बीड जिल्ह्यातील गोमळवाडा येथील भागवत वामन गर्जे या तरुणाने नोकरी सांभाळत अभ्यासपूर्वक शेती करीत भाजीपालाकेंद्रित शेती यशस्वी केली आहे. या भागात सातत्याने पाणीटंचाई असते. मात्र शेततळ्याचा आधार तसेच चांगल्या व्यवस्थापनाच्या आधारे ढोबळी मिरची, काकडी, खरबूज, कांदा, कापूस आदी पिकांची विविधता त्यांनी ठेवली. सुधारित तंत्राचा वापर हे देखील त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणता येते.
नगर जिल्ह्याच्या पूर्वेला आणि सीमेवर असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. सिंदफणा नदी आणि धरण परिसरातील गावांचा अपवाद वगळला तर तालुक्यात कायम पाणीटंचाई असते. त्यातही सिंदफणा धरण मागील दहा वर्षांत गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच भरले. धरणाच्या जवळच गोमळवाडा गावशिवार आहे. येथील शेतकरी कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस ही पारंपरिक पिके घेतात.
गर्जेंची जिद्दीची शेती गोमळवाडा गावात भागवत व संतोष हे दोघे गर्जे बंधू. संतोष सोलापूर येथे ‘थर्मल पॉवर’ उद्योगात अभियंता आहेत. भागवत पदवीधर असून गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लिपिक आहेत. शिवारात तीन ठिकाणी त्यांची २१ एकर शेती आहे. शेतीचा भार भागवत स्वतः सांभाळतात.
पीकपद्धती
दहा गुंठ्याचे शेडनेट
एका वर्षात तीन पिके मागील वर्षी खुल्या ४५ गुंठे क्षेत्रावर सलग तीन पिके घेतली. यात जानेवारीत खरबूज लावले. त्याचे तीन महिन्याच्या काळात २६ टन उत्पादन मिळाले. त्यास २४ रुपये प्रति किलो दर मिळाला. मेमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली. त्याचे ३० टन उत्पादन व २५ ते ३० रूपये दर मिळाला. त्यानंतर आॅक्टोबर मध्ये खरबूज घेतले. या वेळी मात्र त्याचे उत्पादन थोडे घटून १८ टनांवर आले. आता पुन्हा नव्याने ९० गुंठ्यावर ढोबळी मिरचीची लागवड केली असून तोडणी सुरू आहे. सुमारे २६ टन मालाची विक्री झाली आहे. सध्या २२ रुपये दर मिळत आहे.
नगरचे मुख्य मार्केट गोमळवाडापासून बीडचे अंतर ४५ ते ५० किलोमीटर तर नगरचे अंतर ९० किलोमीटर आहे. दोन्ही ठिकाणच्या दरांचा अंदाज घेऊन मालाची विक्री होते. मुख्य मार्केट नगरचेच राहते. सध्या दररोज एक हजार किलो ढोबळीची दहा किलो पॅकिंगमधून नगरला विक्री सुरू आहे.
शेततळ्याचा आधार सिंदफणा मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गोमळवाडा परिसराला मागील आठ-दहा वर्षे दुष्काळाचा टका सोसावा लागला. त्यामुळे भागवत यांनी २०१५-१६ मध्ये शेततळे घेतले. त्यात एक कोटी लिटर पाणी साठवण होते. दुष्काळात त्याचाच मोठा आधार असल्याने चांगले उत्पादन घेता आले. पावसाळ्यात विहीर व विंधनविहीरीच्या पाण्यावर तळे भरून घेतले जाते.
ॲग्रोवनमधील यशकथा ठरल्या उपयुक्त भागवत सांगतात, की नोकरीचा वेळ सोडून सकाळी व संध्याकाळी शेतीत अधिक जीव रमतो. पाच वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग करीत आहे. ॲग्रोवनचे इंटरनेटवर दररोज वाचन करतो. त्यातील यशकथा अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन अधिक माहितीही घेतली आहे. राज्यभरातील कृषी प्रदर्शनांनाही ते भेटी देतात. दुष्काळी भागातही उत्तम नियोजनातून यशस्वी शेती करता येते असे ते सांगतात.
भागवत यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
संपर्क : भागवत गर्जे, ९०११३४३५२५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.