पुणे ः युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सारे आणि काहीही चालते असे नेहमीच अनुभवाला येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांचा "राजकीय गळा' दाबू पाहणारे निवडणुकीनंतर मात्र सत्तेसाठी गळ्यात गळे घालत असल्याचे चित्र सध्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे पुन्हा अनुभवास येत आहे. पारंपरिक आघाडी, राजकीय विचार यांना मूठमाती देऊन खुर्चीसाठी कोणाशीही घरोबा केला जात असल्याचा अनुभव राज्यभर येऊ लागला आहे.
कऱ्हाड, जि. सातारा ः सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकून मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदाच सिद्ध केले आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदार संघात केलेल्या कामगिरीमुळे तसेच 45 वर्षांपासून कऱ्हाड तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष न मिळाल्याने या वेळी कऱ्हाड उत्तरमध्ये ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जि. प. सदस्य बाळासाहेब दराडे ः समग्र ग्रामविकासाचे ध्येय बाळगूनच कार्यरत बुलडाणा (प्रतिनिधी) - आजच्या निवडणुका पार बदलल्या... पैशांशिवाय कुणीच काम करत नाही... कार्यकर्त्यांना रोजची "सोय' पाहिजे... मतदारही प्रलोभनांना बळी पडतात... असा अनेकजण "न'चा पाढा वाचताना दिसतात. चौकाचौकांत तशा गप्पांचे फडही रंगतात... पण 7 फेब्रुवारीला पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पांग्राडोळे (ता. लोणार) गटात वेगळेच घडले. विजयी झालेले उच्चशिक्षित उमेदवार डॉ.
मुंबई - मुंबई, नाशिक आणि पुणे या महापालिकांत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातल्या 114 विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत या सर्व मतदारसंघांवर राज ठाकरेंचा झंझावात लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते. छोट्या ठाकरेंच्या करिष्म्याला दुसऱ्या फळीतल्या संघटन कौशल्याची जोड मिळाल्यास आजच पंचरंगी झालेले राजकीय चित्र आणखी वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या होमपिचवर (शिरोळ तालुका) मुक्त फटकेबाजी केली आहे. पाच षटकार (पाच जि.प. जागा) व आठ चौकारांच्या (आठ पं.स. जागा) मदतीने त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला (दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सा. रे. पाटील व शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील - यड्रावकर यांची आघाडी) चारी मुंड्या चीत केले.
सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान "ओबीसी' महिलेला मिळणारआहे. विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पदावधी 20मार्चपर्यंत असल्याने नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड 21 मार्च रोजी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 33, कॉंग्रेसचे 18, आघाड्यांचे 17 सदस्य विजयी झाले. सांगोला तालुक्यातील शेकाप- राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांच्या आघाडीतून राष्ट्रवादीच्या दोन सदस्या विजयी झाल्याने राष्ट्रवादीला 35चा आकडा गाठता आला.
मुंबई (सकाळ न्यूज नेटवर्क) ः नाशिक येथे मनसेचा महापौर बसणार, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या साथीला अपक्षांची साथ मिळाल्यावर खेडची नगरपालिका काबीज केल्यावर मनसेचा झेंडा फडकाविणारी पहिली महापालिका नाशिक ठरणार आहे. मनसे राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाणार की भाजपबरोबर याबद्दल चर्चा रंगली होती पण पुढील राजकारणाच्या वाटचालीसाठी मनसे भाजपसोबतच राहण्याची अधिक शक्यता आहे.
बोंडगावदेवी, जि. गोंदिया (प्रतिनिधी) ः आदिवासी आणि नक्षलप्रभावित असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांचा विकास करण्याकरिता आमदार राजकुमार बडोले यांनी 21 गावे दत्तक घेतली आहेत. गावातील समस्या जाणून त्या सोडविण्याकरिता गावांचा दौरासुद्धा सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र नव्यानेच अस्तित्वात आला आहे. या क्षेत्राचे प्रथम आमदार होण्याचा मान आमदार राजकुमार बडोले यांना मिळाला.
सांगली (प्रतिनिधी) ः "कॉंग्रेसमधील मतभिन्नतेमुळेच मुंबईत कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला', असे मत ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जलसिंचन योजना आणि औद्योगीकरणाला प्राधान्य देऊन विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्ता मिळाली आहे.
कऱ्हाड, जि. सातारा (प्रतिनिधी) ः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सातारा जिल्ह्याला पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असला तरी राज्याच्या मुख्यपदी येथील नेतृत्व असल्याने त्यांचा करिष्मा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयाच्या रूपाने दिसेल अशी शक्यता होती.
अकोला (प्रतिनिधी) ः अकोला महापालिकेत कॉंग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 18 जागा मिळाल्या. यामुळे येथे सत्ता मिळवण्यासाठी युती-आघाडी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. महानगरात एकूण 36 प्रभाग असून, या निवडणुकीत 73 जागांसाठी 517 उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेला आठ, राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाच, भारिप-बमसंला सात जागांवर समाधान मानावे लागले. अकरा जागांवर अपक्षांनी बाजी मारली. मनसेने गत वेळची आपली एक जागा कायम राखली. समाजवादी पक्ष एक, यू.डी.एफ.
पुणे (प्रतिनिधी) ः पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 47 जागांवर विजय संपादन केला आहे. तर गतवेळी आठ जागा मिळालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता 23 जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. शुक्रवारी (ता. 17) दुपारी चारपर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार एकूण 152 जागांपैकी 115 जागांचे निकाल जाहीर झाले. यापैकी राष्ट्रवादी एक नंबर, तर मनसेने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून झेप घेतली आहे.
मुंबई (प्रतिनिधी) ः शहरी महाराष्ट्राच्या भवितव्य ठरविणारी दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप- रिपाइं युतीने गड राखले असून, अनपेक्षितपणे कॉंग्रेस- राष्ट्रवादीची पडझड झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा धक्का देत परिणामकारक जागा मिळवल्या आहेत. दहा महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबई आणि ठाणे, उल्हासनगर आणि नागपूरचे गड महायुतीने राखले आहेत.
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 309 पंचायत समित्यांच्या जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शुक्रवार) होणार असून, जिल्हा परिषदेच्या 1624 जागांसाठी 7116 तर पंचायत समित्यांच्या 3218 जागांसाठी 13,473 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रातून स्पष्ट होऊन "झेडपी'चे नवे कारभारी जाहीर होतील. राज्यभरात मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त आयुक्त चॉंद गोयल यांनी दिली आहे.
कोल्हापूर ः थकीत कर्जाच्या वसुलीसाठी इचलकरंजीच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीस जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने (केडीसीसी) बजावली आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्ज न भरल्यास त्याचदिवशी कारखान्याची मालमत्ता जप्त केली जाईल, असे संचालक मंडळ व व्यवस्थापनाला बॅंकेने बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे. पंचगंगा कारखान्यावर जिल्हा बॅंकेचे मध्यम मुदतीचे 42 कोटी, तर साखरेवरील 43 कोटी असे 85 कोटी रुपयांचे कर्ज होते.
सांगली ः नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा पुन्हा एकदा लिलाव काढण्यात येणार आहे. कारखान्याची किमान लिलाव रक्कम 33 कोटी 58 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. 12 मार्चपर्यंत निविदा मागवण्यात आल्या असून, 19 मार्चला त्या उघडण्यात येणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यशवंत कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे.
मुंबई ः कर्जबुडव्या सहकारी साखर कारखान्यांवर राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकाने कारवाईचा बडगा उगारला असून, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उभारलेला कारखानाही या तडाख्यातून सुटलेला नाही. राज्य बॅंकेने आठ सहकारी साखर कारखाने आणि चार सूत गिरण्या लिलावात काढल्या. यामध्ये हातकणंगले येथील श्री गणेश सहकारी स्पिनिंग मिलचाही समावेश आहे.
कोल्हापूर  - हमिदवाडा (ता. कागल) येथील खासदार सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेले सुमारे सात हजार जणांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक डी. आर. घोडे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचे सभापती युवराज पाटील व भैया माने यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याची प्रारूप मतदारयादी 17 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार होती.
सोलापूर  - ""राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या भाषणातून सोलापूरकरांची करमणूक झाली. सोलापुरातील निवडणुकीत आपल्या पक्षाची डाळ शिजणार नसल्याचे पाहून या नेत्यांनी काही नवे सिद्धांत, जावईशोध लावले. तसेच खालच्या पातळीवरील जाऊन टीका केली. अशा स्वरूपाची टीका मी पहिल्यांदाच पाहत आहे. तसेच ही टीका करण्याबाबत पक्षातीलच नेत्यांचे आदेश पाहून आश्चर्य वाटले,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
बुलडाणा (प्रतिनिधी) ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे तापलेले जिल्ह्याचे राजकीय वातावरण अचानक थंड झाले असतानाच दुसरीकडे मात्र वातावरणातील गारव्यात अचानक वाढ झाली आहे. बोचऱ्या थंडीचे पुनरागमन झाले असून दिवसभर ढगाळ वातावरणही बनलेले अनुभवास येत आहे. या दूषित वातावरणाचा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे गेले पंधरा दिवस जिल्ह्याचे एकूणच राजकारण ढवळून निघाले आहे.
नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांच्या विनवण्या करत व सातत्याने संधान बांधत लाखो रुपयांचा चुराडा करून जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतदान पार पडले. आता कोणत्या गटात कोण विजयी होणार याची मतदारांना उत्सुकता लागली असली तरी उमेदवारही आकडेमोड करून अंदाज बांधत आहेत. ज्या गटात चुरशीच्या लढती झाल्या त्या ठिकाणच्या सर्वच उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढलेली आहे.
पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः दहावी-बारावी परीक्षांचे कारण पुढे करीत यंदा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लवकर घेतल्या आहेत. मात्र, 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी 21 मार्च 2012ला पूर्ण होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नव्याने निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना 32 दिवस नामधारी म्हणूनच राहावे लागणार आहे.
हिंगोली - जिल्हा परिषद, पंचायत समितीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. 9) जाहीर केला. यामुळे आता विविध योजना कार्यान्वित करणे, भरती प्रक्रिया सुरू करणे, विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरू करता येणार आहेत.
सोलापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी दाखलापासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत पैशाचा वारेमाप वापर झालाच. पण आता निवडणूक निकालाकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. त्यामुळे चुरशीच्या लढतीसाठी पैजा लावल्या जात आहेत. अगदी पाच हजारांपासून लाखांपर्यंत या पैजा लावल्या जात आहेत. अलीकडच्या काही निवडणुकांतील सर्वाधिक पैसा खर्च करावी लागलेली निवडणूक, असा उल्लेख यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत केला जातो आहे.
मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचेच वर्चस्व राहण्याचा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असतानाच आता "सोन्याची कोंबडी' ठरलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील मोठी शहरेही काबीज करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चालवला आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (ता. 9) वांद्रे येथील सरकारी वसाहतीमधील मैदानात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या संयुक्त सभेत प्रचाराचा आरंभ झाला.
नगर ः "जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षीय आणि वैचारिक चर्चेऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपच झाले विकासावर कोणी बोलायलाच तयार नव्हते. हे चित्र विदारक आहे. त्याच वेळी जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये "फाइव्ह स्टार' संस्कृती बळावल्याचे प्रकर्षाने जाणवले. आता ही फाइव्ह स्टार कॉंग्रेस पुन्हा झोपडपट्टीत नेण्याचा निर्धार आहे. त्यासाठी लवकरच जिल्ह्याचा दौरा करणार आहोत,'' असे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी स्पष्ट केले. श्री.
नाशिक (प्रतिनिधी) : पंचायतराज व्यवस्थेत विकासाच्या केंद्रस्थानी असलेल्या "मिनी मंत्रालया'च्या निवडणुका काल पार पडल्या. तिकिटाच्या वाटपापासून ते मतदानापर्यंत उभा असलेला उमेदवार, त्याचा पक्ष यापेक्षाही त्याच्याशी असलेले नातेगोते, लागेबांधे याभोवतीच निवडणूक फिरत राहिल्याचे ठळक चित्र नाशिक जिल्ह्यातील मातब्बर मतदारसंघांतून दिसून आले. नाशिक जिल्ह्यात दोन हजार गावे आहेत.
पुणे ः गावात रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, निधी अडवलाय आदी कारणांमुळे राज्यातील 26 गावांतील मतदारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी (ता. 7) झालेल्या मतदानावर बहिष्कार टाकला. अनेक गावांत पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यात आठ, पुणे जिल्ह्यात पाच गावांत बहिष्कार टाकण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यात आठ गावांत बहिष्कार काटोल तालुक्यातील येनवा जिल्हा परिषद सर्कलमध्ये बोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
मुंबई (प्रतिनिधी) ः राज्याचे "मिनी-मंत्रालय' असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गेली महिनाभर राज्यभर उधळलेल्या प्रचाराची धूळ बसली आहे. पहिल्या टप्प्यात 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांच्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली असून राज्यभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील तीन कोटी 89 लाख 13 हजार 556 मतदार या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
बीड ः "एकेकाळी पुरोगामी आणि विकासाच्या वाटेवर असणारा महाराष्ट्र आता मात्र देण्या-घेण्याच्या सात टक्क्यांत अडकून पडला आहे. भ्रष्टाचाराची ही साडेसाती महाराष्ट्राच्या मागे लागल्यामुळे भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे.
मुंबई ः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात दाखल केलेल्या कॉंग्रेस उमेदवारांच्या यादीबद्दल खासदार आणि आमदार असमाधानी असल्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आज मान्य केले. महापालिकेतील आघाडीच्या चर्चेत किंवा उमेदवार निवडप्रक्रियेशी माझा संबंध नव्हता, पण कानी येणाऱ्या बातम्या आणि वर्तमानपत्रातील वृत्ते बघता तिकीटवाटप असमाधानकारक असल्याचे दाखवतात, असेही ते म्हणाले.