संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने नेहमीच भुरळ घातली आहे. दोन फूटबॉलएवढ्या क्षेत्रफळामध्ये ६५० विविध झाडांच्या प्रजाती एकत्र नांदत असतात. त्यातही एक सारख्या वनस्पती एकमेकांच्या जवळ अजिबात वाढत नाहीत. आपले शेजारी वेगळे निवडण्याचा तर प्रकार नसावा, याबाबत उतह विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला आहे. वाढीसाठी वर्षावनामध्ये सातत्याने एक युद्ध सुरू असते. वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी झगडत असतात. एकासारख्या झाडांच्या प्रजाती एकाच प्रकारे स्रोतांसाठी प्रयत्न करत असल्याने एकमेकांच्या वाढीवर परिणाम होतो. वनस्पतींचे दुसरे युद्ध सुरू असते ते म्हणजे पाने खाणाऱ्या किडींशी. एकाच प्रकारच्या झाडावर किडी आणि रोगांचा प्रकारही सारखाच असतो. त्यामुळे एका झाडावर प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा प्रसार वेगाने अन्य झाडांपर्यंत होतो. त्यामुळे संशोधकांच्या समोर प्रश्न उभा राहिला की वर्षावनातील विविधता ही स्पर्धेमुळे असते की रोगकिडींमुळे? उतह विद्यापीठातील संशोधकांनी एका प्रयोगामध्ये दोन्ही यंत्रणाची तुलना केली. संशोधक गटाने शेजारच्या झाडांमुळे वाढीवरील परिणामासोबतच शेजारच्या नऊ प्रजातींच्या इंगा जातीच्या झाडांवर होणारे परिणामांचे विश्लेषण केले. त्यात झाडांकडून स्रोत मिळवण्याचे गुणधर्म, पाने खाणाऱ्या किंडीविरुद्धची संरक्षण प्रणाली आणि त्या झाडावर राहणाऱ्या किडींची तुलना केली. त्यातून संरक्षण गुणधर्म आणि किडीच्या प्रसारांचा वाढीवर आणि तग धरण्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्या तुलनेमध्ये स्रोत मिळवण्यासाठीचे गुणधर्मांचा वनस्पतींच्या यशावर काही परिणाम दिसून आला नाही. याचाच अर्थ किडींच्या संख्येवर परिणाम करणारे कोणतेही घटक उदा. वातावरणातील बदल किंवा रहिवासाचे तुकडे होणे यांचा परिणाम वर्षावनांच्या आरोग्यावर पडणार आहे. उतह विद्यापीठातील जैवशास्त्र महाविद्यालयातील संशोधक डेल फॉरिस्टर यांनी सांगितले, की वनस्पतींच्या प्रजाती एकमेकांवर किती गुंतागुंतीच्या पद्धतीने अवलंबून असतात, याविषयी समजून आले. कोणतीही प्रजाती ही एकटी, वेगळी जगू शकत नाही. मौल्यवान अशा स्रोंतासाठी एकमेकांशी प्रत्येक पातळीवर स्पर्धा करावी लागते. बाह्य शत्रूपासून संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. त्यातून एकमेकाशी संबंध निर्माण होतात, त्याचा परिणाम वर्षावनातील विविधतेवर होत असतो. हे संशोधन दी जर्नल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. असा झाला अभ्यास
प्रो. फिल्लिस कोले यांनी सांगितले की, सामान्यपणे आपल्याला जंगलामध्ये पानांवर किडींचे साम्राज्य पसरले असेल, असेच वाटत असते. मात्र, वनस्पतींकडेही अगणित संरक्षण प्रणाली असतात. कोवळ्या पानांवर किडींचा जास्त हल्ला होतो, त्या वेळी अशा पानांमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक विषारी घटक भरलेले असतात. अशा कारणामुळे पाने खाणाऱ्या किडींची प्रत्येक प्रजाती ही केवळ काही प्रकारच्याच वनस्पती खाऊ शकते. अत्यंत जवळच्या असलेल्या वनस्पतींमध्ये समान संरक्षण गुणधर्म असतात. त्यामुळे त्यावर समान किडी असतात. जर वनस्पतींच्या शेजारच्या वनस्पतींचे संरक्षण गुणधर्म वेगळे असल्यास त्यांना पाने खाणाऱ्या किडींचा धोका राहत नाही. रासायनिक घटकांचे भांडार
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.