भंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. भंडारा हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. येथील शेतकरी पारंपरिक शेतीत अडकून न पडता विकासाच्या नव्या वाटा चोखाळू लागले आहेत. पवनी तालुक्यातील आसेगाव येथील शेतकरी याच ध्येयाने एकत्र आले. त्यांनी चौरास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. ‘चौरास’ नेमके काय आहे? पवनी, लाखांदूर तालुक्यांतील जमीन सपाट किंवा समांतर असल्याने त्यास चौरस असे संबोधले जाते. त्याचेच पुढे नामकरण चौरासमध्ये झाले. आसगावात शेतकरी बचत गटांच्या बळकटीकरण योजनेतून सुमारे २० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी पुढाकार घेतला. ऊस लागवड क्षेत्रही पाहण्यास मिळते. गोसी खुर्द प्रकल्प, विहिरीच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी आहेत. शेतकरी कंपनी- दृष्टिक्षेपात
उपक्रम भातरोवणी यंत्राचा वापर, भाडेतत्त्वावर देणे त्याचे महत्त्व- या भागातील शेतकरी उन्हाळी, रब्बी हंगामात भात लागवड करतात. त्यासाठी मजूर उपलब्धता, वाढते मजुरी दर यामुळे भात उत्पादकांसमोरील संकटे वाढली आहेत. भात रोवणी यंत्र हा त्यावर पर्याय ठरू पाहत आहे. यंत्र घेण्यापूर्वी तेलंगणा, अोरिसा दौरा. तेथील शेतकरी म्हणाले की तुम्ही एवढ्या लांबून हे यंत्र पाहायला आले हीच प्रगतीची पायरी आहे. या यंत्राच्या वापराने पैसेच नव्हेत तर श्रमदेखील खूप वाचतील. ठिकाण- आसेगाव, वर्ष- २०१४ कंपनीचे सदस्य (एकमेकांतील संवाद)
-यंत्र आपल्या समस्या सोडवेल यात शंका नाही. पण २५ लाखांचं भांडवल कुठून आणायचं? -भांडवल नसेल पण जिद्द तर आहे? पंधरा लाखांचं जुनं यंत्र घेऊन काम सुरू तर करू. -हे बाकी खरं! आता थांबायचं नाही. मग सहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये गुंतवले. त्यातून बारा लाख जमले म्हणता म्हणता. वरचे तीन लाख रुपये राहिले. पुन्हा वर्गणी काढून ते जमवले. अखेर यंत्र आले. ते वापरण्यास सुरवात. शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वर्ष- २०१५
हे यंत्र कसे काम करते?
पारंपरिक रोवणी
यांत्रिक रोवणी
कंपनीकडील यंत्राचा वापर
बीजप्रक्रिया उद्योग
सीड प्रोसेसिंग प्लॅंट- यंदा साडेनऊ लाख रुपये खर्चून उभारला. सात लाख रुपये शेअर्सच्या माध्यमातून जमा झाले. तर यंत्राद्वारे रोवणीच्या कामातून मिळालेल्या पैशांचाही या कामी विनियोग करण्यात आला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून सुमारे साडेनऊ लाख रुपयांचे अनुदान. कंपनीचे अध्यक्ष नौकरकर यांनी प्लॅंटसाठी २५ वर्षांसाठी सहा हजार रुपये प्रति महिना भाडेदराने आपली जागा दिली आहे. प्लॅंट उभारणीनंतर कंपनीला राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे सुमारे शंभर एकरांवर लाखोळी बिजोत्पादनाचे काम मिळाले आहे. सध्या कंपनीच्या सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे आहे. प्रस्तावित स्वउत्पादित बियाणे विक्रीसाठी स्वतःचे आउटलेट उभारणार. संकरीत धान वाणाचे सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे. त्या भागातून मोठ्या प्रमाणात बियाणे पुरविले जाते. त्या धर्तीवर आपल्या भागात असे उत्पादन का घेऊ नये, असा विचार करून शेतकरी कंपनीने काम सुरू केले.
संपर्क- अनिल नौकरकर - ९४२३३७०६३३
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.