सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची निर्मिती व वापर आणि सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन या तीन बाबी महत्त्वाच्या असतात. त्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ. आच्छादनाचा वापर ः काडीकचरा, धसकटे, गवत, साळीचा व गव्हाचा भुसा व तुरकाडी, उसाचे पाचट, कपाशीचे काड याचे आच्छादन करावे. नैसर्गिक घटक असलेल्या आच्छादनाचे कालांतराने सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. जिवाणूची वाढ होण्यासाठी सेंद्रिय अन्नघटक उपलब्ध होतात. प्लॅस्टिक आच्छादनामध्ये चंदेरी, काळ्या, पांढऱ्या, निळ्या, पिवळ्या, लाल, आकाशी व पारदर्शक रंगाचे प्लॅस्टिक उपलब्ध आहे. याचा वापरदेखील फायदेशीर दिसून आला आहे.
फायदे :
गांडूळखत (Vermicompost): जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते. गांडुळे पिकांचे अवशेष व अन्य घटकांना वेगाने कुजविण्यासाठी मदत करतात.
गांडूळ खत म्हणजे काय? गांडूळखतामध्ये गांडूळाची विष्टा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाचे अंडीपुंज, त्यांच्या बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो. गांडूळांना सेंद्रिय पदार्थ खावून, त्याच्या पचनसंस्थेतून बाहेर पडतात. या प्रक्रियेमध्ये सेंद्रिय पदार्थांमध्ये अनेक संजीवकांची भर पडते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी फायदा होतो.
गांडूळखत निर्मितीसाठीच्या गांडूळ प्रजाती ः
गांडूळखत तयार करण्याची पद्धत : गांडूळखत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते छत उभारून जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे गादीवाफे तयार केले जातात. यात गांडूळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार केले जाते.
गांडूळखत निर्मितीचे टप्पे -
साधनसामग्री : गांडूळाचे उन्हे आणि पावसापासून संरक्षणासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताटापासून तात्पुरते छप्पर तयार करावे. पावसाळ्यात पावसाचे पाणी आत शिरू नये, यासाठी छप्पर व बाजूने प्लॅस्टिक / ताडपत्री लावून घ्यावी. गांडूळाचे खाद्य म्हणून गुरांचे शेण, शेळ्या- मेंढ्यांचे खत, घोडा-गाढवाची लिद, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाज्या आणि फळांचे टाकाऊ भाग व उर्वरित अन्नपदार्थ यांचा वापर करता येतो.
सेंद्रिय खतांचे फायदे
सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन
नत्रपुरवठा : जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन ती चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कोंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात. स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये : सेंद्रिय खतामुळे नत्र, स्फुरद व पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होते. ती झाडांमध्ये मुळांद्वारे शोषली जातात. जमिनीची जलधारण क्षमता वाढते : ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास जलधारण क्षमता दुप्पट होते. एका एकरात ८ टन कुजलेले शेण खत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात. जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व जलधारण क्षमताही वाढते. जमिनीचा सामू : सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.क्षारांच्या कणांची अदला बदल करण्याची जमिनीची शक्ती : सेंद्रिय खतांमुळे कँशन एक्सचेंज कॅपॅसिटी २० ते ३० टक्केने वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये मिळतात. कर्बाचा पुरवठा : कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो. हे जीवाणू जमिनीतून अन्नद्रव्ये झाडांना उपलब्ध करून देतात.
: अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ , : डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७० (सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.