पाच दिवसांत साडेतीन हजार क्विंटल तूर खरेदी

पाच दिवसांत साडेतीन हजार क्विंटल तूर खरेदी
पाच दिवसांत साडेतीन हजार क्विंटल तूर खरेदी

मुंबई : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरवात झाली आहे. सोमवारअखेरपर्यंत १६० तूर केंद्रांवर ३३९ शेतकऱ्यांची ३,७५५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तूर खरेदी केंद्रावर सुमारे १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तूर खरेदी तीन महिने चालणार असून, सोमवारचा पाचवा दिवस होता. तूर खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून, तूर खरेदीसाठी उपलब्ध खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले. तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी एनईएलएम (NELM) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नये, यासाठी मंडळ स्तरावर अथवा मोठ्या गावामध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांनी आधार कार्डची छायाकिंत प्रत, सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेक), सातबारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरेदीचे चुकारे ऑनलाइन त्यांच्या बँक खात्यांत जमा होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com