या वर्षी सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस झाला. त्यातही सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे पानांच्या संरक्षणासाठी फवारण्या घेण्यात अडचणी आल्या. पावसाळी हवामानामुळे नवीन फुटी येत राहिल्या. परिणामी घडनिर्मितीमध्ये अडचणी येण्यासोबतच घड जिरण्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. या समस्येवरील उपाययोजनांची माहिती या लेखात घेऊ. सर्वसाधारणपणे हायड्रोजन साईनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते बारा दिवसांत दिसू लागतात. स्वमुळावरील द्राक्षबागेत आठ दिवसांत, तर खुंटावरील द्राक्षबागेत १०-१२ दिवसांत फुटी निघतात. फुटी निघाल्यानंतर साधारणतः एका आठवड्याने फुटीला तीन ते पाच पाने दिसू लागतात. या वेळी काही फुटीसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात. यालाच ‘घड जिरणे’ असे म्हणतात. जोम कमी असलेले, पांढऱ्या रंगाचे व कमकुवत घट जिरण्याची शक्यता अधिक असते. घड जिरण्याची कारणे पुढीलप्रमाणे ः
१. उशिरा झालेली खरड छाटणी ः उशिरा खरड छाटणी झालेल्या बागांमध्ये छाटणीनंतर अन्ननिर्मिती व अन्नसाठा होण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी घड जिरतात. उपाययोजना ः
२. खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान ः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणणे हा खरड छाटणीचा मुख्य हेतू असतो. सूक्ष्म अवस्थेतील घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना प्रतिकूल वातावरण असल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होतो. काही वेळा अंशतः घडनिर्मिती होते. यामुळे प्रत्यक्ष फळ छाटणीमध्ये मिळणारा घड हा जोमदार नसतो किंवा घडांची संख्या कमी राहते. उपाययोजना ः
३. फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल ः फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमध्ये होते. ॲनालजिनची निर्मिती, फुलांची निर्मिती यांसह फुलोऱ्याची निर्मिती खूप महत्त्वाची असते. फुलोरा निर्मितीसाठी सूर्यप्रकाश, सायटोकायनीन, आरएनए या आवश्यक घटकामध्ये बदल झाल्यास, त्याचा परिणाम शेंडा किंवा बाकी घडनिर्मितीवर होतो. उपाययोजना ः या वेळी योग्य सूर्यप्रकाश काडीला मिळेल याची काळजी घ्यावी. त्यामुले सायटोकायनीन व आरएनए यांचे गुणोत्तर समतोल राहण्यास मदत होईल. ४. सूक्ष्म घडांचे पोषण ः काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते. म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात. परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर ६१ ते ९० दिवसांच्या कालावधीमध्ये काही कारणांमुळे घडांचे पोषण होत नाही. असे घड फुटीच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्यता जास्त असते. पावसाळी हवा असल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. मात्र स्वच्छ हवामान असल्यास असे घड टिकून राहत असले तरी त्यांची समाधानकारक वाढ होत नाही. उपाययोजना ः
५. वेलीतील अन्नसाठा ः खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणामुळे वेलीमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. वास्तविक सूक्ष्म घडनिर्मिती आधीच झालेली असल्याने फळ छाटणीत ही समस्या यायला नको. मात्र, फुटींच्या अमर्याद वाढीमुळे घडाचा विकास पूर्ण न झाल्याने ही अडचण निर्माण होते. उपाययोजना ः
६. बोद व पांढऱ्या मुळींची संख्या ः छाटणीच्या वेळी वेलीच्या वाढीसाठी पांढरी मुळी कार्यक्षम असावी लागते. आधीच वेलींमध्ये अन्नसाठा कमी, त्यात मुळी अकार्यक्षम असल्यास घड जिरण्याची समस्या निर्माण होते. उपाययोजना ः बोदामध्ये सेंद्रिय खतांच्या योग्य मात्रा देऊन, तो भुसभुशीत करावा. त्यामुळे पांढऱ्या मुळींची संख्या व कार्यक्षमता वाढते. ७. ऑक्टोबर छाटणीतील चुका ः फळ छाटणीतील चुकांमुळे वेलीवर घट कमी येतात. योग्य डोळ्यावर छाटणी न झाल्याने घड जिरण्याची शक्यता वाढते. कधी कधी हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग सर्वच डोळ्यांवर केले जाते. त्यामुळे सर्व डोळे फुटून निघतात. जास्त डोळे फुटून आल्याने वेलीमध्ये उपलब्ध अन्नसाठ्याची विभागणी होऊन घड जिरणे किंवा घड लहान येणे यांसारखे दुष्परिणाम दिसतात. उपाययोजना ः सर्वप्रथम फळछाटणी घेण्यापूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करावी. नेमका कुठल्या डोळ्यावर घड आहे हे जाणून, त्यानुसार व काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायनामाईडचा वापर करावा. जास्त डोळे न फुटता अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल. ८. जमिनीचे व्यवस्थापन ः
९. योग्य छाटणी व एकसारखी फूट ः
१०. सीपीपीयूचा वापर ः
संपर्क ः ०२०- २६९५६०७५ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.