जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून, त्यामध्ये पिकांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अधिक धोरणात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. २००९ पासून पतियाळा जिल्ह्यातील बुधमौर आणि जोधपूर येथील काही शेतकरी गटांनी व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञानी एकत्र येत जमीन सुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून भात व गहू पिकांत १० ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढ मिळवणे शक्य झाले. वाढत्या सोडियम क्षारामुळे भूजलामध्ये अल्कली गुणधर्म वाढतात. अशा पाण्याचा सिंचनासाठी सातत्याने वापर केल्याने जमिनीमध्ये पिकांमध्येही त्याचे प्रमाण वाढते. या घटकाच्या अधिक्यांमुळे पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत जाते. पतियाळा जिल्ह्यातील बुधमौर आणि जोधपूर भागामध्ये भात आणि गहू पिके प्राधान्याने घेतली जातात. यात रोपे मरणे, पाने पिवळी पडणे, पुनरुत्पादकता कमी होणे, दाणे न भरणे या लक्षणांसह उत्पादनामध्ये सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होते. यावर मात करण्यासाठी कर्नाल येथील ‘सेंट्रल सॉइल सॅलानिटी रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील आंतरशाखीय संशोधकांनी काम सुरू केले. या गावातील सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाद्वारे नेमकी समस्या आणि स्वरूप समजून घेतले. त्याच प्रमाणे माती आणि सिंचनाच्या पाण्याचे नमुने तपासून विश्लेषण केले गेले. योग्य त्या शास्त्रीय उपाययोजना शेतकऱ्यांना सुचवण्यात आल्या. जोधपूर आणि बुधमौर गावातील मातीचा पोत (सिल्ट अधिक क्ले चे प्रमाण) ८० टक्के, सामू अधिक (८.५ ते ९.५), मध्यम क्षारता (०.७ ते ०.९) असे आढळले. भूजलामध्ये सोडियम कार्बोनेटचे अंश (RSC) ३.५ ते ४.१ meq L-१ होते. मातीमध्ये सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी होते. अभ्यासक्षेत्रातील मातीचे भौतिक - रासायनिक गुणधर्म मातीचे नमुने (०-१५ सें.मी.) (नमुने = २८) पाण्याचे नमुने (n= ९) मातीचा सामू २ - ८.५-९.५ मातीची ईसी (dS m-१) - ०.७-०.९ सेंद्रिय कर्ब (%) - ०.४-०.५ (कमी) उपलब्ध नत्र (kg/ha) - १४३.९ (कमी) उपलब्ध P२O५ (kg/ha) - २१.२ (कमी) उपलब्ध K२O (kg/ha) - २२८.८ (मध्यम) सोडियम कार्बोनेट अंश RSC meq L-१ -३.५-४.१ (अधिक) सामू - ७.८-८.२ क्षारता (dSm-१) - ०.७-०.८
भातातील यश
गहू पिकातील यश
या प्रकल्पातून पुढे आलेल्या बाबी ः जिथे जमिनीची सुपीकता, सिंचनाच्या पाण्यामध्ये सोडियम क्षारांचे अधिक प्रमाण आणि हवामानातील तीव्र बदल अशा तीन समस्यांचा सामना करताना केवळ एकाच तंत्राचा वापर उपयोगी ठरणार नाही. दोन किंवा त्यापेक्षा अधिक तंत्राचा एकत्रित वापर करावा लागणार आहे. यासाठी होणारा खर्च अधिक असला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ मिळू शकते. असेच प्रकल्प वेगाने राबवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शासनाने एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याची गरज यातून अधोरेखित झाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.