Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 2617
जागतिक पातळीवर आयुर्वेदाचे महत्त्व आणि वनौषधींची मागणी फार पूर्वीपासून असून, सर्व जगभर मनुष्यमात्राने आरोग्य टिकविण्यासाठी कायमच प्रयत्न केले व तसा आहार - विहार स्वीकारला. शरीरात कुठला रोग वा विकृती उत्पन्न झाली, तर त्याचा विचार करत असताना, कुठल्या प्रकारचे असंतुलन झाले व काय कारणाने रोग उत्पन्न झाला, याचा विचार करून तो बरा करण्यासाठी निसर्गाने काय देऊन ठेवलेले आहे, त्याचे संशोधन केले आणि संपूर्ण आरोग्य विज्ञानाची शाखा विकसित केली. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी लागणारी औषधी तेले, च्यवनप्राश, शतावरी कल्प यांचे जगभर वितरण सुरू झाले. त्यांचे परिणाम पाहिल्यानंतर आयुर्वेदाविरुद्ध प्रचार करणारेसुद्धा अचंबित झाले. एकूणच आयुर्वेद, आयुर्वेदाचे शिक्षण, आयुर्वेदिक उपचार पद्धती याकडे सर्व जगाचे लक्ष लागले. इतकेच नव्हे, तर आयुर्वेद हाच आधुनिक जगाचा तारकोपचार आहे, हे सर्वांच्या लक्षात आले. भारताबाहेरच्या देशांत आयुर्वेदिक उपचारपद्धती शासकीय पातळीवर स्वीकारलेली नसूनही अनेक अभ्यासक्रम सुरू झाले. आयुर्वेदिक उपचारांसाठी भारतात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली.
Thursday, February 23, 2012 AT 04:15 AM (IST)
एकाच यंत्राने सारी कामे झाली तर शेतकऱ्याला ती हवी आहेत. तसे करणे शक्‍य नाही, असा उद्योगजगताचा सूर आहे. पण गरज म्हणून या आव्हानाकडे पाहिले पाहिजे. शिवाय किमतीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. कृषी अवजारे विकास केंद्र स्थापन करण्याचा संकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) सोडला आहे. त्याबाबतचे सूतोवाच परिषदेच्या अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक डॉ. एम. एम. पांडे यांनी केले आहे. "देर आये, दुरुस्त आये' असेच या संकल्पाचे वर्णन करावे लागेल. कृषी अवजारे संशोधनासाठी याआधी काहीच झाले नाही असे म्हणता येणार नाही, त्याचबरोबर जे झाले ते समाधानकारक आणि शेतकऱ्यांची गरज भागवणारे आहे असेही म्हणता येणार नाही. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाची किती गरज आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. शेतमजुरांच्या उपलब्धतेची समस्या दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्याने यांत्रिकीकरणाला पर्याय नाही हे गेल्या दशकभरात प्रकर्षाने पुढे आले आहे. विशेषतः कापूस वेचणीच्या आणि ऊस तोडणीच्या हंगामात ही समस्या शेतकऱ्यांना प्रकर्षाने जाणवत असते.
Thursday, February 23, 2012 AT 04:00 AM (IST)
राहुरी विद्यापीठ, जि. नगर (प्रतिनिधी) : कृषी विद्यापीठांनी आंतरपिकांबाबत विकसित केलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी अवलंबणे आवश्‍यक आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकरी आपली आर्थिक प्रगती निश्‍चितच साधू शकतात, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी केले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पाच्या निमित्ताने कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने हनुमंतगाव (ता. राहाता) येथे शेतकरी मेळावा व शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. पोखरकर बोलत होते. या वेळी बटाटा पीक तज्ज्ञ डॉ. जे. टी. नानकर, माजी कृषिमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कृषी परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक अनंत जावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल घावटे, कृषी विज्ञान केंद्राचे भास्कर गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी पंडित लोणारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. डॉ. पोखरकर म्हणाले, कृषी विद्यापीठाने विकसित केलेला ऊस व बटाटा आंतरपीक प्रयोग आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी वापरताना दिसतात.
Thursday, February 23, 2012 AT 02:45 AM (IST)
पुणे ः युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सारे आणि काहीही चालते असे नेहमीच अनुभवाला येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांचा "राजकीय गळा' दाबू पाहणारे निवडणुकीनंतर मात्र सत्तेसाठी गळ्यात गळे घालत असल्याचे चित्र सध्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमुळे पुन्हा अनुभवास येत आहे. पारंपरिक आघाडी, राजकीय विचार यांना मूठमाती देऊन खुर्चीसाठी कोणाशीही घरोबा केला जात असल्याचा अनुभव राज्यभर येऊ लागला आहे. मुंबई : केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे "परतीचे मार्ग' बंद करणाऱ्या "तटबंदी'चे "बांधकाम' कॉंग्रेस नेत्यांनी सुरू केले आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विलासरावांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातच विलासरावांना शह देण्याची रणनीती आखल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी त्यांनी यवतमाळच्या बदल्यात उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा "तह' करण्यास सुरवात केली आहे. यवतमाळमध्ये कॉंग्रेसला जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी राष्ट्रवादीची मदत हवी आहे.
Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)
कऱ्हाड, जि. सातारा ः सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकून मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदाच सिद्ध केले आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदार संघात केलेल्या कामगिरीमुळे तसेच 45 वर्षांपासून कऱ्हाड तालुक्‍याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष न मिळाल्याने या वेळी कऱ्हाड उत्तरमध्ये ते मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या वर्षी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी साजरी होत असताना राष्ट्रवादीचे नेते अध्यक्षपदासाठी कऱ्हाडचा प्राधान्याने विचार करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 72 जागांसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. ज्येष्ठ नेते व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विचारांचा हा जिल्हा असल्याने दोन विधानसभांचा सदस्यांचा अपवाद वगळता सर्व जागाही त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच झेंडा आहे.
Thursday, February 23, 2012 AT 02:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: