कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका, मूग, उडीद, सोयाबीन

कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी सल्ला (राहुरी विभाग)

हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. ता. २०, २१ जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. खरीप पिकाची पेरणी मॉन्सूनचे आगमन झाल्यावर सलग ३ ते ४ दिवस पुरेसा पाऊस झाल्यानंतर (६५ ते १०० मिमी) वाफसा आल्यानंतरच करावी. पानवेल ः फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी, उतरणीच्या अगोदर डायमेथोएट (३० ई.सी.) १ मिलि प्रति लिटर या प्रमाणे शेवरी, शेवगा आणि वेलीवर फवारणी करावी. गुलाब ः लाल कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी, अॅबॅमेक्टिन (१.८ टक्के प्रवाही) ०.४ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. ऊस हुमणीच्या नियंत्रणासाठी, पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभूळ व बोर या झाडांवरील भुंगेरे प्रकाश सापळ्यांचा वापर करून नष्ट करावेत. कंदिलाचा वापर करून सामुदायिकरीत्या रात्रीचे वेळी गोळा करावेत. रॉकेलमध्ये टाकून नष्ट करावेत. जमिनीनुसार पिकांची निवड भारी- कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन मध्यम- सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी हलकी- बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी मका मका पिकामध्ये उडीद/ मूग/ चवळी/ सोयाबीन/ भुईमूग/ तूर आंतरपीक म्हणून घ्यावेत. मूग आणि उडीद मॉन्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच पेरणी पूर्ण करावी. मूग / उडीद/ सोयाबीन जमिनीची पूर्व मशागत करावी. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच पेरणी करावी. पेरणीसाठी प्रमाणित बियाण्यांची खरेदी कृषी विद्यापीठे, महाबीज यांच्याकडून करावी. पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करावी. कापूस कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी, ९० से.मी. पेक्षा जास्त खोली असणारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पिकाची लागवड करण्यापूर्वी शेताची खोल नांगरट करून, कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी १० ते १२ टन शेणखत बागायती कपाशीसाठी व ८ टन शेणखत कोरडवाहू कपाशीसाठी शेतात मिसळावे. गेल्या वर्षी ज्याठिकाणी कापूस, टोमॅटो, भेंडीची लागवड केली असेल तर ती जमीन कापूस लागवडीसाठी टाळावी. बीटी/ संकरित बियाण्यासाठी ९० सेंमी तर देशी बियाण्यांसाठी ६० सेमी अंतरावर उथळ सऱ्या पाडाव्यात. उथळ सऱ्यामुळे पाण्याची बचत होते. सोयाबीन

  • सोयाबीन लागवडीसाठी मध्यम काळी पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
  • एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी बरोबर चांगले कुजलेले शेणखत १० टन प्रतिहेक्टरी वापरावे.
  • एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीबरोबर चांगले कुजलेले शेणखत १० टन प्रतिहेक्टरी वापरावे.
  • सोयाबीन पिकामध्ये तूर हे आंतरपीक (३:१) या प्रमाणात घ्यावे.
  • तूर पहिला पाऊस झाल्यावर वाफसा येताच कुळवाची पाळी देऊन घ्यावी. काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. ०२४२६- २४३२३९ (ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com