मराठवाड्यात कृषी यांत्रिकीकरणावर केवळ पावणेपाच कोटी खर्च

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान आणले. त्याअंतर्गत शेतीकाम सुलभ होण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियान आले. या अभियानासाठी मराठवाड्यात सप्टेंबर अखेरपर्यंत साडेबारा कोटीवर निधीही प्राप्त झाला. परंतु प्रत्यक्षात केवळ चार कोटी ८१ लाख १७ हजार रुपयेच खर्च झाल्याचे आकडे सांगतात.

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून पेरणी, हार्वेस्टिंग सोबतच मूलस्थानी जलसंधारण आदी विविध उद्देश साध्य करण्याचे धोरण शासनाने स्पष्ट केले. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या मजुराच्या प्रश्नावरही पर्याय मिळणे अपेक्षित आहे.

यांत्रिकीकरण योजनेच्या फलश्रुतीसाठी शासनाकडून योजनेअंतर्गत सहभागासाठी संयत्र खरेदीची तयारी दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांसाठी २ कोटी ९८ लाख ८८ हजार रुपये, तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या पाच जिल्ह्यांसाठी ९ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

सप्टेंबरअखेर औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कृषी यांत्रिकीकरणावर प्राप्त निधीपैकी २ कोटी १ लाख १७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यांत मात्र केवळ २ कोटी ८० लाख रुपयांचाच निधी खर्च झाला. परंतु मराठवाड्यात योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांमध्ये खासकरून लातूर कृषी विभागात अनुत्साह दिसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com