जाणून घ्या जमिनीचे जलधारणाविषयक गुणधर्म

जमीन सुधारणा भाग 2
जमीन सुधारणा भाग 2

शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता आणि योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासाठी राज्यासह केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यरत आहेत. जलसंधारणाचे विविध प्रकल्पही त्याद्वारे राबवले जात आहेत. मात्र, शेती किंवा कोणताही जलसंधारण प्रकल्य यशस्वी होण्यासाठी मातीच्या जलधारणाविषयक गुणधर्मांचा विचार होण्याची आवश्यकता आहे. शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या सुपीकतेइतकेच पाणीही आवश्यक आहे. मातीचे जलप्रेरित गुणधर्मानुसार जमिनीची जलधारण क्षमता ठरते. यामध्ये जमिनीची रचना, मातीतील कणांची टक्केवारी, भौतिक व सेंद्रिय घटक हेही कारणीभूत असतात. जमिनीत पाणी कशाप्रकारे प्रवाहित होते, त्यानुसार त्याचे काही प्रकार पडतात. जमिनीची जलधारणक्षमता ही मातीच्या खालील घटकांवर अवलंबून आहे.

हायग्रोस्कोपिक वॉटर यामध्ये जमिनीमध्ये पाणी उपलब्ध असले तरी मातीच्या अतिसूक्ष्म कणांना चिकटून व अत्यंत पातळ पापुद्र्यांच्या स्वरूपात असते. त्यामुळे ते वनस्पतींना वापरता येत नाही. यावर १५ बारपेक्षा अधिक दबाव पडल्यास हे पाणी नष्ट होते. मातीचे कण हे धुळीच्या कणांच्या स्वरूपामध्ये सर्वत्र पसरतात. सध्या धुळीच्या लोटांचे प्रमाणही वाढत आहे. मातीच्या अशा कणांना रोखून ठेवण्यासाठी मातीची ही क्षमता उपयुक्त ठरू शकते. कारण या क्षमतेमुळे मातीचे कण एकमेकांशी चिकटून राहतात. थोडक्यात, मातीचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी हे अतिसूक्ष्म स्वरूपातील पाण्याचेसुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. केशाकर्षण पाणी (कॅपिलरी वॉटर) मातीच्या कणांमध्ये असलेल्या पोकळीमध्ये (सूक्ष्म छिद्रांमध्ये) केशीय आकर्षणाने पाणी एकत्रित झालेले असते. त्यापेक्षा आकाराने किंचित मोठ्या पोकळीमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याला वाफसा क्षमतेचे पाणी किंवा फील्ड कॅपॅसीटी म्हणतात. पाऊस पडल्यानंतर साधारणतः दोन दिवसांपेक्षा जास्त काळ हे पाणी छिद्रामध्ये साठून राहते. हे पाणी पिकांच्या वाढीसाठी वापरले जाते. त्यावर वनस्पतींच्या सर्व चयापचय क्रिया चालतात. मातीच्या प्रकारानुसार म्हणजेच मातीच्या कणांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेच्या क्षमतेनुसार जमिनीची पाणी धारणक्षमता ठरते. मातीतील आंतरप्रवाह (इनफील्ट्रेशन किंवा परकोलेशन) मातीची सच्छिद्रता, रचना, कणांची टक्केवारी इत्यादी घटकांनुसार मातीतील पाण्याचा प्रवाह वेगवेगळा असतो. चांगली सच्छिद्रता असलेली माती व मातीची रचना हे दोन्ही घटक पाण्याच्या मातीतील अंतर्गत प्रवाहासाठी जागा उपलब्ध करून देतात. पिकाला पाण्यातील विद्राव्य घटक उपलब्ध होण्यासाठी मदत होते. गुरुत्वाकर्षणाने खाली भूजलात समाविष्ठ होणारे पाणी ः वापसा क्षमतेपेक्षा अधिक असलेले पाणी मातीतील सूक्ष्म व मोठ्या पोकळ्या व भेगातून भूगर्भात जाते. अशा पाण्याला गुरुत्वाकर्षणाचे पाणी म्हणतात. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. यासाठी मातीचे भौतिक गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com