हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी मिळेनात

हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी मिळेनात
हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी मिळेनात

सोलापूर  : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांत शेतकऱ्यांनी चार हजार ४०० रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील गाळप हंगामात साखर कारखान्यांना ऊस घातला. परंतु, काही कारखान्यांकडून आणखी शेतकऱ्यांना एफआरपीदेखील मिळालेली नाही. त्यानंतर हरभरा हमीभावाने विक्री करण्याकरिता नोंदणी केली, परंतु मुदत संपल्याने तो हमीभावापेक्षा कमी किमतीने विकावा लागत आहे.

तुरीचेही पैसे काहींना मिळालेले नाहीत. अशी परिस्थिती असतानाच हरभऱ्याची तरी रक्‍कम लवकर मिळेल आणि खरीप हंगामाची मशागत करून बियाणे व खते घेऊ, असे नियोजन शेतकऱ्यांनी केले. मात्र, मागील साडेतीन महिन्यांपासून हरभऱ्याचा एक पैसाही मिळालेला नाही. सरकारकडूनच पैसे मिळत नाहीत तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर हमीभावाचे पैसे तत्काळ द्या नाहीतर आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे. पाठपुरावा सुरू

``हरभऱ्यासाठी पहिल्या टप्प्यात नाफेडकडून राज्यासाठी ११९ कोटी रुपये मिळाले. परंतु, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला एक रुपयाही मिळाला नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून रक्‍कम कधी मिळेल, हे निश्‍चित सांगता येणार नाही.``

- दिलीप पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com