भारतामध्ये आपली देशांतर्गत गरज भागवून उर्वरित गव्हाची निर्यात करण्याची क्षमता आहे. त्यातून परकीय चलन मिळवण्यास वाव आहे. निर्यातीसाठी शासनामार्फत भरपूर सवलती देण्यात येतात व त्यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला माल विकून जास्त पैसे मिळवू शकतो. गव्हाचे अस्टीवम (शरबती), ड्यूरम (बन्सी/ बक्षी) व डायकोकम (खपली) अशा तीन प्रजाती आहेत. परदेशात ड्यूरम गव्हाला जास्त मागणी आहे. जो ड्यूरम गहू जिरायती क्षेत्रात घेतात त्याला ‘बन्सी गहू’ म्हणतात आणि बागायती ड्यूरम गव्हाला ‘बक्षी गहू’ म्हटले जाते.
गव्हाच्या निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मापदंड :
ड्यूरम गव्हाचे निर्यातीसाठी गुणधर्म : खाली दिलेल्या तक्त्यामधील भौतिक तसेच रासायनिक गुणधर्मामुळे ड्यूरम गहू निर्यातक्षम आहे. भौतिक गुणधर्म
रासायनिक गुणधर्म
जमीन :
पूर्वमशागत : गव्हाची मुळे ६० ते ७० सेंमी खोलीपर्यंत वाढत असल्याने जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी. १५ ते २० सेंमी खोल नांगरणी करून, ढेकळे फोडून घ्यावीत. त्यात शेणखत किवा कंपोस्ट खत पसरावे. त्यानंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत व समपातळीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, तणांच्या मुळ्या (काशा), इ. वेचून शेत स्वच्छ करावे. पेरणी :
ड्यूरम पिकातील अंतर : गव्हाच्या इतर जातींचे मिश्रण टाळण्यासाठी दोन गव्हाच्या जातींमध्ये योग्य अंतर असावे. खते :
निर्यातक्षम ड्यूरम गव्हाच्या जाती : महाराष्ट्रासाठी ड्यूरम गव्हाच्या पुढील सुधारित जातींची शिफारस केली आहे.
सुधारित वाण | पिक तयार होण्यास लागणारा कालावधी | सरासरी उत्पादन क्विं/हेक्टर) | प्रमुख वैशिष्ट्य |
एम. ए. सी. एस. ३१२५ (बागायती वाण) | ११२ ते ११५ | ४४ ते ५२ | तांबेरा रोगास प्रतिकारक, पिवळसर चमकदार व जाड दाणे, रवा, शेवयासाठी उत्तम वाण |
एन. आय डी. डब्ल्यू. १५ (पंचवटी) (जिरायती वाण) | ११५ ते १२० | १२ ते १५ | प्रथिने १२ %, दाणे जाड, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक, |
एम. ए. सी. एस. ४०२८ (जिरायती वाण) | १०० ते १०५ | १८ ते २० | तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १४.७ %, जस्त ४०.३ पी पी एम, लोह ४६.१ पी पी एम |
एम. ए. सी. एस. ३९४९ (बागायती वाण) | ११० ते ११२ | ४४ ते ५० | आकर्षक व तजेलदार दाणा, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, कुरडया, शेवयासाठी उत्तम वाण |
एन. आय डी. डब्ल्यू.२९५ (बागायती वाण) | ११५ ते १२० | ४० ते ४५ | दाणे चमकदार व मोठे जाड, तांबेरा रोगास प्रतिकारक, उत्तम वाण, |
पाणी व्यवस्थापन : पेरणीनंतर १८ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हलक्या-मध्यम जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तथापि, पिक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्या वेळी पाणी देणे फायद्याचे ठरते. पिकाची अवस्था - दिवस
श्रीकांत एस. खैरनार; ८८०५७५७५२७ अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.