भुईमूग पीक आऱ्या लागण्याची अवस्था, तसेच शेंगा भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी संवेदनशील असल्याने भुईमूग पिकास आऱ्या लागण्याच्या काळात व शेंगा भरताना पाणी व्यवस्थापन करावे. फलधारणा अवस्था (सुपारी ते अंडाकृती अवस्था) जिल्ह्यातील काही ठिकाणी मोठ्या आकाराची फळे काढणीच्या अवस्थेत असून, फळांची काढणी ‘नूतन’ झेल्याच्या साह्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवसअगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. आंब्यावरील काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर त्वरित फळे ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरोगोटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत. आंबा पिकामध्ये फळांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची व त्यामुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि. लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.-आंबा पिकामध्ये फळांवर फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मि. लि. किंवा थायामेथॉक्झाम (२५ टक्के) ०.२ ग्रॅम प्रतिपाणी. फलधारणा झालेल्या आंबा झाडास उपलब्धतेनुसार प्रतिझाडास १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले “रक्षक फळमाशी सापळा” प्रतिहेक्टरी ४ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर लावावेत. नवीन आंबा लागवडीसाठी ः पुढील चारही दिवस वाऱ्याचा वेग जास्त असल्याने नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा. -नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. उन्हाळ्यात पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोन वेळा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोन वेळा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.