नगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्या

गेल्या वर्षी कापूस, हरभरा, कांद्याला कमी भाव मिळाला. त्याचे दुःख असतानाच या वर्षी पाऊस लांबला. अजून शेतीच्या पूर्वमशागतीची कामे अपूर्ण आहेत. पिण्याच्या पाण्याची अडचण वाढत आहे. कापसाला उशीर होतोय. आम्ही पावसाची वाट पाहत आहोत. - पद्‌माकर कोरडे, शेतकरी.
पावसाची प्रतिक्षा
पावसाची प्रतिक्षा

नगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पश्‍चिमेकडून सुटलेल्या जोरदार वाऱ्याने जिवाला घोर लावला असून पावसाचा मोठा खंड (बखाडी) पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फळबाग, ऊस व चारापिके वाचवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जूनमध्ये सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्यास शेतकरी खरिपाची तयारी सुरू करतात. मात्र, जूनमधील १६ दिवस उलटूनही पाऊस झालेला नाही. मृगाचा पाऊस झाल्यानंतर सुरवातीलाच कापसाची लागवड झाली, तर पुढील पाण्याचा स्रोत गृहीत धरून पुढील पिकांचेही नियोजन केले जाते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला असला, तरी अजूनही पाऊस नाही.

उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्याच्या तोंडावर बहुतांश भागात टंचाई जाणवते. मात्र मृगाच्या पावसामुळे दिलासा मिळत असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी होत आहे. कापूस लागवड, पेरणी तर रखडली आहेच; पण सध्या असलेल्या फळबागा, चारापिके, ऊस व भाजीपाला पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

सध्या पश्‍चिमेकडून जोरदार वारे वाहत आहेत. दिवसभर ढगांची गर्दी होत असली, तरी रात्री चांदणं पडत आहे. बहुतांश वेळा आषाढ, श्रावणात अशी स्थिती असते. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या मोठा खंड (बखाडी) पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com