शेतकऱ्यांच्या १८० संघटनांची दिल्लीत धडक

शेतकऱ्यांच्या १८० संघटनांची दिल्लीत धडक
शेतकऱ्यांच्या १८० संघटनांची दिल्लीत धडक

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासह शेतमालास योग्य हमीभाव अाणि संपूर्ण कजमाफीच्या मागणीसाठी आज (ता. २०) देशभरातील १८० शेतकरी संघटना दहा लाख शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीत धडक मारली आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे अांदोलन करण्यात येत अाहे. दिल्लीत दोन दिवस हे अांदोलन चालणार अाहे.

या अांदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुमारे दहा हजार शेतकरी सहभागी होणार अाहेत. या संपूर्ण आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यातील इतर संघटनादेखील या मोर्चात सहभागी होत आहेत. या अांदोलनाची तीन महिन्यांपासून तयारी सुरू आहे.   

राज्यातून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राज्यभर दौरा करून दिल्लीच्या मोर्चाची तयारी केली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, ही संघटनेची प्रमुख मागणी अाहे. या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याचा या मोर्चाचा उद्देश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com