जैवविविधतेमध्ये वनस्पती, सजीव, उभयचर प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. रहिवास नष्ट होत असल्याने जैवविविधतेला प्रामुख्याने फटका बसत असून, त्यासाठी वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे संशोधकांचे मत आहे. यासाठी केवळ शेतीपुरता विचार करून चालणार नाही, तर जमिनीच्या वापरामध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. या विषयी कॅलिफोर्निया-बर्केले विद्यापीठातील संशोधकांनी एक लेख सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये लिहिला आहे. तपकिरी वटवाघळांचे शरीर तळहातापेक्षा लहान असले तरी पंखाची लांबी मात्र एक फुटापेक्षा अधिक असते. ते एका रात्रीमध्ये ६ ते ८ हजार किटकांचा फडशा पाडते. यामुळे पिकातील किडींची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, अशा वटवाघळांच्या अत्यंत अल्प प्रजाती अमेरिकेतील शेती परिसरामध्ये राहतात. याचे कारण म्हणजे एकल पिकांची शेती. अशा एकाच पिकामुळे वटवाघळांना राहण्यासाठी, घरटे करण्यासाठी योग्य अशी जागाच उपलब्ध असत नाही. जमिनीच्या वापराच्या पद्धतीमध्ये - शेते, कुरणे आणि वने यातील योग्य समन्वय राखण्याची आवश्यकता विविध संशोधनामधून सतत पुढे येत आहे. नुकत्याच प्रकाशित लेखामध्ये कॅलिफोर्निया बर्केले विद्यापीठातील पर्यावरणशास्त्रज्ञांनी याविषयी आपली मते मांडली आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.