दहावीच्या परीक्षार्थींसाठी बळीराजाने दु:ख गिळले...

दहावीच्या परीक्षार्थींसाठी बळीराजाने दु:ख गिळले...
दहावीच्या परीक्षार्थींसाठी बळीराजाने दु:ख गिळले...

मुंबई : दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरिता आपल्या रक्ताळलेल्या, सुजलेल्या पायांची पर्वा न करता रात्रीचा चार तासांचा सलग प्रवास करुन पहाटे आझाद मैदान गाठून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आपले औदार्य दाखविले, अन् अनेक मुंबईकरांच्या डोळ्यात पाणी तरळले. सामाजिक भान, सहनशिलता आणि संवेदनशिलतेच्या या बळीराजाच्या अंगभूत कृती बद्दल मुंबईकरांपासून सरकार, विरोधी पक्ष, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी मनापासून धन्यता व्यक्त केली.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च रविवारी (ता.११) येथील सोमय्या मैदानातून मध्यरात्री एकच्या सुमारास आझाद मैदानाकडे मार्गस्थ झाला. सोमवारी (ता.१२) पहाटे पाचच्या सुमारास आंदोलकांनी आझाद मैदान गाठले. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मोर्चामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय किसान सभेने घेतला होता. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली होता. मात्र, बहुतांश मोर्चेकरी पायीच आझाद मैदानात पोचले. अखेर रात्री तीन ते चार तास पायपीट करत या शेतकरी आंदोलकांनी आझाद मैदान गाठले. तत्पुर्वी काही काळ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी या मोर्चात मध्यरात्री सहभाग घेऊन शेतकऱ्यांचे धन्यवाद मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com