ज्या भागामध्ये सहकारी साखर कारखानदारी फुललेली आहे, तिथे शेतकऱ्यांसाठी ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे असले तरी पाण्याची कमतरता व कारखानदारीचा ऱ्हास यामुळे वऱ्हाडामध्ये ऊस शेती लुप्त होत आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील कुरुम (ता. मूर्तिजापूर) येथील अब्दुल शकील अब्दुल रशीद व त्यांच्या बंधूंनी सेंद्रिय पद्धतीने उसाची उत्तम जोपासना केली असून, त्यापुढे जात गुऱ्हाळ उभारले आहे. सेंद्रिय गुळाच्या निर्मितीतून बाजारपेठेमध्ये नाव कमावले आहे. पाण्याची मुबलकता असताना वऱ्हाडात पूर्वी उसाची लागवड होत असे. राजकीय कृपाशीर्वादाने साखर कारखानेही उभे राहिले. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाली. कारखानदारीलाही ग्रहण लागले. या दोन्ही समस्यांमुळे उसाची लागवड कमी होत गेली. वास्तविक पाहता उत्तम नगदी पिके सोडून शेतकऱ्यांना पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळावे लागले. कधीकाळी हजारो एकर असलेले ऊस लागवड क्षेत्र अाता शासनाच्या पीक पेऱ्यातही दिसत नाही, एवढे कमी व अदखलपात्र बनले. अशाही परिस्थितीत उसाची लागवड करूनच न थांबता, त्यावर आधारित गुऱ्हाळाची उभारणी करण्याचे धाडस मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम या गावातील अब्दुल शकील अब्दुल रशीद व त्यांच्या बंधूंनी केले आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीतून बाजारपेठेमध्ये स्वतःची अोळख बनवली आहे. तीन भावांची एकत्रित ३० एकर शेती ः कुरुम गाव शिवारात अब्दुल शकील अब्दुल रशीद, अब्दुल जमील अब्दुल रशीद, अब्दुल अकील अब्दुल रशीद यांच्याकडे वडिलोपार्जित अशी सात एकर शेती होती. मात्र, ऊस शेती आणि गुऱ्हाळाच्या उभारणीतून हळहळू शेती खरेदी करता तीन बंधूंनी ३० एकरपर्यंत वाढवली आहे. एका तळावर असलेली शेती संपूर्ण बागायती अाहे. त्यातील १२ एकर क्षेत्रात को ९११० व को ८६०३२ जातींची ऊस लागवड केली आहे. या वर्षी आणखी १० एकर नवीन लागवड करणार अाहेत. उर्वरित शेतात सोयाबीन, हरभरा ही हंगामी पिके घेतात. शेतीत जास्तीत जास्त शेणखताचा वापर ते करतात. ऊस शेतीत रासायनिक खतांचा वापर संपूर्ण बंद केला अाहे. दुपटीने वाढवले उसाचे क्षेत्र ः पूर्वी अकोला जिल्ह्यात उसाचे कारखाने सुरू होते. अनेक शेतकऱ्यांप्रमाणेच १९९२ ते ९७ या काळात अब्दुल शकील हे ऊस पीक घेत. कारखानदारी हळूहळू लयाला गेली. त्याचा फटका अन्य शेतकऱ्यांबरोबरच अब्दुल रशीद यांनाही बसला. अनेकांनी उभा ऊस जाळला किंवा जनावरांना खाऊ घातला. या कटू अनुभवाने पोळलेल्या अब्दुल रशीद व बंधूंनी उसावर प्रक्रिया करण्याचा घाट घातला. मात्र अाता पुन्हा ऊस लागवडीकडे ते वळाले, पण या वेळी लावलेला संपूर्ण ऊस स्वतःच प्रक्रिया करण्यासाठी वापरण्याचा निश्चय करीत गुऱ्हाळ थाटले. या वर्षी त्यांचा हा तिसरा हंगाम अाहे. त्यांचे ऊस क्षेत्र पाच एकरपासून वाढवत १२ एकरांपर्यंत पोचले आहे. पहिल्या हंगामात २०० क्विंटल, दुसऱ्या हंगामात १५० क्विंटल गूळ तयार केला. सेंद्रिय गूळनिर्मिती ः
सेंद्रिय गुळाला आहे उत्तम मागणी ः
एकत्र कुटुंब; अादर्शवत शेती ः चारही भावांची शेती एकत्र असून, त्यामध्ये सर्वांचे कष्ट आहेत. मात्र, त्याच वेळी शेतीकडे लक्ष देताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडेही प्राधान्याने पाहिले जाते. अब्दुल शकील यांचा मुलगा एमबीएपर्यंत शिकून मुंबईत नोकरी करतो. दुसऱ्या भावाची मुलगी उच्च शिक्षण घेत अाहे. शेतीला लागणारी सर्व प्रकारची यंत्रे, ट्रॅक्टर, बैलजोड्या आवश्यकतेनुसार खरेदी केले आहेत. तसेच शेतात पॅकहाउसही उभे केले अाहे. याच ठिकाणी गुळाची निर्मिती केली जाते. अशी आहे प्रक्रिया ः
अ. शकील अ. रशीद यांची वैशिष्ट्ये ः
संप्रक ः अब्दुल शकील अब्दुल रशीद, ९४२३१३०४८०,८३७८९२८०३४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.