जलसंधारणासाठी १५ कोटींची मागणी

जलसंधारणासाठी १५ कोटींची मागणी
जलसंधारणासाठी १५ कोटींची मागणी

नाशिक : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना अधिक व्यापक स्तरावर राबविण्यासह ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम येत्या काळात युद्धपातळीवर हाती घेण्याचा मनोदय आढावा बैठकीदरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला. या कामांसाठी १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असून हा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, या योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे फायदे भविष्यात शेतकरीवर्गालाच मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होते आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जात  आहे.

गतवर्षी ३५ लाख क्युबिक मीटर काळ काढण्यात आला होता. यंदा दुप्पट अर्थात ७० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि शेतकऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ते या साठी यंत्रसामुग्री पुरविणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com