ब्राझील येथील साखर उद्योगाकडून इथेनॉलनिर्मिती वाढत असल्यामुळे संभाव्य जागतिक कर्बवायू उत्सर्जनामध्ये ५.६ टक्क्याने घट होऊ शकते, असे मत इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. परिणामी उसाच्या माध्यमातून जैवइंधनाची निर्मिती ही पर्यावरणपूरक ठरत असून, अन्य शेती हा मानव उपयोगी उर्वरित खाद्यपिकांसाठी वापरणे शक्य होईल. हा अहवाल ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
ब्राझीलमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, त्यातून उपलब्ध होणाऱ्या साखरेइतकेच इथेनॉलही महत्त्वाचे आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ब्राझीलमध्ये अन्य पिकांच्या वाढीसाठी इथेनॉलनिर्मिती उपयुक्त ठरू शकते. सामान्य जमिनींचे ऊस शेतीमध्ये रूपांतर होण्यासाठी पर्यावरणाला कर्बवायू उत्सर्जनातून किंमत मोजावी लागते. या किमतीचे विश्लेषण इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. विविध प्रकारच्या माती, तापमान, पर्जन्यमान आणि अन्य विविध निकषांवर ऊस पिकाच्या वाढीचे गणित ठरत असते. यातील प्रत्येक घटकाचा अत्यंत काळजीपूर्वक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधक व प्रा. स्टिफन पी. लॉंग यांनी सांगितले. हा अभ्यास त्यांनी ब्राझील येथील युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलो येथील संशोधकांच्या सहकार्याने केला.
अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.