रब्बी ज्वारी पेरणी ही प्रामुख्याने जमिनीतील ओलाव्यावर केली जाते. पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून त्या अवस्थेमध्ये पाण्याचे नियोजन करावे. त्यातून चांगली उत्पादन वाढ मिळू शकते.
उत्तम उत्पादनासाठी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी देण्याची आवश्यकता असते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार खालील संवेदनशील अवस्थांमध्ये सिंचनाचे नियोजन करावे.
जमिनीमध्ये ओलावा कमी असल्यास : रोपांची संख्या कमी करणे : रब्बी ज्वारीच्या पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडल्यास जमिनीत असलेला ओलावा टिकवून धरण्यासाठी रोपांची संख्या त्या प्रमाणात कमी करावी. ओलाव्याचा पिकास योग्य फायदा घेण्यासाठी झाडांची संख्या १/३ पर्यंत कमी करावी. उदा.
पानांची संख्या कमी करणे : दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारीच्या ताटांची वरील ३-४ पाने ठेवून खालील पाने काढून टाकावीत. विशेषतः उशिरा येणाऱ्या जातींची खालची पाने अवर्षण परिस्थितीत कमी करावीत.
बाष्प विरोधकाची फवारणी करावी : केअोलीन ८ टक्के किंवा खडू पावडर ८ टक्के (८० ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांची फवारणी केल्यास पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
आच्छादन : जमिनीतील ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नष्ट होतो. हे टाळण्यासाठी पेरणीनंतर २१ दिवसांच्या आत पीक अवशेष किंवा सेंद्रिय पदार्थांनी दोन ओळींमध्ये आच्छादन करावे. साधारणपणे हेक्टरी ५ टन सेंद्रिय अवशेष लागतात.
ज्वारी पिकावर येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण : काणी :
तांबेरा :
करपा :
खडखड्या :
संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२१५५८८६७ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.