भाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुनर्लागवडीनंतरच्या काळातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. रोपवाटिकेमध्ये बियाणे प्रक्रिया, कीड व रोगांना प्रतिबंध याला प्राधान्य द्यावे. टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या भाजीपाला पिकांची तीनही हंगामामध्ये लागवड केली जाते. त्यांच्या रोपवाटिकांचे नियोजन लागवडीपूर्वी योग्य काळ आधी करणे गरजेचे आहे. रोपवाटिकेसाठी जमीन किंवा माती - मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. या जमिनीमध्ये आडवी उभी नांगरणी करून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. त्यात चांगले कुजलेले शेणखत (हेक्टरी १० ते १५ टन) टाकावे. रान बांधणी फळभाज्यांच्या रोपनिर्मितीसाठी शक्यतो गादी वाफे तयार करावेत. त्याची लांबी ३ मीटर, रुंदी १ मीटर आणि उंची १५ ते २० सेंमी असावी. गादीवाफ्याच्या निर्मितीवेळी त्यावर चांगलेले कुजलेले शेणखत एक घमेले (८ ते १० किलो), अधिक १९ः१९ः१९ हे मिश्रखत १५० ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० ग्रॅम प्रमाणात मिसळावे. लागवडीपूर्वी मानमोडी (डंपीग ऑफ) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० ते ४० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीजन्य कीडनाशक गांडूळखत किंवा शेणखतामध्ये मिसळून द्यावे. बियाणे मात्रा आणि बीजप्रक्रिया
बियाणे लागवड गादीवाफ्यावर सुमारे ८ ते १० सेंमी अंतरावर रुंदीशी समांतर रेषा पाडून त्यात बियाणे टोकत जाते. ते बियाणे हलक्या हाताने मातीने झाकून टाकावे. झारीने पाणी द्यावे. रोपवाटिका व्यवस्थापन
रोपांची पुनर्लागवड
डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.