कर्जमाफीसाठी ४१ लाख शेतकर्‍यांना १९ हजार ५३७ कोटी मंजूर

कर्जमाफीसाठी ४१ लाख शेतकर्‍यांना १९ हजार ५३७ कोटी मंजूर
कर्जमाफीसाठी ४१ लाख शेतकर्‍यांना १९ हजार ५३७ कोटी मंजूर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकर्‍यांसाठी १९,५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारतर्फे जाहिर करण्यात आली.  याच योजनेत राज्य शासनाने बुधवारी (ता.६)  १६ लाख ९८ हजार ११० शेतकर्‍यांच्या खात्यांसाठी ५५८० कोटी रूपये केले मंजूर केले असून, एक रकमी परतावा (वन टाईम सेटलमेंट) योजनेंतर्गत ६ लाख ०५ हजार ५०५ शेतकर्‍यांच्या खात्यांसाठी ४६७३ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

सुमारे ७७ लाख प्राप्त अर्जापैकी ६९ लाख अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहेत. शेवटच्या पात्र शेतकर्‍याला लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com