कृषि सल्ला : भाजीपाला, फळभाज्या

भाजीपाला
भाजीपाला

मिरची :

  • परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१, जी-४, आणि संकेश्‍वरी या वाणांची लागवड महिनाअखेरपर्यंत करावी.
  • प्रतिहेक्‍टरी १ किलो बियाणे वापरावे.
  • ६० बाय ६० सें.मी. किंवा ६० बाय ४५ से.मी. अंतरावर सरी वरंबा लागवड करावी.
  • लागवडीवेळेस ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश जमिनीत पेरुन द्यावे. लागवडीनंतर ४५ दिवसांनी ५० किलो नत्र बांगडी पद्धतीने द्यावे. खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
  • फ्लॉवर :

  • स्नोबॉल-१६, पुसा सिंथेटिक या वाणांची निवड करावी.
  • लागवडीसाठी २१ ते २५ दिवसांची रोपे निवडावीत.
  • लागवड ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर नोव्हेंबर महिनाखेरपर्यंत संपवावी.
  • रोप प्रक्रिया- कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लावावीत.
  • लागवड करताना १६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खते द्यावीत.
  • वाटाणा :

  • आरकेल, सिलेक्‍शन-८२, सिलेक्‍शन-९३ आदी वाणांची निवड करावी.
  • मध्यम ते भारी निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी.
  • लागवडीसाठी प्रतिहेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते.
  • लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी २० टन शेणखत टाकावे. पेरणी ३० बाय १० किंवा ४५ बाय १० सें.मी. अंतरावर करावी.
  • मेथी :

  • पुसा अर्लिब्रांचींग, पुसा कसुरी, आरएमटी-१ सिलेक्‍शन आदी वाण निवडावेत.
  • प्रतिहेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे आवश्यक.
  • बी फेकून किंवा सपाट वाफे (२५ से.मी. अंतरावर आणि ३ बाय २ मीटर आकार) करून पेरणी करावी.
  • लागवडीवेळी नत्र ५० किलो व स्फुरद ५० किलो अशी खते द्यावीत. मेथीच्या प्रत्येक कापणीनंतर ५० किलो नत्र द्यावे.
  • कोथिंबीर :

  • स्थानिक वाण शिंपी, डीडब्ल्यूडी-३, सीएस-४ आदींची निवड करावी.
  • प्रतिहेक्टरी ३०-४० किलो बियाणे आवश्यक.
  • मध्यम काळी जमिनीत हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत टाकून लागवड करावी.
  • लागवडीसाठी १० बाय १५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे करावेत.
  • पालक :

  • ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित या वाणांची निवड करावी.
  • प्रतिहेक्टरी ८ ते १० किलो बियाणे आवश्यक.
  • गाजर :

  • नॉन्टेज, पुसा केशरी या वाणांची निवड करावी.
  • हेक्टरी ६ किलो बियाणे आवश्यक.
  • लागवडीसाठी मध्यम काळी ते हलकी जमीन निवडून लागवडीपूर्वी हेक्टरी २० टन शेणखत टाकावे.
  • नोव्हेंबर महिन्यात करावयाची कामे :

  • खरीप ज्वारी व बाजरीची कापणी करून उतारास आडवी नांगरट करावी.
  • रब्बी ज्वारीस पोटरी अवस्थेत पाणी द्यावे.
  • बागायती हरभरा व करडई पिकास पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी द्यावे.
  • सूर्यफुलास बोंडे लागते वेळी व फुलोऱ्यात असताना पाणी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्‍टरी ३० किलो नत्र द्यावे. 
  • संपर्क : डी. डी. पटाईत, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com