औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात केली आहे.
शाश्वत ग्रामीण विकासाचे स्वप्न सत्त्यामध्ये उतरविण्यासाठी गेली पंचवीस वर्षे औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या डॉ. अनघा पाटील या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून, ग्रामविकासाच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्या सक्रीय आहेत. अभियंता असलेल्या श्रीमती वैशाली खाडिलकर संस्थेच्या उपाध्यक्ष असून, पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाचे नियोजन पाहतात. ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे हे संस्थेचे सचिव आहेत. दिलासा संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त महिला असून, संस्थेच्या बहुतांश कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांच्या ११० तालुक्यांतील ५,५५८ खेड्यांपर्यंत संस्था विविध योजनांच्या माध्यमातून पोहाेचली आहे.मूल्यमापन आणि संनियंत्रणाचे काम करणाऱ्या मोजक्याच संस्थांपैकी दिलासा ही संस्था आहे. संस्था राज्य पातळीवर प्रकल्प संयोजन, मूल्यमापन आणि संनियंत्रणाचे काम करते.
महिला बचत गटांचे संघटन
वाडी प्रकल्पातून समुद्धी
संस्था आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी वाडी प्रकल्प राबविते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बारा गावे तसेच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात दहा गावांच्यामध्ये फळपिकांच्या लागवडीचा वाडी प्रकल्प राबविला जातो. संस्थेने शेतकऱ्यांच्या सहभागातून सुमारे दोन हजार फळझाडांच्या वाड्यांची निर्मिती केली आहे. फळबागेमुळे शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले.
विविध संस्थांना प्रशिक्षण
वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रमासाठी संसाधन संस्था म्हणून दिलासा संस्था कार्यरत आहे. यामध्ये पाणलोट क्षेत्र अंमलबजावणीचे कार्य करणाऱ्या गावस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांचे बळकटीकरण करण्याचे काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून केले जाते. यशदा या राज्य पातळीवरील प्रशिक्षण संस्थेअंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी संस्थेतर्फे केली जाते.
विविध उपक्रमांना सहकार्य सामाजिक दायित्व निधीअंतर्गत संस्था वैविध्यपूर्ण उपक्रम राबविते. यामध्ये पाणी साठवण टाक्यांची बांधणी, सिमेंट नाला बांध, जलस्राेतांचे बळकटीकरण, जुन्या जलस्राेतांचे नूतनीकरण, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, दुष्काळपीडित गावांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे, पशुधन आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, शाळांसाठी पायाभूत सोयी-सुविधांची उपलब्धता, किशोरी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे.
पुरस्कारांनी गौरव
जल-मृद संधारणावर भर
संपर्क ः डॉ. अनघा पाटील, ९८२२०९७२६४, (अध्यक्षा, दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.