सोलापूर जिल्ह्यातून फळबाग योजनेसाठी १४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
सोलापूर जिल्ह्यातून फळबाग योजनेसाठी १४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

सोलापूर जिल्ह्यातून फळबाग योजनेसाठी १४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

सोलापूर : यंदाच्या वर्षापासून राज्य शासनाने (कै.) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून १४ हजार ७८ शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होऊन ते मंजूर होणार आहेत.

या योजनेतील सर्व सहभागी शेतकऱ्यांना मंजुरी मिळाल्यास जवळपास १२ हजार हेक्‍टर क्षेत्र नव्याने फळबागेखाली येणार आहे. सध्या राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीच्या अनुदानासाठी पात्र ठरतात. त्यामुळे या योजनेचा लाभ मर्यादित शेतकऱ्यांना होत होता, पण या योजनेमुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे.

या योजनेत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिक्कू, संत्रा, मोसंबी, अंजीर, नारळ आदींचा समावेश आहे. सोलापुरात अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक डाळिंबाचे शेतकरी आहेत. आता पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर सलग तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने हे अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com