जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी प्रामुख्याने वातावरणातील वाढते तापमान व उच्च आर्द्रता हे घटक कारणीभूत असतात. एका विशिष्ट तापमानाला जनावरे आपल्या शरीरातील उष्णता विशिष्ट प्रमाणात शरीराबाहेर टाकू शकत नाहीत. त्यामुळे जनावरांच्या शरीर तापमानाचे संतुलन बिघडते आणि जनावरांच्या शरीरावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो. वातावरणात होणाऱ्या कमी-अधिक तापमानास जनावरे स्वतःला समायोजित करत असतात. परंतु उन्हाळ्यात एकदम होणारी तापमान वाढ जनावरे सहन करू शकत नाहीत. उन्हाळ्यात रात्रीचे तापमान फारसे कमी होत नसल्याने जनावरे उष्मा तणावास बळी पडत असल्याचे दिसून येते. उष्मा तणाव जनावरांना प्रजनन व चांगल्या उत्पादन क्षमतेसाठी एका विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. माणसांमध्ये घाम नियंत्रण यंत्रणा विकसित असल्यामुळे तापमान वाढल्यास माणसांना घाम येतो. परिणामी शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. परंतु दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः म्हैस व गाय वर्गामध्ये घाम ग्रंथी योग्य प्रकारे विकसित झालेल्या नसतात व त्वचेमध्ये खोलवर असतात, त्यामुळे त्यांची घाम नियंत्रण यंत्रणा कमजोर असते. उन्हामध्ये घाम कमी येतो व शरीराचे तापमान कमी करण्यात व शरीर थंड करण्यात जनावरे पूर्णतः श्वसनावर अवलंबून असतात. रवंथ क्रियेदरम्यान होणाऱ्या फसफसण्याच्या क्रियेमुळेसुद्धा शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होत असते. घाम नियंत्रण यंत्रणा अपुरी असल्यामुळे जनावर प्रभावीपणे शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकत नाही, परिणामी दिवसाच्या वेळी शरीरात उष्णता साठत जाते व रात्रीच्या थंड वेळी ही उष्णता शरीराबाहेर टाकली जाते. परंतु जर तापमान रात्रीच्या वेळीसुद्धा अधिक असेल तर शरीरात साठलेली उष्णता बाहेर टाकली जात नाही व शरीरामध्ये अधिक उष्णता साठविली जाते. त्यामुळे जनावराची तापमान नियंत्रण यंत्रणा काम करीत नाही, परिणामी जनावर उष्मा तणावास बळी पडते. संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, ४ ते २४ अंश सेल्सिअस तापमानात जनावरे सामान्य स्थितीत असतात व सोबतच अधिक प्रजननक्षम व उत्पादनक्षम असतात. या तापमानाला ‘थर्मोन्युट्रल झोन’ असे म्हणतात. उष्मा तणावास कारणीभूत घटक
उष्मा तणावाचा जनावरांवर होणारा परिणाम
जनावरामधील उष्मा तणावाची तीव्रता जनावरामधील उष्मा तणावाची तीव्रता ही प्रामुख्याने वातावरणातील वास्तविक तापमान आणि सापेक्ष आर्द्रता, उष्मा तणावाचा कालावधी, रात्रीचे तापमान, जनावरांना देण्यात येणारा आहार, जनावराचा गोठा, पाण्याची उपलब्धतता, जनावराची जात, वजन, वय, रंग आणि हवेचा प्रवाह, दूध उत्पादनाचा टप्पा इत्यादीवर अवलंबून असते. तापमान सतत ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास संकरीत जनावराची उष्णता ४० ते ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास देशी जनावरे उष्माघातास बळी पडून मृत्युमुखी पडू शकतात. संपर्क ः डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४ (सहायक प्राध्यापक व विभागप्रमुख, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.