दहा हजारांचे कर्ज मिळाले १०८ शेतकऱ्यांनाच

शेतकरी कर्ज
शेतकरी कर्ज

जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या १०८ शेतकऱ्यांनाच तातडीचे कर्ज म्हणून १० हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती आहे. कर्जमाफी योजनेसाठी जवळपास दोन लाख ९३ हजार शेतकरी पात्र ठरले; परंतु फक्त १०८ शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार कर्ज मिळाल्याने शेतकरी व संघटना यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून यासंदर्भात ठोस काम झालेले नसल्याचे दिसते. मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या भागात दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे सुकाणू समितीने हा मुद्दा मांडला होता. त्या वेळेस फक्त जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनाच हे तातडीचे कर्ज मिळाले होते. म्हणजेच पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर १०३ शेतकऱ्यांना हे तातडीचे कर्ज मिळाले आहे, अशी माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात १५ तालुके व खातेधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता १० हजार रुपयांच्या तातडीच्या कर्ज वितरणाची तारीख ही सप्टेंबरअखेरपर्यंत हवी होती, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ३१ ऑगस्ट या मुदतीमध्ये जिल्हाभरातील १०८ शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार कर्ज दिले आहे. जेवढे अर्ज आले तेवढ्या शेतकऱ्यांना वितरण केल्याचे अग्रणी बॅंकेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. कापसाचे पीक फारसे आशादायी नाही. कापूस हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे; पण बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा भागात त्याची अवस्था हळूहळू बिकट होत आहे. शेतकरी बियाणे, खतांवर खर्च करून मेटाकुटीस आले आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, त्यामुळे १० हजार तातडीचे कर्ज वितरणाची मुदत वाढविली जावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रमुख अजय बसेर यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com