोशी व श्री. माकन यांना कॉंग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. श्री.
Monday, June 17, 2013 AT 01:00 AM (IST)
पटणा - गेल्या 17 वर्षांपासून असलेली भाजप- संयुक्त जनता दलाची (जेडीयू) युती संपल्याची घोषणा रविवारी (ता. 16) बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केली. याबाबतचे पत्रही त्यांनी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना सादर केले, तसेच विधिमंडळात बहुमत सादर करण्यास संधी देण्याची मागणी केली आहे. तर, "एनडीए'च्या निमंत्रकपदाचा शरद यादव यांनी राजीनामा दिला आहे. रविवारी दुपारी दोन वाजता नीतिशकुमार यांनी राज्यपाल डॉ.
Monday, June 17, 2013 AT 01:00 AM (IST)
कार्याध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांची शनिवारी (ता. 15) पक्षाच्या बैठकीत निवड करण्यात आली. आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले जितेंद्र आव्हाड यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा मावळते प्रदेशाध्यक्ष आणि आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे चित्र होते.
Sunday, June 16, 2013 AT 12:30 AM (IST)
राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज (15 जून) वाढदिवस. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना व्यापक शेतकरीहितासाठी कार्यरत असलेल्या कृषिमंत्र्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश... - विनयकुमार आवटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे 19 नोव्हेंबर 2010 रोजी राज्याचे कृषी व पणन मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदभार स्वीकारला.
Saturday, June 15, 2013 AT 05:15 AM (IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून "लोकसभे'च्या व्यूहरचनेस प्रारंभ  मुंबई  - आगामी लोकसभेची व्यूहरचना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंद्या समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलामागे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे तसेच फेरबदलामुळे पक्षांतर्गत नेत्यांमधून फारशी नाराजी होणार नाही याचीही योग्य ती खबरदारी घेतानाच पक्षातील ज्येष्ठ आणि प्रभाव पाडू शकणाऱ्या वजनदार नेत ...
Friday, June 14, 2013 AT 05:00 AM (IST)
खासदार गोपीनाथ मुंडे यांची माहिती औरंगाबाद  - महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना, आरपीआय यांच्या महायुतीसोबत तर आहेच. यापुढे जाऊन शेतकरी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार आहे. यासाठी काही पक्ष, संघटनांच्या एकत्रित सभाही घेतल्या आहेत, अशी माहिती भाजपचे उपनेते तथा खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली. औरंगाबाद येथे खासदार गोपीनाथ मुंडे नुकतेच आले होते, या वेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. या वेळी श्री.
Thursday, June 13, 2013 AT 06:00 AM (IST)
शरद पवार  - लोकसभेसाठी राष्ट्रवादीची कोअर टीम, प्रदेशाध्यक्ष निवड शनिवारी सांगली  - मंत्रिमंडळातील फेरबदल मिशन लोकसभेचा भाग आहे, त्यासाठी येत्या शनिवारी (ता. 15) प्रदेशाध्यक्ष निवडीबरोबरच पाच ते सहा जणांची "कोअर टीम' निवडण्यात येणार आहे. तिच्यावर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. 12) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
Thursday, June 13, 2013 AT 05:45 AM (IST)
मधुकर पिचड यांच्यासह शशिकांत शिंदे, दिलीप सोपल यांची कॅबिनेटपदी वर्णी मुंबई  - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा आणि राजकीय नाट्यावर पडदा पडत अखेर मंगळवारी (ता. 11) राजभवनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल के.
Wednesday, June 12, 2013 AT 05:30 AM (IST)
  दुष्काळग्रस्त फळबागांना मदतीची मागणी औरंगाबाद  - दुष्काळाने होरपळून निघालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन शासनाने फसवणूक केली. मदत देण्याच्या घोषणा हवेतच विरल्या. शासनाच्या या धोरणाविरोधात महाराष्ट्र मोसंबी उत्पादक शेतकरी संघातर्फे सोमवारी (ता. 10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
Wednesday, June 12, 2013 AT 05:00 AM (IST)
मुंबई  - विरोधकांनी आरोप केले म्हणून नव्हे, तर पक्षसंघटना मजबूत करून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशाने राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करीत सहा मंत्र्यांकडे पक्षकार्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी सहा जणांना मंत्रिपदाची धुरा देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Wednesday, June 12, 2013 AT 04:45 AM (IST)
कृषिमंत्री शरद पवार : सांगोला तालुक्यात छावण्यांना भेट, शेतकऱ्यांशी संवाद भारत कदम सांगोला, जि. सोलापूर : ""दुष्काळी भागाचे कायमस्वरूपी निर्मूलन व शेतीकरिता पाणी मिळण्यासाठीच्या केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ज्या योजना मंजूर आहेत, त्या योजना मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत,'' असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. सांगोला तालुक्यात कृषिमंत्री पवार यांनी सोमवारी (ता.
Tuesday, June 11, 2013 AT 04:45 AM (IST)
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी उंचावण्यासाठी काही नेत्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. पक्ष संघटनेतही बदल होतील. येत्या 11 जूनपर्यंत हा विषय संपविला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली. मंत्र्यांचे राजीनामे घेणे हे धक्कातंत्र नसल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
Monday, June 10, 2013 AT 04:45 AM (IST)
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गोंदवले येथील सिमेंट साखळी नालाबांध लोकार्पण सातारा  - राज्यात झालेल्या जलसंधारण कामांच्या माध्यमातून दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यात येणार आहे. साखळी सिमेंट नालाबांध ही आपत्तीतून संधी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गोंदवले (जि. सातारा) येथे जलसंधारण विभाग व कृषी विभागाकडून बांधण्यात आलेले सिमेंट नालाबांध लोकार्पण सोहळा रविवारी (ता.
Monday, June 10, 2013 AT 04:00 AM (IST)
मुंबई - अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात ठिय्या मांडून बसलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे राजीनामे घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना दणका दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री आणि विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही आपले राजीनामे आज शरद पवार यांच्याकडे सोपविले. अजित पवार यांच्या "देवगिरी' बंगल्यावर हे राजकीय नाट्य घडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, हे स्पष्ट झाले आहे.
Sunday, June 09, 2013 AT 12:00 AM (IST)
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  - वसुंधरा पुरस्कारांचे मुंबईत वितरण मुंबई  - पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून, त्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी जनजागृतीवर व्यापक प्रमाणात भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
Saturday, June 08, 2013 AT 05:00 AM (IST)
- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - पहिल्या टप्प्यात खरीप 2011, रब्बी 2011 -12, खरीप 2012 मधील नुकसानीसाठी मिळणार मदत मुंबई  - गेल्या दोन वर्षांतील दुष्काळाने राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिके आणि फळपिकांच्या नुकसानीपोटी 2,172 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून वाटप करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.6) राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. रब्बी हंगाम 2012 मधील दुष्काळी मदत मात्र रब्बी हंगाम 2013-14 पूर्वी दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे.
Saturday, June 08, 2013 AT 04:15 AM (IST)
भाजपचे मदन येरावार पराभूत यवतमाळ - दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार नंदिनी नीलेश पारवेकर यांनी भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचा 15 हजार 233 मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत नंदिनी पारवेकर यांना 62 हजार 509 मते, तर मदन येरावार यांना 47 हजार 276 मते प्राप्त झाली. यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी (ता. 5) येथील महिला तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी पार पडली.
Thursday, June 06, 2013 AT 05:00 AM (IST)
मुंबई  - बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा, बुलडाणा तसेच जळगाव जामोद तालुक्यांमधील खारपाण पट्ट्यातील 140 गावांची लोकवर्गणी माफ करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या गावात योजनांवर केलेला 16.82 कोटी रुपये खर्चदेखील माफ करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.
Wednesday, June 05, 2013 AT 04:00 AM (IST)
माण तालुक्यात दुष्काळ डोक्यावर माण, जि. सातारा : माण तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ज्वारी- बाजरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा हा तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक चारा छावण्या असलेला तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अर्ध्या लाखाच्या वर जनावरे छावण्यांत आहेत. सलग तीन वर्षे दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हातातून सगळं नेलं आहे.
Wednesday, May 29, 2013 AT 04:30 AM (IST)
औरंगाबाद  - दुष्काळामुळे मराठवाड्यातील मोसंबी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी सरकार सकारात्मक विचार करत असून, राज्याबरोबरच केंद्राकडून भरपाईसाठी प्रयत्नशील आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
Tuesday, May 28, 2013 AT 04:30 AM (IST)
लातूर  - भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माजी आमदार पाशा पटेल यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी असणार आहे. श्री. पटेल हे अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहेत. श्री. पटेल यांनी आमदार असताना सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. कालबाह्य झालेली शेतीमाल दर ठरविण्याची पद्धत बदलण्यासाठी आवाज उठविला. हा लढा त्यांनी देशपातळीवर नेला.
Monday, May 27, 2013 AT 05:45 AM (IST)
परळी वैजनाथ, जि. बीड  - वाढती महागाई, भ्रष्टाचारामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट असून येत्या निवडणुकीत हा संताप मतपेटीतून व्यक्त होणार आहे. कॉंग्रेस आघाडीचे सरकार जाऊन महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला.
Monday, May 27, 2013 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद  - पावसाळा तोंडावर आल्यानंतर शेवटच्या क्षणाला का होईना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा औरंगाबाद जिल्ह्याचा दुष्काळी दौरा करण्याचा योग शनिवारी (ता. 25) जुळून आला. प्रशासनातर्फे दुष्काळ निवारणार्थ हाती घेण्यात आलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर जिल्ह्याला आणखी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी शनिवारी सकाळी हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली.
Monday, May 27, 2013 AT 05:00 AM (IST)
कन्नूर- केरळमधील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी लवकरच मत्स्यबीज कायदा लागू केला जाणार आहे, अशी माहिती केरळचे मत्स्योद्योग मंत्री के. बाबू यांनी नुकतीच (ता. 21) दिली. कक्कड येथील पुझहट्टी गावामध्ये पंचायतीत झिंगा लागवड केंद्राचे उद्घाटन व मच्छीमारांसाठी आर्थिक साहाय्य वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ""केरळचे सध्याचे वार्षिक मत्स्योत्पादन दीड लाख टन आहे. ते अडीच लाख टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आखले आहे.
Sunday, May 26, 2013 AT 12:30 AM (IST)
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यंदाचा 15 वा वर्धापनदिन "ज्येष्ठ नागरिक सन्मानदिन' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी गुरुवारी (ता. 23) पत्रकार परिषदेत दिली. येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस आहे. दरवर्षी समाजातल्या विविध घटकांच्या न्यायहक्काचे संरक्षण आणि संधी देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येतो.
Saturday, May 25, 2013 AT 05:45 AM (IST)
औरंगाबाद  - विविध पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालविणे कठीण आहे. अनेक अडचणी येतात, अनेकदा तडजोड करावी लागते, विकासाचे उद्दिष्ट गाठता येत नाही, त्यामुळे केंद्रामध्ये द्विपक्षीय सरकार असावे, बहुपक्षीय नको, असे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. "कॉंग्रेसपुढील आव्हाने' या विषयावर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी (ता.
Saturday, May 25, 2013 AT 05:15 AM (IST)
लातूर  - जिल्हा परिषदेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचावी, यातून त्यांचा योजनेत सहभाग वाढवा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या 58 मतदारसंघांत एकाच दिवशी बैठका घेतल्या जाणार आहेत. शनिवारी (ता. 25) या बैठका होणार आहेत. शासनाची योजना कितीही चांगली असली तरी त्यात लोकसहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही पण काही योजना लोकांपर्यंत जातच नसल्याची नेहमी ओरड असते.
Saturday, May 25, 2013 AT 04:30 AM (IST)
नाशिक  - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या विविध तक्रारी आणि संचालक मंडळाची मुदत 15 मार्चला संपल्यानंतर घेतलेले विविध वादग्रस्त निर्णय अशा विविध कारणांमुळे वादात सापडलेले जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ गुरुवारी (ता. 23) शासनाने बरखास्त केले. त्यानंतर अत्यंत जलद हालचालीत नगरचे साखर सहसंचालक ज्ञानदेव मुकणे यांनी प्रशासक म्हणून सूत्रे स्वीकारली.
Saturday, May 25, 2013 AT 04:15 AM (IST)
मंत्रिमंडळाला समांतर व्यवस्था कशासाठी  - ज्येष्ठ मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल मुंबई  - कोणत्याही योजना किंवा प्रकल्प राबविताना त्याची सर्वप्रथम व्यवहार्यता तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखाली राज्यात नवीन सार्वजनिक धोरण संस्था स्थापण्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने जोरदार विरोध केला.
Friday, May 24, 2013 AT 05:15 AM (IST)
शेकापची मुंबई कार्यकारिणी जाहीर मुंबई  - गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थापन केलेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या धर्तीवर आगामी निवडणुकांसाठी शेकाप, समाजवादी पक्ष, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचे संकेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नुकतेच दिले. याबाबत श्री.
Friday, May 24, 2013 AT 04:45 AM (IST)
|