वातावरणातील बदलाचा परिणाम परजिवींवरही होत असून, जगभरातील एक तृतीअंश परजिवी नष्ट होण्याची शक्यता नुकतीच एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
माणूस आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा शरीरावर जगणाऱ्या पट्टकृमी, गोलकृमी, गोचिड, माशा यासारख्या परजिवींमुळे रोगांचा प्रसार होण्याचा धोका असतो. मात्र, तरीही शास्त्रज्ञांकडून हे जीव पर्यावरणामध्ये अत्यंत मोलाची भूमिका निभावत असल्याचे मानले जाते. बदलत्या वातावरणाचा परिणाम माणूस, प्राणी, वनस्पती या सर्व घटकांसह त्यावर अवलंबून असलेल्या परजिवींवरही होणार आहे. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.
ज्या वेगाने यजमान प्राण्यांच्या रहिवासामध्ये घट होत आहे, त्याच प्रमाणात त्यांच्यावरील परजिवींसाठीही अडचणी निर्माण होणार आहेत. सध्याच्या सरासरीने त्यांचे रहिवासही २०७० या सालापर्यंत १० टक्क्यापर्यंत कमी होणार आहेत. यामुळे यजमान नष्ट झाल्यास परजिवी नष्ट होण्याचे प्रमाण एक तृतीअंश इतके प्रचंड असेल. या विषयी माहिती देताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील कॉसिन कार्लसन यांनी सांगितले, की वेगाने नष्ट होत असलेल्या प्रजातीमध्ये परजिवी सर्वात धोक्यामध्ये असलेला गट आहे. सध्या परजिवी नष्ट होण्याचे प्रमाण २० टक्के असून, भविष्यात कर्ब उत्सर्जन आणि वातावरण बदल यामुळे त्यात ३७ टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
पर्यावरणामध्ये परजिवींची आवश्यकता ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.