गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते.
काढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचे नियंत्रण करावे. नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम ०.५ ग्रॅम शेंगा पोखरणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नियंत्रण - फवारणी प्रति लिटर क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि. पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयर्न सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) व झिंक सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) यांची फवारणी पेरणीनंतर ३०, ५० व ७० दिवसांनी करावी. सुरु उसाच्या सरीत हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन टाकावे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओल जास्त काळ टिकून राहते. सेंद्रिय खतांचा पुरवठाही होतो. पूर्वहंगामी उसाला दोन कांड्या सुटल्यानंतर हेक्टरी नत्र १३६ किलो, स्फुरद ८५ किलो व पालाश ८५ किलो याप्रमाणात खतमात्रा देऊन पक्की बांधणी करावी. पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पानाद्वारे होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाचा दर कमी करण्यासाठी पिकावर केओलिन ६० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. संपर्क : ०२४२६-२४३२३९ ( ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)