रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून ग्राहकांना पुरवठा, मातीची सुपीकता टिकवून तिची उत्पादकता वाढवणे ही ध्येये घेऊन एकनाथ कराळे (शेल पिंपळगाव, जि. पुणे) अठरा वर्षांपासून साडेपाच एकरांवर सेंद्रिय प्रमाणित शेती करीत आहेत. स्वतःची विक्री व्यवस्था उभी करीत शेतकऱ्याला उत्पादन खर्चाशी निगडित किमान आधारभूत किंमत मिळावी या दृष्टीने त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, काटेकोर असे शेती व्यवस्थापन केले आहे.
वाढलेला उत्पादन खर्च, त्या तुलनेत शेतमालाला मिळत नसलेले दर, रासायनिक निविष्ठांचा अतिरेकी वापर, मातीची घटत चाललेली सुपीकता, त्यामुळे कमी झालेली पीक उत्पादकता या शेतीतील आजच्या मुख्य समस्या आहेत. पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील शेल पिंपळगाव येथील एकनाथ कराळे या अभ्यासू, प्रयोगशील वृत्तीच्या शेतकऱ्याने याच समस्यांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. त्याआधारे स्वतःचे शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले. त्यातून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. हसतमुख, प्रसन्न, ,सतत प्रयोगशील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र आळंदीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर शेल पिंपळगाव आहे. येथे कराळे यांची साडेपाच एकर शेती आहे. वयाची साठी पार केलेला हा ‘तरुण’ म्हणजे कायम हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि उत्साहाचा झराच आहे. प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे आणि शेती ही त्याची प्रयोगशाळा आहे हे तत्त्व अंगी बाणवलेले कराळे काही ना काही प्रयोग करण्यामध्येच व्यस्त असतात. मनाने आणि संवाद साधण्यातही दिलदार, मोकळ्या मनाची ही व्यक्ती बोलता बोलता कधी आपलं मन जिंकून घेते ते कळत नाही. अठरा वर्षांचं अनुभवसिद्ध मॉडेल शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं किमान नफा तत्त्वावरील सेंद्रिय शेती पद्धतीचं मॉडेल हे कराळे यांचं वेगळेपण म्हणावं लागेल. ते बागायती शेती पद्धतीसाठी आहे. सन २००० पासून म्हणजे अठरा वर्षांपासून आपल्या शेतात त्याचा अंगीकार करीत ते अनुभवसिद्ध यशस्वी मॉडेल असल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. केवळ पीक उत्पादनातच नव्हे तर शेतीचं अर्थकारण या विषयातही प्रावीण्य मिळवून स्वतःची सक्षम विक्री व्यवस्था त्यांनी भक्कमपणे उभी केली आहे. कराळे यांचं सेंद्रिय शेतीचं मॉडेल
अ पीक पद्धती हंगाम- खरीप पहिला प्लॉट - वेलवर्गीय भाजीपाला अधिक फळभाज्या
रब्बी
अन्य क्षेत्रात (थोडे क्षेत्र)
प्रत्येक झाड किती उत्पादन देते यावर हिशेब कराळे पीक उत्पादन एकरी किती क्विंटल किंवा टन अशा प्रमाणात मोजत नाहीत, तर प्रत्येक गुंठ्यात किती झाडे, त्यातील उत्पादनक्षम झाडांची संख्या व प्रत्येक झाड किती किलो उत्पादन देते यावर त्यांचे सारे गणित असते. त्याचे उदाहरण पुढीलप्रमाणे दोडका व काकडी - पाच गुंठे क्षेत्रातील उत्पादन ७५० किलो किंवा प्रतिगुंठा १५० किलो.
कारले - तीन बाय तीन फूट अंतरावर लागवड. प्रतिगुंठ्यात १०० उत्पादनक्षम झाडे गृहीत धरल्यास प्रतिझाड दोन किलो म्हणजे प्रति गुंठ्यात 200 किलो उत्पादन. भेंडी - प्रत्येकी तीन चौरस फुटांवर भेंडीचे एक झाड. प्रतिझाड सुमारे ५०० ग्रॅमपर्यंत उत्पादन याचा फायदा काय? प्रत्येक झाडाचे उत्पादन, त्यासाठी येणारा खर्च व त्यावरून नफा किती हवा हे लक्षात येते. बाजारात दररोज किती मालाची गरज असते, त्यादृष्टीने किती पिकवला पाहिजे, याचेही नियोजन काटेकोर करता येते. क) समृद्ध फळबाग
कराळे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये माती
खते व पीक संरक्षण
सेंद्रिय शेतीतील खर्च कराळे सांगतात की सेंद्रिय शेतीत मजुरीवरील खर्च जास्त असतो. मात्र रासायनिक खते, कीडनाशके आदींवरील खर्चात बचत होते. या पद्धतीत तणनाशक वापरता येत नाही. त्यामुळे भांगलणीसाठी सात ते आठ महिला मजूर कायम तैनात ठेवाव्या लागतात. त्यांची मजुरी जास्त होते. तरीही सेंद्रिय शेतीत एकूण खर्चात साधारण ४० टक्के बचत होते असा १८ वर्षांतील अनुभव आहे. उच्चशिक्षित कुटुंब, सामाजिक जाणीव पूर्वी सुमारे १२ वर्षे कराळे ‘ट्रान्सपोर्ट’ व्यवसायात कार्यरत होते. आता पूर्णवेळ त्यांनी शेतीलाच वाहून घेतले आहे. त्यांना पत्नी सौ. मंदाकिनी यांची समर्थ साथ शेतीत लाभते. त्यांचा मुलगा राहुल भारतीय प्रशासकीय सेवेत सध्या आफ्रिकेत ‘डेप्युटेशन’वर कार्यरत असून, सून डॉ. योगिता एमबीबीएस आहे. शेतीव्यतिरिक्त सामाजिक सेवा म्हणून समर्थ शांतिदूत परिवार प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनदेखील कराळे जबाबदारी सांभाळतात. नजीकच्या काळात पुणे येथे आंतरराष्ट्रीय गो परिषदेचे आयोजनही संस्थेने केल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतःची विक्री व्यवस्था व ब्रॅंड
आधारभूत किमतीचा मुद्दा शेतमालाच्या दरांमध्ये सतत चढउतार होतात. मात्र, या बाबींमध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मात्र कुठेही कमी होत नाही. त्यामुळे किमान आधारभूत किंमत त्याला मिळावी. तसेच एक एकर बारमाही शेती असेल तर वर्षाला किमान एक लाख ८० हजार रुपये निव्वळ नफा त्याला मिळावा. यादृष्टीने शेती पद्धतीचे माॅडेल विकसित केल्याचे कराळे सांगतात.
दर उत्पादन खर्चाच्या निगडित दर ठेवले आहेत. सेंद्रिय माल महाग असतो का, असा प्रश्न मला अनेक ग्राहक विचारतात. मालाचा दर्जा, रंग, स्वाद, टिकवणक्षमता, आरोग्यदायी अशा विविध निकषांवर आमचा कीचन गार्डन ब्रॅंडचा भाजीपाला रासायनिक शेतीतील मालापेक्षा निश्चित सरस असतो. तो वापरायला सुरवात केली तर त्याचे दर रास्तच असल्याची ग्राहकाला खात्री पटते, असे कराळे सांगतात. रासायनिक शेतमाल दरांत सतत चढउतार असतात. आमचे दर मात्र कायम स्थिर असतात. सर्वसाधारण भाजीपाल्याचा किरकोळ विक्रीचा दर किमान ४० रुपये तर कमाल दर ८० रुपये राहतो, असेही ते सांगतात.
मालाची गुणवत्ता कराळे म्हणाले की प्रयोगशाळेत माझ्या सेंद्रिय टोमॅटोचे पृथ्थकरण करून घेतले. त्यात रासायनिक शेतीतील टोमॅटोपेक्षा लायकोपीनचे प्रमाण अनेक पटीने आढळले. आणि त्याची टिकवणक्षमताही कितीतरी अधिक दिवसांची होती. ज्यावेळी टोमॅटोचे दर प्रचंड घसरले होते त्या वेळी मी माझ्या ग्राहकांना ही बाब अहवाल पुराव्यासहित समजावून सांगितली. त्या वेळी मी निश्चित केलेल्या दरांत कोणतीही घासाघीस न करता ग्राहकांनी तो खरेदी केला. संपर्कः एकनाथ कराळे- ७०२०५८५९८३, ९८५०५०१२७७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.