सांगली जिल्ह्यातील शेखरवाडी (ता. वाळवा) हे गाव कांदा रोपनिर्मितीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी या व्यवसायात गुंतले आहेत. आजोबांच्या काळापासून अनेकांनी ही परंपरा जोपासली आहे. दोन टप्प्यांत रोपनिर्मिती, आठवडी बाजारात थेट विक्री आदींच्या प्रयत्नांतून केवळ कांदा रोपविक्रीतूनही अर्थकारण कसे उंचावता येते हेच या गावच्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील शेखरवाडी हे तसं तीनशे कुटुंबाचं गाव. लोकसंख्या सुमारे चौदाशेपर्यंत आहे. इथली शेती जवळपास पावसावरच अवलंबून आहे. या भागात कोणतीही उपसा सिंचन योजना नाही. दुष्काळी भाग असं संबोधलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक वर्षांची परंपरा शेखरवाडी गावाचं खास वैशिष्ट्य काय सांगाल? असं कुणी विचारलं तर ते आहे इथल्या गावचे शेतकरी कांदारोप शेतीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अगदी सुरवातीच्या काळात गावातील मोजक्याच शेतकऱ्यांनी या शेतीला सुरवात केली. मग हळूहळू इतरांना त्याचे अर्थकारण उमगू लागले. त्यानंतर मग सारं गावच या शेतीकडे वळलं. आज एक नाही, दोन नाही तब्बल ३० ते ४० वर्षांपासून किंवा फारच मागे जायचे तर अनेकांच्या घरी आजोबांच्या काळापासून कांदा रोप विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे नव्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे. शेखरवाडी- रोपनिर्मिती दृष्टिक्षेपात
रोपनिर्मितीसाठी अनुकूल जमीन
हंगाम कालावधी
दोन हंगामही साधतात
दहा गुंठ्यांतील अर्थकारण
कोठे होते रोपविक्री?
असे असतात दर (सरासरी)
देशी वाण हवेत का कुणाला? कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बहुतांश गावांत घरगुती खाण्यासाठी कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचे देशी वाण हवे असेल तर शेखरवाडीला जा असे सांगितले जाते. साहजिकच या रोपांना अधिक मागणी राहते. प्रतिक्रिया आमचे सारे कुटुंब शेतीत राबते. माझ्याकडे कांदा रोपे काढण्याची जबाबदारी असते. त्यामुळे बाजाराच्या दिवशी सकाळी लवकर शेतात येऊन काढणी केली जाते. तरू विक्रीला गेल्यानंतर येताना माझा दादला चार पैसे घेऊन येतो. हे पैसे मिळाल्याचा आनंदच काही वेगळाच मिळतो. -सौ. सुमन शेखर पाणी कमी. यामुळे विविध पिके घेण्याला मर्यादा येतात. आमच्याकडे वडिलांच्या काळात कांदा तरूंची लागवड दरवर्षी श्रावणात २५ ते ३० गुंठ्यावर करतो. यात पाच किंवा दहा गुंठे याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बियाणे वाफ्यात टाकण्याची पद्धत वापरली जाते. -पांडुरंग शेखर गावात कांदानिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचे २१ गट तयार केले आहेत. त्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने रोपनिर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृषी विभागातर्फे त्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. सेंद्रिय असल्याचे रोपांना अधिक दर मिळेल अशी आशा आहे. -शीतल निंबाळकर कृषी सहायक, शेखरवाडी संपर्क- ९४२२२१८७९४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.