रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव कहाते यांनी बाजारपेठेची गरज ओळखून भाजीपाला लागवडीवर भर दिला. पीक उत्पादनवाढीसाठी लागवडीपासूनच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. टोमॅटो, मिरची, हळद, आले या पिकांच्या जोडीला सोयाबीन, कपाशीसारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादनातही वाढ साधली आहे.
वर्धा जिल्ह्यातील रोहणा गावामधील अविनाश कहाते यांचे शिक्षण कृषी डिप्लोमा. कहाते कुटुंबीयांची २१ एकर शेती. अविनाश यांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर स्वतःकडे शेतीची सूत्रे घेतली. सुरवातीला सोयाबीन, कपाशी या पारंपरिक पिकांवर भर दिला. त्यांना सोयाबीनचे एकरी ६ क्विंटल आणि कपाशीचे २५ क्विंटल उत्पादन मिळत होते. मात्र, वाढत्या खर्चामुळे उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी पीक बदलाचा निर्णय घेतला. बदलली पीक पद्धती पीक लागवड बदलण्यापूर्वी अविनाश कहाते यांनी परिसरातील शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कृषी विभागाच्या वतीने आयोजित मेळावे, अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदविला. मोर्शी (जि. अमरावती) येथील गजानन बारबुद्धे आणि येरला (जि. अमरावती) येथील राजेंद्र जकाते यांच्याकडून टोमॅटो, मिरची व्यवस्थापनाचे तंत्र समजावून घेतले. त्यानंतर स्वतःच्या शेतीतील पीकपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. २०१०-११ साली अविनाश कहाते यांनी टोमॅटो व मिरची लागवडीला सुरवात केली. पहिल्या वर्षी खरीप हंगामात एक एकरावर मिरची लागवड केली. काटेकोर पीक व्यवस्थापन ठेवल्याने एकरी २०० क्विंटल उत्पादन मिळाले. मिरचीला सरासरी १७ रुपये किलो दर मिळाला. खर्च वजा जाता चांगला नफा मिळाला. रब्बी हंगामात पावणेदोन एकरांवर टोमॅटो लागवड केली. या पिकाचेदेखील चांगले व्यवस्थापन ठेवल्याने एकरी ५३ टन उत्पादन मिळाले. टोमॅटोला प्रतिक्रेट सरासरी २४४ रुपयांचा दर मिळाला. पारंपरिक पिकांच्या तुलनेत मिरची, टोमॅटो लागवडीतून चांगला नफा मिळाल्याने या पिकांच्या लागवडीत त्यांनी सातत्य ठेवले आहे. या पिकांच्या जोडीला बाजारपेठेचा अंदाज घेत आले, हळद, कोबी, कारली, काकडी, वांगी, ढोबळी मिरची या पिकांच्या लागवडीचे त्यांचे नियोजन असते. गेल्या वर्षी गारपिटीमुळे शेडनेटचे नुकसान झाल्याने त्यांना यंदा ढोबळी मिरचीची लागवड करता आली नाही. सध्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत एक एकर कारले,अडीच एकर हळद, दीड एकर केळी, खरिपात साडेपाच एकर आणि रब्बीत सव्वादोन एकरांवर काकडी, एक एकर खरबूज, सव्वा एकर चवळी, सव्वा एकर टोमॅटो, साडेतीन एकर मिरची आणि एक एकर वांगी लागवडीचे नियोजन असते. काकडी लागवड
खरबूज लागवड
मिरची रोपनिर्मितीवर भर
उभारला शेतकरी गट
रोहणा गावातील युवा शेतकऱ्यांनी कृषिमित्र स्वयंसहायता बचत गटाची उभारणी केली आहे. गटाचे अध्यक्ष जितेंद्र जुवारे, तर अविनाश कहाते हे सचिव आहेत. सदस्यांमध्ये गजानन पाटेकर, प्रवीण बोडके, राकेश वडाळकर, वैभव जगताप,सुरज माळोदे,देवेंद्र गुल्हाने, राहुल वडाळकर, अशोक भगत, सुभाष मचाले, चंद्रकांत गुडवार, नीलेश गलाट, फुलचंद गलाट, ज्ञानेश्वर घोडे, शरद डायरे, दिनेश वडाळकर, मंगेश वडाळकर, विजय राऊत यांचा समावेश आहे. दरमहा प्रत्येक सदस्य २०० रुपये गटाच्या बॅंक खात्यामध्ये बचत करतो. आत्मा अंतर्गंत गटाची नोंदणी झाली आहे. गटातर्फे शिवार फेरी, गटचर्चेचे आयोजन केले जाते. माहितीच्या देवाणघेवाणीमुळे पीक उत्पादनात दुप्पट वाढ मिळविली आहे. २०११-१२ मध्ये समूहाव्दारे कृषी विभागाच्या सहकार्यातून थेट बांधावर खत पोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. अविनाश कहाते यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
असे आहे शेती नियोजन
- अविनाश कहाते, ८२७५२८९५८५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.