यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती आहे. ते १९९४ पासून सेंद्रिय शेती करतात. जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत ते म्हणाले की, रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.
भाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत, गोमूत्र व बायोमासचा वापर करतात. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून धैंचा, बाजरी, बरबटी या पिकांची लागवड करतो. तीन वर्षांतून एकदा ५ ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळतो. त्याचबरोबरीने दरवर्षी एक ट्रॉली ‘अलौकिक’ खत (एक ट्रॉली शेणखत, तीन क्विंटल तळ्यातील गाळ, ३० किलो तुरीची चुरी, २ किलो भुईमूग तेल, पाच किलो गूळ याचा वापर करून तयार केलेले खत) आणि ३०० लिटर गोसंजीवक (३० किलो गाईचे ताजे शेण, ३ लिटर गोमूत्र, एक किलो गूळ यांचे मिश्रण) याचा जमिनीत वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. लागवड प्रामुख्याने सरी वरंब्यावर केली जाते. प्रत्येकी आठ फुटांवर वरंबा बंद केला जातो, त्यामुळे वाफ्यात पाणी साचते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात १४ इंची डवऱ्याला दोर बांधून सऱ्या पाडल्या जातात. या पद्धतीने ओलावा कायम राहतो. या सर्व प्रयत्नातून गेल्या चार वर्षांत मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ वरून २.१ वर पोचला आहे. रासायनिक घटकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. अशा पोषक घटकांची उपलब्धताच कमी असलेल्या जमिनीतून उत्पादित झालेले अन्नधान्य आपल्या आरोग्यासाठी पोषक कसे असणार, असा रास्त सवाल सुभाष शर्मा उपस्थित करतात. जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी अनुभवजन्य सूत्रे ः
हिरवळीचे खत ः
संपर्क ः सुभाष शर्मा, ९४२२८६९६२०.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.