कृषी सल्ला : भात, आंबा, काजू, चिकू, वेलवर्गीय भाजीपाला

कृषी सल्ला : भात, आंबा, काजू, चिकू, वेलवर्गीय भाजीपाला
कृषी सल्ला : भात, आंबा, काजू, चिकू, वेलवर्गीय भाजीपाला

भात ः

  • भात खाचरातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. पाण्याची योग्य पातळी नियंत्रित करावी.
  • भात क्षेत्राची बांधबंदिस्ती करावी.
  • भाताच्या पुनर्लागवडीसाठी खरीप हंगामात १२ ते १५ सेंमी उंचीची पाच ते सहा पाने फुटलेली २२ ते २५ दिवसांची रोपे वापरावीत.
  • चिखलणीवेळी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रति हेक्टर अशी खतमात्रा द्यावी.
  • भाताच्या रोपांची लाववड २० बाय १५ सेंमी अंतर ठेवून करावी. लागवड सरळ व उथळ (२.५ ते ३.५ सेंमी खोल) करावी. उथळ लागवड केल्यास फुटवे चांगले येतात. एका चुडात तीन रोपे लावावीत. संकरीत भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे.
  • बांधावरील खेकड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक किलो शिजवलेल्या भातामध्ये अॅसिफेट* (७५ टक्के पाण्यात मिसळणारी) ७५ ग्रॅम मिसळून विषारी आमिष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणपणे १०० गोळ्या तयार होतात. प्रत्येक छिद्राच्या तोंडाशी एक गोळी ठेवावी व छिद्र बुजवून घ्यावे. दुसऱ्या दिवशी जी छिद्रे पुन्हा उकरली जातील अशा बिळात पुन्हा आमिष वापरावे.
  • आंबा पूर्ण वाढलेल्या आंबा झाडास (१० वर्षावरील) ५० किलो शेणखत किंवा कंपोष्ट, आणि १.५ः०.५ः१.५ किलो या प्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश अशी मात्रा द्यावी. पालाश अन्नद्रव्य सल्फेट ऑफ पोटॅशमधून द्यावे.

    काजू

    तीन वर्षावरील काजूच्या कलमास २० किलो शेणखत, २ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत.

    चिकू

    वीस वर्षावरील चिकू झाडास ५० किलो शेणखत, ६ किलो युरिया, १८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत. नारळ, सुपारी

    तीन वर्षावरील सुपारी झाडास प्रत्येकी एक घमेले शेणखत, १२ किलो हिरवळीचे खत, १६० ग्रॅम युरीया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत द्यावे. वेलवर्गीय भाजीपाला ः

  • वेलवर्गीय भाजीपाला रोपांना काठीचा आधार द्यावा. बागेतील तणांचा बंदोबस्त करावा. प्रति गुंठा क्षेत्रास ७२० ते ८५० ग्रॅम युरिया खताचा एक तृतीअंश हप्ता द्यावा. मंडपाची व्यवस्था करावी.
  • आंबा बाठा कलमे लवकरात लवकर बांधून पूर्ण करावीत. पावसाळी वातावरणामुळे कलमे जगण्याचे प्रमाण चांगले राहते.
  • टीप

  • आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी बागेत पावसाचे अतिरिक्त पाणी निचरा होण्यासाठी गरजेनुसार चर खोदून घ्यावेत.
  • पावसाची तीव्रता कमी असताना खते द्यावीत.
  • संपर्क ः ०२३५८ - २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.) * मित्रकिटकांना हानिकारक ठरतील अशा कीटकनाशकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com