नाशिक जिल्ह्यात दोनशे शेतकऱ्यांना विषबाधा

नाशिक जिल्ह्यात दोनशे शेतकऱ्यांना विषबाधा

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु॥ येथे एका कंपनीच्या वतीने बुधवारी (ता.८) आयोजित कृषी चर्चासत्राप्रसंगी सुमारे १५० ते २०० शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, अत्यवस्थ व्यक्‍तींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  विषबाधा झालेल्या अतुल पांडुरंग केदार (४१) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उमराळे बु॥ येथे नाशिक-पेठ मार्गावरील रमेश धात्रक यांच्या शेतावर एका कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चर्चासत्र कार्यक्रम आटोपल्यानंतर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. जेवण केल्यानंतर शेतकऱ्यांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या. ज्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमस्थळी जेवण केले, त्यांना काही वेळातच त्रास जाणवू लागल्यानंतर काहींनी गावातीलच खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. परंतु रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने परिस्थिती गंभीर झाली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com