नगर जिल्ह्यातील पाचेगाव येथील तुवर पाटील कुटुंबाने १९९८ मध्ये नैसर्गिक शेतीला सुरवात केली. आज सुमारे १९ वर्षे त्यांनी या शेतीत सातत्य ठेवले. तर २००६ मध्ये नैसर्गिक ऊसशेतीमधून नैसर्गिक गूळनिर्मिती सुरू केली. वर्षाला गूळ व काकवीचा एकूण २० ते २५ टन विक्रीचा टप्पा त्यांनी आज पार केला आहे. वरद हा दर्जेदार गुळाचा ब्रॅंड त्यांनी लोकप्रिय केला आहे. नगर जिल्ह्यात नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर पाचेगाव हे सुमारे चार-पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. जवळून भंडारदरा धरणाचा कॅनाल असल्याने परिसर बागायती अाहे. कांदा, तसेच मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. अलीकडील वर्षांपासून येथील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत. नैसर्गिक शेतीला दिली चालना अलीकडील काळात शेतकरी काळाची व ग्राहकांची मागणी अोळखून त्यानुसार शेतमाल उत्पादन घेऊ लागले आहेत. पाचेगावातील प्रगतशील शेतकरी गंगारामजी तुवर हे त्यातीलच एक शेतकरी आहेत. त्यांना मोहन, निरंजन, श्रीरंग, किशोर अशी चार मुले आहेत. पैकी त्यातील मोठे मोहनराव ऊसशेती व गूळनिर्मितीची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. विशेष म्हणजे पूर्ण ऊसशेती नैसर्गिक पद्धतीनेच केली जाते. मोहनरावांची शेती दृष्टिक्षेपात
नैसर्गिक शेती
गूळनिर्मिती
विक्रीव्यवस्था
स्टॉल उभारणी
नैसर्गिक पद्धतीने ऊस उत्पादन नैसर्गिक शेतीला सुरवात केली त्या काळात सुरवातीला उसाचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळायचे. त्यानंतर हळूहळू वाढ होत गेली. आज ४० ते ५० टन उत्पादनापर्यंत तुवर पोचले आहेत. गूळप्रकियेसाठी साधारणपणे प्रतिटनाला वीस हजार रुपयांपर्यंत निर्मिती खर्च येतो. खर्च वजा जाता दरवर्षी काही लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. देशी गायीचे संगोपन नैसर्गिक शेती करायची, तर शेणखताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्या दृष्टीने प्रत्येकी दोन गीर आणि खिलार गायींचे संगोपन केले जाते. मोहनराव म्हणाले, की गोमूत्र व शेण यांच्यापासून रामबाण या नावाने आम्ही द्रावण तयार केले आहे. त्यामध्ये प्रतिदोनशे लिटर पाणी, दहा ते वीस लिटर गोमूत्र, दहा ते वीस किलो शेण, प्रत्येकी पाच लिटर ताक आणि गूळ हे सर्व एकत्रित केले जाते. ते दोन ते तीन दिवस ठेवून त्याचा वापर ऊस व भाजीपाला पिकांसाठी केला जातो. त्याचा अनुभव पिकांसाठी चांगला मिळाला आहे. सेंद्रिय कर्ब पूर्वी मातीपरीक्षण विविध ठिकाणांहून करून घेतले. मात्र प्रत्येक अहवालात बराच फरक आढळायचा. मग गोंधळून जायला व्हायचे. मात्र आता परीक्षण करून घेणेच बंद केले आहे. मात्र अनेक वर्षांपासून केवळ नैसर्गिक शेती करीत असल्याने सेंद्रिय कर्ब ०.७ ते त्यापुढे असावा, असे मोहनराव म्हणाले.
नैसर्गिक भाजीपाला उत्पादन नैसर्गिक पद्धतीच्या उसाबरोबर आता त्याच पद्धतीने काही भाजीपाला पिकांच्या उत्पादनास सुरवात केल्याचे मोहनराव म्हणाले. सध्या दहा गुंठ्यात दहा भाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यांची विक्री पुणे, मुंबई येथे केली जाते.
ठळक बाबी
संपर्क- मोहनराव तुवर- ९३२६९३२६१५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.