सांगली मुख्य बाजार समितीने सांगली-कोल्हापूर मार्गावर विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार उभारून शेतकऱ्यांसाठी नवी विक्री व्यवस्था उपलब्ध करून दिली. येथे सर्व फळांचे सौदे होतातच; मात्र जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात सीताफळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ हक्काची ठरली आहे. सीताफळासाठी या बाजारपेठेने आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यांचे सौदे पूर्वी व्हायचे. त्या वेळी फळे, भाजीपाला यांचा बाजार सांगली शहरात पेठभाग, छत्रपती शिवाजी मंडई तसेच रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी भरायचा. या ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या. जागाही अपुरी पडायची. त्यामुळे या शेतमालातील बाजारपेठ नव्या ठिकाणी सुरू करणे आवश्यक होते. त्यानुसार सांगली बाजार समितीने १९८८ च्या दरम्यान सांगली- कोल्हापूर मार्गावर सुमारे ११ एकर ३८ गुंठे जागा विकत घेतली. या ठिकाणी पुढे-मागे मार्केटची उभारणी करता येईल, असा विचार होता; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही बाजारपेठ उभी करण्यासाठी वेळ लागला. अशातच तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला. शेतकऱ्यांसाठी एका सक्षम मार्केटची आवश्यकता आहे हे लक्षात आले. मग बाजार समितीचे पदाधिकारी आणि व्यापारी महाराष्ट्राचे कै. मदन पाटील यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेले. कै. पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू होते. बाजारपेठ उभारणीसाठी प्रस्ताव पणन मंडळाकडे सादर झाला. त्याचा पाठपुरावाही करण्यात आला. प्रस्ताव मंजूर होण्यास यश मिळाले. बाजारपेठेची उभारणी सन १९९५ च्या दरम्यान मार्केट साकारू लागले. केवळ एकरा महिन्यांत त्याची उभारणी झालीदेखील. सन १९९६ पासून सांगली-कोल्हापूर मार्गावर विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार सुरू झाले. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च आला. हळूहळू मार्केटची ओळख सर्वत्र होऊ लागली. अलीकडील काळात सीताफळ राज्यातील शेतकऱ्यांच्या अधिक चर्चेतील फळ आहे. याच सीताफळासाठी या मार्केटने वेगळी अोळख तयार केली आहे. अशी आहे सीताफळाची बाजारपेठ
लहान मोठे व्यापारी येतात खरेदीसाठी विक्री करण्यासाठी बहुतांश शेतकरी प्रत्यक्ष येतात. ते थेट बाजार समितीतील अडत्यांकडे जातात. त्यानंतर अडत्यांकडून सीताफळाची प्रतवारी होते. शेतकरीदेखील आपल्या मालाची प्रतवारी करून माल घेऊन येतात. सीताफळाची खरेदी करण्यासाठी परिसरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांची सकाळच्या वेळी लगबग दिसून येते. सीताफळाला अधिक मागणी कशामुळे?
सौद्याची वैशिष्ट्ये
बाजार समितीतील सुविधा
बाजार समितीचा विस्तार
दुय्यम बाजार समितीची उलाढाल- सुमारे १३४ कोटी (२०१६-१७) सीताफळाचे सौदे व दर (प्रतिडझन)
अलीकडील वर्षातील आवक (डझनामध्ये) तसेच त्यापुढे दर रु. प्रतिडझन
प्रतिक्रिया अत्यंत कमी देखभालीत सीताफळ पीक चांगले येते. शेताच्या बांधावर त्याची लागवड केली आहे. अन्य बाजारपेठेपेक्षा येथील मार्केटमध्ये दोन पैसे अधिक मिळतात. - प्रकाश नलवडे, मणेराजूरी, ता. तासगाव, जि. सांगली गेल्या दहा वर्षांपासून सीताफळ घेत आहे. हातविक्री करायची तर अनेक अडचणी येतात. त्यामुळे पाच वर्षांपासून सांगली येथील बाजारपेठेची निवड केली आहे. या ठिकाणी सीताफळे डझनांवर खरेदी केली जात असली, तरी दर नेहमीच चांगले राहतात. चालू हंगामात सातशे रुपये प्रतिडझन असा दर मिळाला. - सर्जेराव पाटील, आरग, ता. मिरज, जि. सांगली जिल्ह्यात सीताफळाची लागवड वाढू लागली आहे. त्यामुळे मागणीदेखील वाढली आहे. शेतकऱ्यांचा विश्वास बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी संपादन केला आहे. त्यामुळे सौद्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार कांदा, बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे. आता सीताफळासाठी हे मार्केट दिवसेंदिवस प्रसिद्ध होऊ लागले आहे. - शिवाजी सगरे, अडते, फळ मार्केट सांगली फळे व भाजीपाल्यांसाठी बाजारपेठ सुरू होऊन सुमारे १७ वर्षे झाली. येथे फळांचे सर्वच सौदे खुल्या पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा वाढण्यास मदत होत आहे. व्ही. जे. राजेशिर्के, सहाय्यक सचिव, विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार, सांगली. संपर्क- ९६६५६२९५९५ कार्यालय-०२३३- २५३१६२३
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.