धुळे जिल्ह्यातील घोडसगाव (ता. शिरपूर) येथील पाटील बंधूंनी विविध फळपिके, त्यास पोल्ट्रीच्या करार शेतीची जोड व अलीकडेच शेडनेट तंत्राचा वापर, असे शेतीत वैविध्य ठेवले आहे. उच्चशिक्षित आणि एकत्रित कुटुंब पद्धती हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवत ठेवले तर शेती फायद्यात राहू शकते हेच त्यांच्याकडून शिकण्यास मिळते. घोडसगाव (ता. शिरपूर, जि. धुळे) हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव अनेर नदीकाठी वसले आहे. गावाची शेती काळी कसदार, मुबलक जलसाठे असलेली आहे. गावाकडे जातानाच केळीच्या बागा व उसाची मोठी शेती नजरेस पडते. पूर्वहंगामी कापसाचे पीक घेणारे चांगले शेतकरीही या भागात आहेत. तिघा पाटील बंधूंची शेती घोडसगावातील तिघा पाटील बंधूंची सुमारे ३० एकर शेती आहे. यातील मनमोहन कला शाखेतील, अंकुश विज्ञान शाखेतील पदवीधारक आहेत. ते पूर्णवेळ शेती पाहतात. कुणाल यांनी ‘आयटीआय’चे शिक्षण घेतले आहे. ते बोराडी (ता. शिरपूर) येथे संस्थेत तंत्रज्ञ आहेत. दररोज सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर नोकरीसाठी जावे लागत असले, तरी रोजची सकाळची शेतातील फेरी ते चुकवत नाहीत. सर्वजण मिळून शेतीसंबंधीचे सर्व निर्णय घेतात. वडिलांनी सोडली शेतीसाठी नोकरी पाटील बंधूंचे वडील प्रताप चिंतामण पाटील मुंबई येथील कंपनीमधील नोकरी सोडून १९८२ मध्ये शेती करण्यासाठीच घरी परतले. तीन भावांची संयुक्त ८० एकर शेती होती. ती प्रताप कसायचे. जुन्या विहिरी सिंचनासाठी होत्या. केळी व उसाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन ते घ्यायचे. प्रताप यांचे बंधू गुलाब मुंबईत प्राध्यापक, बंधू मुरलीधर खत कंपनीत तर तिसरे बंधू रामरतन अन्न व नागरी पुरवठा विभागात कार्यरत होते. अर्थातच त्यांचे उच्चशिक्षित कुटुंब आहे. शेतीशी त्यांनी आपली नाळ मात्र कायम जपली आहे. विभागणीनंतर प्रताप यांच्या वाट्याला ३० एकर शेती आली. त्यासाठी दोन कूपनलिका आहेत. सुधारित शेतीचा अवलंब पूर्वी पाटील बंधूंची शेती पारंपरिक होती. पट पद्धतीने सिंचन, केळीसाठी कंदांची लागवड होती. नगदी पिकांचा पैसा वर्षभरानंतर मिळायचा. मग पुढचे नियोजन व्हायचे. अशात नवे तंत्रज्ञान, संकल्पना राबवायला उशीर व्हायचा. सुधारित तंत्राचा अवलंब करताना या बंधूंना नाशिक येथील आपल्या अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानुसार बदल करण्यास व नवे तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली.
शेडनेट तंत्राचा वापर
फळपिकांची लागवड केळी
ऊस १० एकर क्षेत्र आहे. त्याचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते. पपई पपईची मल्चिंग पद्धतीने दरवर्षी फेब्रुवारीत लागवड असते. पपईचे रोप चांगले ‘सेट’ झाल्यावर फेब्रुवारीत त्यात कलिंगडाचे आंतरपीक घेतले जाते. त्यातून मुख्य पिकाचा सुमारे ५० टक्के खर्च कमी होतो. पोल्ट्री पाच वर्षांपूर्वी नामथे शिवारात शेतातच एका बाजूला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. दीड एकरांत शेड व मजुरांची निवासस्थाने आहेत. नियमित व हमीचा पैसा मिळावा हा विचार या व्यवसायामागे होता. सुमारे पाच हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. शेड उभारणीसाठी दहा लाख रुपये खर्च आला. हैदराबाद येथील एका कंपनीसोबत ब्रॉयलर पक्ष्यांच्या संगोपनाचा करार केला आहे. पक्षी, खाद्य व उपचारसेवा कंपनी पुरवते. सुमारे ४० दिवस संगोपन करून पक्षी कंपनीला दिला जातो. एक कर्मचारी पोल्ट्रीसाठी नियुक्त केला असून, तो वर्षभर संगोपन व सफाईची जबाबदारी पार पाडतो. पोल्ट्रीमध्ये दर दीड महिन्यानी उत्पन्न येते. नफ्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक तर त्यानंतर ते पावसाळ्यात मिळते. उन्हाळ्यात तुलनेने नफा कमी मिळतो. पाच रुपये प्रतिकिलो या दराने पक्ष्यांची विक्री केली जाते. व्यवस्थापनातील वैशिष्ट्ये
संपर्क- अंकुश पाटील - ९४२१६१६९८८.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.