कृषी सल्ला - कोकण

कृषी सल्ला कोकण
कृषी सल्ला कोकण

भात

  • अवस्था ः पूर्व मशागत
  • उन्हाळी भात रोपवाटिकेसाठी १ मी. X १० मी. अंतराचे गादीवाफे तयार करावे. वाफ्यांना प्रतिआर क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.
  • उन्हाळी भात लागवडीसाठी कर्जत-१८४, रत्ना, रत्नागिरी-१, रत्नागिरी-७४, रत्नागिरी-२४, रत्नागिरी-७११, कर्जत-१, कर्जत-३ या जातींचे बियाणे वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे थायरम बुरशीनाशक चोळावे.
  • भुईमूग

  • रब्बी भुईमूग लागवडीसाठी एस बी. ११, टी.ए.जी.- २४, फुले प्रगती, कोकण गौरव, टी. जी. २६, कोकण ट्रोम्बे टपोरा या जातींचे बियाणे १२५ ते १५० किलो प्रतिहेक्टरी वापरावे.
  • मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाणास थायरम २.५ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे.
  • आंबा

  • अवस्था ः पालवी
  • आंब्याच्या नवीन पालवीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • आंब्याच्या कोवळ्या पालवीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
  • डायमेथोएट ( ३० टक्के प्रवाही ) १.५ मि.ली.
  • फवारणी पानाच्या खालच्या बाजूवर पडेल, याची दक्षता घ्यावी.
  • (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत.) काजू

  • अवस्था ः मोहोर
  • काजूमध्ये मोहोर फुटण्याच्या अवस्थेत ढेकण्याचा (टी मॉंस्कीटो बग) आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी प्रोफेनोफोस (५० टक्के) १ मि. ली.
  • पुढील फवारणी मोहोर फुटण्याच्या वेळी करावी.
  • नारळ

  • अवस्था ः फळधारणा
  • नारळावरील इरीओफाईड कोळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के कडूनिंबयुक्त (अॅझाडीरेक्टीन) कीटकनाशक ७.५ मि.ली. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावे. कीडनाशक दिल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत.
  • नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
  • भाजीपाला/फळबाग रोपवाटिका

  • अवस्था ः पुनर्लागवड
  • कोबी पिकाची रोपे लागवडीयोग्य झाली असल्यास पुनर्लागवड करावी.
  • लागवड सरीवरंब्यावर ४५ x ४५ से.मी. किंवा ६० x ६० से.मी. अंतरावर करावी.
  • लागवडीच्या वेळेस प्रतिएकरी ८ टन शेणखत, ३५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४० किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.
  • टोमेटो, वांगी, मिरची पिकांमध्ये सूत्रकृमी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची लागवड करावी.
  • डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ ०२३५८- २८२३८७ (नोडल ऑफिसर, कृषिविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com