रत्नागिरी, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : ग्राहकांची विशेष पसंती असलेल्या रत्नागिरी हापूस आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात आणखी पंधरा दिवस या आंब्यांची चांगली आवक सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हवामान बदलामुळे रत्नागिरी व कर्नाटक हापूसच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाल्याने शेतकऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

रविवारी (ता. २६) मार्केट यार्डाच्या फळबाजारात रत्नागिरी हापूसची आवक तीन ते साडेतीन हजार पेटी इतकी झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी ही आवक दुप्पट होत होती. आणखी आठ दिवसांनंतर आवक आणखी कमी होईल, असा अंदाज रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी वर्तविला. फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकातील आंब्याची आवक सुरू झाली. सद्यःस्थितीत कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, एक जूनपासून आवक कमी होत राहील. रविवारी कर्नाटक हापूसची १४ ते १६ हजार पेटी आणि अडीच ते तीन हजार क्रेट इतकी आवक झाली, असे रोहन उरसळ यांनी सांगितले.  रविवारी रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याला (४ ते ८ डझन पेटी) ६०० ते १६०० रुपये, तयार आंब्याला (४ ते ८ डझन पेटी) १२०० ते २००० रुपयांचा दर मिळाला. कर्नाटकातून आवक होत असलेल्या हापूस कच्च्या आंब्याला (४ ते ५ डझन पेटी) ५०० ते ८०० रुपये, कर्नाटक हापूस तयार ६०० ते १००० रुपयांचा दर मिळल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com