शेंबी, शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन

ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत.
शेंबी, शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन
शेंबी, शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन

जून अखेर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही भागांत पेरण्यासुद्धा पूर्ण झाल्या. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघडीप झाली. ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत. असा गोगलगायींचा प्रादुर्भाव नाशिक, पुणे, नगर, लातूर जिल्ह्यातील भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांमध्ये दिसून येत आहे. 

नुकसानीचा प्रकार ः

  •     बाल्यावस्था व प्रौढावस्था पिकास हानिकारक आहे. गोगलगायी भाजीपाला व इतर पिकांच्या रोपांची खोड कुरडतात, रोपे कोलमडतात.
  •     वाढीच्या अवस्थेतील पिकांची पाने कुरतडून खातात. गोगलगायी बांधाच्या कडेने नुकसान सुरू करतात. 
  •     गोगलगायी मुख्यतः दिवसा लपून बसतात. रात्री पिकाला नुकसान पोचवितात. प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत राहतात. 
  •     गोगलगायीला दोन्ही लिंग असल्याने प्रत्येक गोगलगाय प्रजननक्षम असते. त्यामुळे प्रादुर्भाव वेगाने वाढण्यास मदत होते.
  •     अन्य वेळी कुजलेला पालापाचोळा, इतर टाकाऊ पदार्थांवर उपजिविका करतात.
  • शेंबी, शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन ः

  •     शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.
  •     प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात (विशेषतः द्राक्षबागेमध्ये खोडाशेजारी) आच्छादन करण्याचे टाळावे.
  •     सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.
  •     शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग  ठेवावेत.गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावी.
  •     शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.
  •     कीडनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा/ कोंडा अधिक २५ ग्रॅम यीस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गूळ अधिक १० लिटर पाणी) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डिहाईड (२.५ टक्के) ५०  ग्रॅम मिसळावे.  हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.
  • टीप ः विषारी आमिष बनविण्यापूर्वी कीटकनाशक हाताळताना चेहरा, डोळे, किंवा शरीराचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक पोशाख, हातमोजे, चष्मा आदींचा वापर करावा.
  •  : डॉ. संजय पाटील,७५८८०३६४४८ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com